शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यातील गारपिटग्रस्त ४४७ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:45 IST

मानोरा - तालुक्यातील पाळोदी सर्कलमध्ये १३फेब्रुवारी  रोजी झालेल्या गारपिटमुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ४४७ शेतकºयांना ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची नुकसानभरपाई मिळणार अशी माहिती तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्दे१३फेब्रुवारी रोजी पाळोदी सर्कलमध्ये गारपिट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते.चिन रोकडे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधुन  पाळोदी सर्कलच्या व्यथा मांडल्या होत्या. शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

मानोरा - तालुक्यातील पाळोदी सर्कलमध्ये १३फेब्रुवारी  रोजी झालेल्या गारपिटमुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ४४७ शेतकºयांना ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची नुकसानभरपाई मिळणार अशी माहिती तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी दिली. गारपिट ग्रस्तांना मदत मिळण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन उभारले होते.

१३फेब्रुवारी रोजी पाळोदी सर्कलमध्ये गारपिट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते.  नुकसानग्रस्त भागाचा महसुल  प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी, डॉ.शरद जावळे, तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी तातडीने पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु महिना दिड महिना उलटुनसुध्दा शासकीय  मदत मिळत नसल्यामुळे आंदोलनाचे  हत्यार उपसले होते. माजी आमदार प्रकाश डहाके यांनी धरणे आंदोलन तर माजी जि.प.डॉ.सुभाष राठोड यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. तत्पुर्वी राष्ट्रवादीचे  जि.प.सदस्य सचिन रोकडे व पं.स.सदस्य रेखा पडवाल यांनी गुराढोरांसह मोठया प्रमाणात आंदोलन उभारले होते.  आंदोलनादरम्यान सचिन रोकडे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधुन  पाळोदी सर्कलच्या व्यथा मांडल्या होत्या. या जनआंदोलनाची दखल घेत प्रशासनाने ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची मदत जाहीर करुन कोरडवाहु शेतीला ६८००  रुपये हेक्टर,  ओलीत १४५००,  बागायती १८००० रुपये हेक्टरी मदत देण्यात आली. त्यामध्ये ३९७.४५ क्षेत्रात नुकसानग्रस्त ४४८ शेतकºयांना लाभ मिळणार आहे. त्यामध्ये शेंदुरजना  ४० शेतकरी, रुई  येथील १९६ शेतकरी, गोस्ता १२८ शेतकरी, ढोणी येथील ४ शेतकरी, पाळोदी ६ शेतकरी, रंजीतनगर १३ शेतकरी, हिवरा खुर्द ३३ शेतकरी, मेंद्रा ११ शेतकरी, इंगलवाडी १६ शेतकरी, वटफळ ११ शेतकरी अशा शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे शासनाने तातडीने गारपिटग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात आली. हे जनतेच्या आंदोलनाचे यश आहे.ु पाळोदी सर्कलला भिषण पाणी टंचाईन ग्रासले असुन पाणी प्रश्न तातडीने सोडवा व रुई धरणाचे पाणी गावासाठी  सोडण्यात यावे. कायदा हाती घेवुन आम्ही धरणाचे पाणी गावकºयांना पिण्याकरिता सोडु.- सचिन रोकडे जि.प. सदस्य,

- रेखा पडवाळ, पं.स.सदस्य

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराHailstormगारपीटFarmerशेतकरी