शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कारंजा तालुक्यात तीन वर्षात ७७ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 16:00 IST

करंजा लाड : तालुक्यात सन २०१५  पासून २२ जानेवारी २०१८ पर्यंत एकुण ७७ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली.

ठळक मुद्देयामधील ४२ शेतकरी आत्महत्या शासन दरबारी पात्र ठरल्या. विविध त्रुटी व कारणांमुळे ३१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. ३ शेतकºयांच्या आत्महत्या यादीतून वगळल्या असून, १ शेतकरी आत्महत्या प्रकरण चौकशीत आहे. 

करंजा लाड : तालुक्यात सन २०१५  पासून २२ जानेवारी २०१८ पर्यंत एकुण ७७ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. यामधील ४२ शेतकरी आत्महत्या शासन दरबारी पात्र ठरल्या असून, विविध त्रुटी व कारणांमुळे ३१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. ३ शेतकºयांच्या आत्महत्या यादीतून वगळल्या असून, १ शेतकरी आत्महत्या प्रकरण चौकशीत आहे. 

कारंजा तालुक्यात सन २०१५ मध्ये ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यापैकी २० पात्र तर १२ अपात्र ठरविण्यात आल्या. २०१६ मध्ये २२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी १३ पात्र तर ९ अपात्र ठरविल्या गेल्या. सन २०१७ मध्ये २२ शेतकºयांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली .  त्यापैकी ९ पात्र, १० अपात्र तर ३ आत्महत्या वगळल्या गेल्या व १ आत्महत्या चौकशीत असल्याची माहिती तहसिल कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. भारत हा कृषी प्रधान देश असून, देशातील ८० टक्के लोक शेती किंवा शेतीशी निगडीत व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. पूर्वी शेतकरी हा पारंपारिक शेती करून शेतीत निघेल तेवढ्या उत्पन्नावर आपला चरितार्थ भागवत होता. परंतू अलिकडच्या काळात शेतीचे यांत्रिकीकरण झाले आणि शेती उत्पादनासाठी लागणारा खर्चही वाढला. अलिकडील पावसातील अनियमितता, खंड, बदलते वातावरण, व निसगार्चा लहरीपणा या ना अनेक कारणांमुळे शेती व्यवसाय तोट्यात जात असून, कधीकधी तर उत्पादन घेण्यासाठी लागलेला खर्चही निघणे कठीण होवून बसले आहे. शेती या व्यवसायात उत्पन्नाची हमी नसून देखील पर्याय नाही म्हणून ंिकंवा वडीलोपार्जित शेती आहेत म्हणून शेती केल्या जाते. यासाठी कधी बँकांचे तर कधी खासगी सावकाराचे उंबरठे झिजवून शेती मशागत व बी बीयाणे साठी पैसा उभा केल्या जातो. शेतकºयांचे कुटुंब हे संपूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याने मुलांचे शिक्षण, मुलामुलीचे विवाह, दवाखाना, आणि चरितार्थ असे सर्वच शेतीतून मिळणाºया उत्पन्नावर भागविले जाते. परंतू अलिकडे होत असलेली नापिकी, कजार्चा वाढलेला डोंगर, या विवंचनेतून बळीराजा जगण्यापेक्षा मृत्यू बरा असे समजून आत्महत्या करित आहे. कारंजा तालुक्यात सन २०१५ पासून जानेवारी २०१८ पर्यंत एकुण ७७ शेतकरी व शेतकरी पुत्रांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्येकरिता शासनाकडून १ लाख रूपयांचे अर्थ ाहाय केल्या जाते. तहसिल कार्यालयामार्फत शेतकरी आत्महत्येचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यानंतर जिल्हाधीकारी कार्यालयाच्या समितीमार्फत आत्महत्या पात्र की अपात्र ठरविल्या जाते. शासनाकडून दिल्या जाणाºया १ लाख रुपए अर्थसहायापैकी ३० हजार रूपयांचा धनादेश जवळच्या नातेवाईकाला देण्यात येतो. तर उर्वरित ७० हजार रुपये  पोस्टात खाते काढून त्यामध्ये टाकले जातात. जमा रकमेवर मिळणाºया व्याजावर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा हा या मागील हेतू आहे. 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाfarmer suicideशेतकरी आत्महत्या