शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

हरवलेले अन् गहाळ झालेले ५० मोबाईल मूळ मालकांना परत

By संतोष वानखडे | Updated: February 7, 2024 18:49 IST

मागील वर्षी एकूण हरविलेले/गहाळ झालेले एकूण ३५८ मोबाईल संच त्यांच्या मूळ मालकांना परत केले होते.

वाशिम : हरविलेले, गहाळ झालेले मोबाईल शोधण्यात वाशिम पोलिसांना यश आले असून, ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात ५० मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.

केंद्र शासनाच्या ‘सीईआयआर’ या वेबपोर्टलवर हरविलेल्या मोबाईलचा शोध घेणे सोयीचे झाले असून नागरिकांनी त्यांचा मोबाईल फोन हरविल्यास/चोरी झाल्यास तत्काळ www.ceir.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदविली तसेच सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर पुढील तपासाला गती मिळते. जिल्ह्यातील हरविलेले/गहाळ झालेले एकूण ५० मोबाईल ‘सीईआयआर’ पोर्टलद्वारे शोधण्यात आले. वाशिम घटकातील हरविलेले/गहाळ झालेले एकूण ५० मोबाईल संच (अंदाजे किंमत ३.५५ लाख) ७ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचेहस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.

मागील वर्षी एकूण हरविलेले/गहाळ झालेले एकूण ३५८ मोबाईल संच त्यांच्या मूळ मालकांना परत केले होते. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम सुनीलकुमार पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपीर नीलिमा आरज यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद इंगळे व त्यांच्या चमूने पार पाडली.