शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वाशिम जिल्ह्यातील  ६०७ विद्यार्थ्यांनी दिली ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीची परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 21:36 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर ३ डिसेंबर रोजी पार पडली. त्यात जिल्ह्यातील ३० शाळांमधील ६०७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली.

ठळक मुद्देराणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, वाशिम व जे.डी.चवरे हायस्कुल, कारंजा या दोन केंद्रांवर घेण्यात आली परीक्षाजिल्ह्यातील ३0 शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिली परीक्षापात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असल्यामुळे घटतोय प्रतिसाद!

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर ३ डिसेंबर रोजी पार पडली. त्यात जिल्ह्यातील ३० शाळांमधील ६१० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ६०७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली.आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठव्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सामान्य बौद्धीक क्षमता (१०० गुण), शालेय क्षमता (१०० गुण), विज्ञान (४० गुण), गणित व भूमिती ((२० गुण) आणि समाजशास्त्र (४० गुण) आदी विषयांचा त्यात समावेश असतो. यात उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. दरम्यान, यंदा या परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील वाशिमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा आणि कारंजाच्या जे.डी.चवरे हायस्कुल अशा दोन केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. वाशिमच्या केंद्रावर वाशिम, मालेगाव आणि रिसोड तालुक्यातील १३ शाळांमधील विद्यार्थी; तर कारंजाच्या केंद्रावर कारंजा, मंगरूळपीर आणि मानोरा या तीन तालुक्यातील १७ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार न घडता परीक्षा सुरळितपणे पार पडली, अश्ी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. नागरे यांनी दिली.

वर्षागणिक घटतोय प्रतिसाद!जिल्ह्यात गेल्या ७ ते ८ वर्षांपासून एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. पुर्वी ८ केंद्रांवरून परीक्षा घेतली जायची. गतवर्षी चार केंद्रांवरून परीक्षा झाली; तर यंदा मात्र केवळ दोनच परीक्षा केंद्र ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांचा घटता प्रतिसाद यास कारणीभूत मानला जात असून शासनस्तरावरून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची रक्कम प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. 

टॅग्स :examपरीक्षाSchoolशाळाStudentविद्यार्थी