मानोरा येथील स्थानिक कर्मचाऱ्यांची बदली करून नवीन लोकांना पाचारण केल्याशिवाय सुधारणा होणार नाही. गलिच्छ वस्ती सुधार योजना बंद आहे, स्वच्छता अभियान राबविले जात नाही, सर्वत्र घाण पसरली आहे, नाल्या तुंबल्या आहेत, अनेक रस्ते नादुरुस्त आहेत, पथदिवे बंद आहेत, मात्र करवसुली सुरू आहे.
तहसील कार्यालयात परिसरातदेखील दिवे लावले नाहीत.
मानोरा हे तालुक्याचे ठिकाण असून १३० गावे जोडलेली आहेत. बुधवार आठवडी बाजारात सोयीसुविधा नाहीत. सर्वत्र पाणी चिखल साचलेले असते. बाजार कर म्हणून प्रत्येक दुकानातून रुपये २०, ३० रु. दर आठवड्याला वसूल करण्यात येतो, वार्षिक १० लाख वसुली अपेक्षित आहे, मात्र नगरपंचायतकडून बाजारातील ओटे दुरुस्त करून दिले जात नाही. तर बाजारातील रस्त्यावर मुरूम माती टाकून चिखल मुक्त केले जात नाही, असा आरोप कारंजा-मानोरा संघर्ष समितीचे अध्यक्ष देवराव राठोड बंजारा यांनी केला असून विकासकामे मार्गी लावावी, अशी मागणी केली आहे.