शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यातील गारपिटग्रस्त ४४७ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:45 IST

मानोरा - तालुक्यातील पाळोदी सर्कलमध्ये १३फेब्रुवारी  रोजी झालेल्या गारपिटमुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ४४७ शेतकºयांना ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची नुकसानभरपाई मिळणार अशी माहिती तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्दे१३फेब्रुवारी रोजी पाळोदी सर्कलमध्ये गारपिट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते.चिन रोकडे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधुन  पाळोदी सर्कलच्या व्यथा मांडल्या होत्या. शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

मानोरा - तालुक्यातील पाळोदी सर्कलमध्ये १३फेब्रुवारी  रोजी झालेल्या गारपिटमुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ४४७ शेतकºयांना ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची नुकसानभरपाई मिळणार अशी माहिती तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी दिली. गारपिट ग्रस्तांना मदत मिळण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन उभारले होते.

१३फेब्रुवारी रोजी पाळोदी सर्कलमध्ये गारपिट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते.  नुकसानग्रस्त भागाचा महसुल  प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी, डॉ.शरद जावळे, तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी तातडीने पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु महिना दिड महिना उलटुनसुध्दा शासकीय  मदत मिळत नसल्यामुळे आंदोलनाचे  हत्यार उपसले होते. माजी आमदार प्रकाश डहाके यांनी धरणे आंदोलन तर माजी जि.प.डॉ.सुभाष राठोड यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. तत्पुर्वी राष्ट्रवादीचे  जि.प.सदस्य सचिन रोकडे व पं.स.सदस्य रेखा पडवाल यांनी गुराढोरांसह मोठया प्रमाणात आंदोलन उभारले होते.  आंदोलनादरम्यान सचिन रोकडे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधुन  पाळोदी सर्कलच्या व्यथा मांडल्या होत्या. या जनआंदोलनाची दखल घेत प्रशासनाने ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची मदत जाहीर करुन कोरडवाहु शेतीला ६८००  रुपये हेक्टर,  ओलीत १४५००,  बागायती १८००० रुपये हेक्टरी मदत देण्यात आली. त्यामध्ये ३९७.४५ क्षेत्रात नुकसानग्रस्त ४४८ शेतकºयांना लाभ मिळणार आहे. त्यामध्ये शेंदुरजना  ४० शेतकरी, रुई  येथील १९६ शेतकरी, गोस्ता १२८ शेतकरी, ढोणी येथील ४ शेतकरी, पाळोदी ६ शेतकरी, रंजीतनगर १३ शेतकरी, हिवरा खुर्द ३३ शेतकरी, मेंद्रा ११ शेतकरी, इंगलवाडी १६ शेतकरी, वटफळ ११ शेतकरी अशा शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे शासनाने तातडीने गारपिटग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात आली. हे जनतेच्या आंदोलनाचे यश आहे.ु पाळोदी सर्कलला भिषण पाणी टंचाईन ग्रासले असुन पाणी प्रश्न तातडीने सोडवा व रुई धरणाचे पाणी गावासाठी  सोडण्यात यावे. कायदा हाती घेवुन आम्ही धरणाचे पाणी गावकºयांना पिण्याकरिता सोडु.- सचिन रोकडे जि.प. सदस्य,

- रेखा पडवाळ, पं.स.सदस्य

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराHailstormगारपीटFarmerशेतकरी