शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

 वाशिम जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये झाली ४६ हजार क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 17:16 IST

वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटल कापसाची खरेदी बाजार समित्यांमध्ये झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची खरेदी मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत झाली आहे.

ठळक मुद्दे वाशिम जिल्ह्यात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी बाजार समित्यांमध्ये करण्यात आली आहे. जिल्ह्यात मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या बाजार समित्यांतर्गत कपाशीची खरेदी करण्यात येत आहे.मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत सर्वाधिक १६ हजार ९०० क्विंटलहून अधिक कपाशीची खरेदी झाली आहे.

वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटल कापसाची खरेदी बाजार समित्यांमध्ये झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची खरेदी मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत झाली आहे. या बाजार समिती अंतर्गत व्यापाºयांनी जवळपास १७ हजार क्विंटल कपाशीची खरेदी केली आहे.  

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण मानोरा आणि कारंजा तालुक्यात होते. कपाशी पहिल्या वेच्यावर आली असतानाच शेंदरी बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे या शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यापूर्वी जिल्ह्यात हमीभावाने खरेदी करण्यासाठी मानोरा, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन तालुक्यात पणन संघाचे केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासकीय केंद्रावर दर्जानुसार भाव मिळत असताना व्यापाºयांकडून त्यापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे पाठच केली. उपनिबंधक कार्यालयाकडून घेतलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी बाजार समित्यांमध्ये लिलाव पद्धतीने व्यापाºयांकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या बाजार समित्यांतर्गत कपाशीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामध्ये मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत सर्वाधिक १६ हजार ९०० क्विंटलहून अधिक कपाशीची खरेदी झाली आहे. त्या खालोखाल कारंजा बाजार समिती अंतर्गत १४ हजार ५०० क्विंटलहून अधिक, मानोरा बाजार समिती अंतर्गत ९ हजार क्विंटलहून अधिक, तर वाशिम बाजार समिती अंतर्गत ५ हजार क्विंटलहून अधिक कपाशीची खरेदी झाली आहे.  सद्यस्थितीत व्यापाºयांकडून कपाशीला किमान ४८०० ते कमाल ५२०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत. 

 शासकीय खरेदी केंद्र निरंकच 

जिल्ह्यात कपाशीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात पणन महासंघाची तीन केंद्र २५ आॅक्टोबर रोजी सुरू करण्यात आली; परंतु गत अडिच महिन्यांत या तिन्ही केंद्रांवर मिळून एक क्विंटलही कापूस खरेदी होऊ शकला नाही. बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून हमीभावापेक्षा तब्बल एक हजार रुपये अधिक दर मिळत असल्याने शेतकरी व्यापाºयांकडेच कपाशीच्या विक्रीवर भर देत आहेत. शासनाचे हमीदर ४३२० असताना व्यापाºयांकडून ५२०० रुपयांपर्यंत कपाशीला भाव मिळत असल्याने शेतकºयांनी व्यापाºयांकडेच कपाशी विक्रीवर जोर दिला, हे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस