शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

ऐन हिवाळ्यातच वाशिम जिल्ह्यातील ५५ प्रकल्प पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 16:25 IST

वाशिम: गत पावसाळ्यात वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. परिणामी प्रकल्पांत जलसंचय झाला नसून, ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील ५५ प्रकल्प कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण, असे तीन मध्यम, तर १२३ लघू प्रकल्प आहेत. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाºया एकबुर्जी प्रकल्पात २४ टक्केही उपयुक्त साठा उरला आहे.सोनल प्रकल्पाची स्थिती सर्वात गंभीर असून, या प्रकल्पात जेमतेम २ टक्के जलसाठा उरला आहे.

वाशिम: गत पावसाळ्यात वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. परिणामी प्रकल्पांत जलसंचय झाला नसून, ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील ५५ प्रकल्प कोरडे पडले आहेत. अर्थात या प्रकल्पांत शुन्य टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे, तर उवरित ७१ प्रकल्पांसह एकूण १२६ प्रकल्पांची पाणी पातळी १८ टक्के च आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात निर्माण होणाºया पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने त्वरीत उपाय योजना करणे आवश्यक आहे.

वाशिम जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण, असे तीन मध्यम, तर १२३ लघू प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पांपैकी वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाºया एकबुर्जी प्रकल्पात २४ टक्केही उपयुक्त साठा उरला आहे, तर अडाण प्रकल्पात २१ टक्के जलसाठा आहे. सोनल प्रकल्पाची स्थिती सर्वात गंभीर असून, या प्रकल्पात जेमतेम २ टक्के जलसाठा उरला आहे. त्याशिवाय वाशिम तालुक्यातील बोराळा, धुमका, काजळांबा, कळंबा महाली, कार्ली, सावंगा, सावरगाव जिरे, सोनखास, सोयता, उमरा कापसे, उमरा शमशोद्दिन, वाई सावळी, उमरा कापसे सं, जनुना सोनवळ, ब्रम्हा संग्रा, सुरखंडी या १६ प्रकल्पांत, मालेगाव तालुक्यातील बोरगांव, ब्राम्हणवाडा, कळमेश्वर, कोल्ही, कुºहळ, मालेगाव, मुंगळा, रिधोरा, सोमठाणा, खडकी, मैराळडोह, या ११ प्रकल्पांत, रिसोड तालुक्यातील  बोरखेडी, हराळ, करडा, मांडवा, मोरगव्हाण, या पाच प्रकल्पांत, मंगरुळपीर तालुक्यातील  दस्तापूर, सार्सी बोथ, सिंगडोह, चांदई, कवठळ या पाच प्रकल्पांत, मानोरा तालुक्यातील आसोला इंगोले, चौसाळा, धानोरा भुसे, गारटेक, गिद, कार्ली, पिंप्री हनुमान, वाईगौळ, हिवरा खु, भिलडोंगर या १० प्रकल्पांत आणि कारंजा तालुक्यातील मोखड पिंप्री, ऋषी तलाव, शहा, सोहळ, मोहगव्हाण, धामणी या सहा प्रकल्पांत मिळून एकूण ५५ प्रकल्पांत शुन्य टक्के उपयुक्त साठा उरला आहे. विशेष म्हणजे यातील ५२ प्रकल्पांतील उपयुक्त साठा डिसेंबर २०१७ च्या मध्यातच संपला होता आता. उर्वरित ६७ मध्यम प्रकल्पांत १६ टक्केही जलसाठा उरलेला नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात निर्माण होणाºया भीषण पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाला त्वरीत उपाय योजना कराव्या लागणार आहेत. 

टॅग्स :washimवाशिमDamधरण