शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

९८०० शेतकऱ्यांचे पीककर्ज ‘लॉकडाउन’च्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 10:28 IST

कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र असलेल्यांपैकी ९८०० शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण थांबले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यशासनाने थकित कर्जदार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांची कर्जमाफी दिली. त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना झाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्यांना नव्याने पीककर्ज मिळणे अपेक्षीत होते; परंतु कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र असलेल्यांपैकी ९८०० शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण थांबले. त्यामुळे त्यांना आता पीककर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत.यंदाच्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यात १६०० कोटी रुपये पिक कर्ज वितरीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सोमवार, ४ मे पर्यंत केवळ ८५ कोटींचे पिक कर्ज वितरित झाले असून त्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज वितरणाचे प्रमाण केवळ ५ कोटी आहे. उर्वरित ८० कोटींचा वाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून करण्यात आल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी दिली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका केवळ नियमित कर्ज भरणाºया आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफी मिळाल्यानंतर आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या शेतकºयांनाच पीककर्जाचे वितरण करीत आहेत. प्रत्यक्षात राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली, तर केंद्रशासनाने २४ मार्चपासून लॉकडाउन जारी केले. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद पडले. त्यात ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्राचे काम बंद झाल्याने शेतकºयांना आधार प्रमाणिकरण करता आले नाही. असे ९ हजार ८०० शेतकरी जिल्ह्यात असून, या शेतकºयांना पीककर्ज देण्यास बँका नकार देत आहेत. त्यामुळे खरीप हंगामासाठी तयारी करणाºया शेतकºयांसमोर अडचणी निर्माण झाल्या असून, राज्य शासनाने या समस्येची दखल घेऊन बँकाना पीककर्ज वितरणाचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आधार प्रमाणिकरण रखडलेल्या शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी