शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी आत्महत्यांची ४७ टक्के प्रकरणे मदतीसाठी अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:40 IST

Farmer suicides News २०१ आत्महत्या अपात्र ठरल्या असून, चालू वर्षातील १० प्रकरणे चौकशीत आहेत. 

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व अन्य कारणांमुळे गत पाच वर्षांत जिल्ह्यातील ४४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी २२९ आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या, तर ४७ टक्के अर्थात २०१ आत्महत्या अपात्र ठरल्या असून, चालू वर्षातील १० प्रकरणे चौकशीत आहेत. शेतकऱ्यांना नानाविध संकटांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास कर्जाचा भरणा कसा करावा, या चिंतेने अनेक शेतकऱ्यांची झोप उडते. यातून काही शेतकरी मृत्यूला जवळ करतात, तर काही शेतकरी पर्यायी व्यवस्था शोधून या संकटावर मात करतात. २०१६ ते २०२० या पाच वर्षांत जिल्ह्यात ४४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदतीचा हात मिळावा, याकरिता सरकारकडून एक लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र, याकरिता आत्महत्येमागे कर्जबाजारीपणा,  नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान आणि पीककर्जासाठी बँकांचा तगादा, नापिकी यांसारखी कारणे असावी लागतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम करणारी समिती हे प्रकरण मदतीसाठी मंजूर होणार की नामंजूर, याबाबतचा निर्णय घेते. गत पाच वर्षात जिल्ह्यातील ४४० पैकी २२९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत, तर २०१ प्रकरणे अपात्र ठरली. २०२० मधील १० प्रकरणे चौकशीत आहेत. 

ही कारणे असतील, तरच मिळते मदत!शेतीसाठी घेतलेले कर्ज परत फेडता न येणे, हे कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून तगादा लावला जाणे, गेली काही वर्षे शेतीमध्ये काहीच न पिकणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेली पिके गमावून बसणे यांसारख्या कारणांनी शेतकऱ्याने आत्महत्या केली, तर अशा पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबाला सरकारकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते.

चालू वर्षात १० प्रकरणे चौकशीत २०२० या वर्षात कोरोनाकाळातही जिल्ह्यातील ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३० आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली, तर ५२ प्रकरणांत जिल्हास्तरीय समितीला नापिकी, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती आदी कारणे आढळून आली नसल्याने ही प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. उर्वरित १० प्रकरणे चौकशीत आहेत. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याwashimवाशिम