शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

वाशिम जिल्ह्यातील वास्तव : प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:18 AM

वाशिम : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या १३ प्रकल्पांची कामे संथगतीने होत आहेत. ही कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे या कामांत वारंवार अडथळा येत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ही कामे पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. 

ठळक मुद्देयंदाचा पावसाळाही उलटणार!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या १३ प्रकल्पांची कामे संथगतीने होत आहेत. ही कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे या कामांत वारंवार अडथळा येत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ही कामे पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्याच्या उद्देशाने जलसंधारण विभागाच्यावतीने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात २0 हून अधिक प्रकल्पांना मंजुरी दिली होती. त्यासाठी संबंधित विभागाच्यावतीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींमुळे विलंब लागला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही प्रकल्पांचे काम सुरू झाले, तर उर्वरितपैकी तीन प्रकल्पांच्या कामांत वन जमिनीच्या संपादनाचा अडथळा निर्माण झाला. अखेर यातील दोन प्रकल्पांना पूर्णत: मान्यता मिळाली. त्याशिवाय  प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी काही प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या कचाट्यात अडकले. अखेर या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. यामध्ये कुकसा, मिर्झापूर, सुरकंडी, वडगाव, वाकद, पळसखेड, इंगलवाडी, पंचाळा, पांगराबंदी, स्वासीन, वाडी रायताळ, वारा जहागिर आणि शेलगाव प्रकल्पाचा समावेश आहे. त्यापैकी सुरकंडी आणि वडगाव प्रकल्पात पाणीसाठा करून सिंचनासाठी त्याचा वापरही होत असून, या प्रकल्पांचे किरकोळ काम उरले आहे. तथापि, उर्वरित ११ प्रकल्पांचे काम अद्याप बरेच पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने या प्रकल्पांची उभारणी सुरू केली तो उद्देश अद्यापही सफल होऊ शकला नाही. प्रशासन हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कसरत करीत असले तरी, कामे करताना प्रत्यक्ष येणार्‍या अडचणी आणि कामाचा वेग यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यास बराच विलंब लागत आहे. हे ११ प्रकल्प येत्या पावसाळय़ापूर्वी पूर्ण झाल्यास संबंधित गावांतील शेतकर्‍यांना सिंचनाचा प्रश्न सुटून पाणी समस्येवर मात करणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :washimवाशिम