शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

 वाशिम जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये झाली ४६ हजार क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 17:16 IST

वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटल कापसाची खरेदी बाजार समित्यांमध्ये झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची खरेदी मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत झाली आहे.

ठळक मुद्दे वाशिम जिल्ह्यात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी बाजार समित्यांमध्ये करण्यात आली आहे. जिल्ह्यात मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या बाजार समित्यांतर्गत कपाशीची खरेदी करण्यात येत आहे.मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत सर्वाधिक १६ हजार ९०० क्विंटलहून अधिक कपाशीची खरेदी झाली आहे.

वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटल कापसाची खरेदी बाजार समित्यांमध्ये झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची खरेदी मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत झाली आहे. या बाजार समिती अंतर्गत व्यापाºयांनी जवळपास १७ हजार क्विंटल कपाशीची खरेदी केली आहे.  

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण मानोरा आणि कारंजा तालुक्यात होते. कपाशी पहिल्या वेच्यावर आली असतानाच शेंदरी बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे या शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यापूर्वी जिल्ह्यात हमीभावाने खरेदी करण्यासाठी मानोरा, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन तालुक्यात पणन संघाचे केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासकीय केंद्रावर दर्जानुसार भाव मिळत असताना व्यापाºयांकडून त्यापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे पाठच केली. उपनिबंधक कार्यालयाकडून घेतलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी बाजार समित्यांमध्ये लिलाव पद्धतीने व्यापाºयांकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या बाजार समित्यांतर्गत कपाशीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामध्ये मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत सर्वाधिक १६ हजार ९०० क्विंटलहून अधिक कपाशीची खरेदी झाली आहे. त्या खालोखाल कारंजा बाजार समिती अंतर्गत १४ हजार ५०० क्विंटलहून अधिक, मानोरा बाजार समिती अंतर्गत ९ हजार क्विंटलहून अधिक, तर वाशिम बाजार समिती अंतर्गत ५ हजार क्विंटलहून अधिक कपाशीची खरेदी झाली आहे.  सद्यस्थितीत व्यापाºयांकडून कपाशीला किमान ४८०० ते कमाल ५२०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत. 

 शासकीय खरेदी केंद्र निरंकच 

जिल्ह्यात कपाशीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात पणन महासंघाची तीन केंद्र २५ आॅक्टोबर रोजी सुरू करण्यात आली; परंतु गत अडिच महिन्यांत या तिन्ही केंद्रांवर मिळून एक क्विंटलही कापूस खरेदी होऊ शकला नाही. बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून हमीभावापेक्षा तब्बल एक हजार रुपये अधिक दर मिळत असल्याने शेतकरी व्यापाºयांकडेच कपाशीच्या विक्रीवर भर देत आहेत. शासनाचे हमीदर ४३२० असताना व्यापाºयांकडून ५२०० रुपयांपर्यंत कपाशीला भाव मिळत असल्याने शेतकºयांनी व्यापाºयांकडेच कपाशी विक्रीवर जोर दिला, हे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस