शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

वाशिम जिल्ह्यातील १६९ शाळेच्या मान्यता वर्धितचा प्रश्न निकाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 18:47 IST

रिसोड - जिल्ह्यातील १६९ शाळेच्या मान्यता वर्धितचा प्रश्न शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावर शनिवारी निकाली निघाल्याने दहाविच्या परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला. १६९ शाळांकडून शिक्षणाधिकारी कार्यालयास प्रस्ताव येण्यास यावर्षी विलंब झाला होता. 

ठळक मुद्देशाळांकडून प्रस्ताव येण्यास प्रचंड विलंब दहावीच्या परीक्षार्थींना दिलासा

रिसोड - जिल्ह्यातील १६९ शाळेच्या मान्यता वर्धितचा प्रश्न शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावर शनिवारी निकाली निघाल्याने दहाविच्या परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला. १६९ शाळांकडून शिक्षणाधिकारी कार्यालयास प्रस्ताव येण्यास यावर्षी विलंब झाला होता. 

 दरवर्षी शाळा मान्यता वर्धितचा प्रस्ताव साधारणत: मे ते जून महिन्यात शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा लागतो. शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थी संख्या, शाळा सुरू आहे की नाही यासह अन्य माहितीच्या आधारे सदर प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर मान्यता वर्धितचा प्रस्ताव निकाली काढला जातो. या प्रस्तावाच्या आधारेच दहावीच्या परीक्षार्थींचे नियोजन केले जाते. मे व जून महिन्यात प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर शिक्षणाधिकारी हे जुलै महिन्याच्या अखेरीस ही मान्यता वर्धित करीत असतात. यावर्षी जिल्ह्यातील जवळपास १६९ शाळेचे मान्यता वर्धितचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयास विलंबाने प्राप्त झाले. त्यामुळे मान्यता वर्धित करण्यात प्रचंड विलंब झाला होता. यासंदर्भात परीक्षा बोर्डाचे पत्रसुद्धा प्राप्त झाले होते. बोर्डाची मान्यता नसेल तर दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही मान्यता महत्त्वाची आहे. यासंदर्भात मुख्याध्यापक संघाने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांच्याकडे पाठपुरावा केला. गत दोन दिवसांपासून या प्रस्तावावर चर्चा झाली. रविवार हा सुट्टीचा दिवस असतानाही, दुपारपासून मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकारी कार्यालयात स्वत: हजर राहून शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करीत हा प्रश्न मार्गी लावला. शाळा मान्यता वर्धितचा प्रश्न निकाली निघाल्याने १६९ शाळेतील दहावीच्या परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद पाटील नरवाडे, सचिव विजयराव शिंदे, बाळासाहेब गोटे, डिगांबर मवाळ, विजय भड, साहेबराव जाधव, सज्जन बाजड, दिनकर सरकटे, विजयराव देशमुख, मिलींद कव्हर आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळा