शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

 वाशिम जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये झाली ४६ हजार क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 17:16 IST

वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटल कापसाची खरेदी बाजार समित्यांमध्ये झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची खरेदी मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत झाली आहे.

ठळक मुद्दे वाशिम जिल्ह्यात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी बाजार समित्यांमध्ये करण्यात आली आहे. जिल्ह्यात मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या बाजार समित्यांतर्गत कपाशीची खरेदी करण्यात येत आहे.मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत सर्वाधिक १६ हजार ९०० क्विंटलहून अधिक कपाशीची खरेदी झाली आहे.

वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटल कापसाची खरेदी बाजार समित्यांमध्ये झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची खरेदी मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत झाली आहे. या बाजार समिती अंतर्गत व्यापाºयांनी जवळपास १७ हजार क्विंटल कपाशीची खरेदी केली आहे.  

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण मानोरा आणि कारंजा तालुक्यात होते. कपाशी पहिल्या वेच्यावर आली असतानाच शेंदरी बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे या शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यापूर्वी जिल्ह्यात हमीभावाने खरेदी करण्यासाठी मानोरा, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन तालुक्यात पणन संघाचे केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासकीय केंद्रावर दर्जानुसार भाव मिळत असताना व्यापाºयांकडून त्यापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे पाठच केली. उपनिबंधक कार्यालयाकडून घेतलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी बाजार समित्यांमध्ये लिलाव पद्धतीने व्यापाºयांकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या बाजार समित्यांतर्गत कपाशीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामध्ये मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत सर्वाधिक १६ हजार ९०० क्विंटलहून अधिक कपाशीची खरेदी झाली आहे. त्या खालोखाल कारंजा बाजार समिती अंतर्गत १४ हजार ५०० क्विंटलहून अधिक, मानोरा बाजार समिती अंतर्गत ९ हजार क्विंटलहून अधिक, तर वाशिम बाजार समिती अंतर्गत ५ हजार क्विंटलहून अधिक कपाशीची खरेदी झाली आहे.  सद्यस्थितीत व्यापाºयांकडून कपाशीला किमान ४८०० ते कमाल ५२०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत. 

 शासकीय खरेदी केंद्र निरंकच 

जिल्ह्यात कपाशीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात पणन महासंघाची तीन केंद्र २५ आॅक्टोबर रोजी सुरू करण्यात आली; परंतु गत अडिच महिन्यांत या तिन्ही केंद्रांवर मिळून एक क्विंटलही कापूस खरेदी होऊ शकला नाही. बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून हमीभावापेक्षा तब्बल एक हजार रुपये अधिक दर मिळत असल्याने शेतकरी व्यापाºयांकडेच कपाशीच्या विक्रीवर भर देत आहेत. शासनाचे हमीदर ४३२० असताना व्यापाºयांकडून ५२०० रुपयांपर्यंत कपाशीला भाव मिळत असल्याने शेतकºयांनी व्यापाºयांकडेच कपाशी विक्रीवर जोर दिला, हे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस