शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

ऐन हिवाळ्यातच वाशिम जिल्ह्यातील ५५ प्रकल्प पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 16:25 IST

वाशिम: गत पावसाळ्यात वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. परिणामी प्रकल्पांत जलसंचय झाला नसून, ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील ५५ प्रकल्प कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण, असे तीन मध्यम, तर १२३ लघू प्रकल्प आहेत. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाºया एकबुर्जी प्रकल्पात २४ टक्केही उपयुक्त साठा उरला आहे.सोनल प्रकल्पाची स्थिती सर्वात गंभीर असून, या प्रकल्पात जेमतेम २ टक्के जलसाठा उरला आहे.

वाशिम: गत पावसाळ्यात वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. परिणामी प्रकल्पांत जलसंचय झाला नसून, ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील ५५ प्रकल्प कोरडे पडले आहेत. अर्थात या प्रकल्पांत शुन्य टक्के उपयुक्त जलसाठा उरला आहे, तर उवरित ७१ प्रकल्पांसह एकूण १२६ प्रकल्पांची पाणी पातळी १८ टक्के च आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात निर्माण होणाºया पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने त्वरीत उपाय योजना करणे आवश्यक आहे.

वाशिम जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण, असे तीन मध्यम, तर १२३ लघू प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पांपैकी वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाºया एकबुर्जी प्रकल्पात २४ टक्केही उपयुक्त साठा उरला आहे, तर अडाण प्रकल्पात २१ टक्के जलसाठा आहे. सोनल प्रकल्पाची स्थिती सर्वात गंभीर असून, या प्रकल्पात जेमतेम २ टक्के जलसाठा उरला आहे. त्याशिवाय वाशिम तालुक्यातील बोराळा, धुमका, काजळांबा, कळंबा महाली, कार्ली, सावंगा, सावरगाव जिरे, सोनखास, सोयता, उमरा कापसे, उमरा शमशोद्दिन, वाई सावळी, उमरा कापसे सं, जनुना सोनवळ, ब्रम्हा संग्रा, सुरखंडी या १६ प्रकल्पांत, मालेगाव तालुक्यातील बोरगांव, ब्राम्हणवाडा, कळमेश्वर, कोल्ही, कुºहळ, मालेगाव, मुंगळा, रिधोरा, सोमठाणा, खडकी, मैराळडोह, या ११ प्रकल्पांत, रिसोड तालुक्यातील  बोरखेडी, हराळ, करडा, मांडवा, मोरगव्हाण, या पाच प्रकल्पांत, मंगरुळपीर तालुक्यातील  दस्तापूर, सार्सी बोथ, सिंगडोह, चांदई, कवठळ या पाच प्रकल्पांत, मानोरा तालुक्यातील आसोला इंगोले, चौसाळा, धानोरा भुसे, गारटेक, गिद, कार्ली, पिंप्री हनुमान, वाईगौळ, हिवरा खु, भिलडोंगर या १० प्रकल्पांत आणि कारंजा तालुक्यातील मोखड पिंप्री, ऋषी तलाव, शहा, सोहळ, मोहगव्हाण, धामणी या सहा प्रकल्पांत मिळून एकूण ५५ प्रकल्पांत शुन्य टक्के उपयुक्त साठा उरला आहे. विशेष म्हणजे यातील ५२ प्रकल्पांतील उपयुक्त साठा डिसेंबर २०१७ च्या मध्यातच संपला होता आता. उर्वरित ६७ मध्यम प्रकल्पांत १६ टक्केही जलसाठा उरलेला नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात निर्माण होणाºया भीषण पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाला त्वरीत उपाय योजना कराव्या लागणार आहेत. 

टॅग्स :washimवाशिमDamधरण