शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मानोरा तालुक्यातील गारपिटग्रस्त ४४७ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:45 IST

मानोरा - तालुक्यातील पाळोदी सर्कलमध्ये १३फेब्रुवारी  रोजी झालेल्या गारपिटमुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ४४७ शेतकºयांना ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची नुकसानभरपाई मिळणार अशी माहिती तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्दे१३फेब्रुवारी रोजी पाळोदी सर्कलमध्ये गारपिट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते.चिन रोकडे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधुन  पाळोदी सर्कलच्या व्यथा मांडल्या होत्या. शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

मानोरा - तालुक्यातील पाळोदी सर्कलमध्ये १३फेब्रुवारी  रोजी झालेल्या गारपिटमुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ४४७ शेतकºयांना ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची नुकसानभरपाई मिळणार अशी माहिती तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी दिली. गारपिट ग्रस्तांना मदत मिळण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन उभारले होते.

१३फेब्रुवारी रोजी पाळोदी सर्कलमध्ये गारपिट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते.  नुकसानग्रस्त भागाचा महसुल  प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी, डॉ.शरद जावळे, तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी तातडीने पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु महिना दिड महिना उलटुनसुध्दा शासकीय  मदत मिळत नसल्यामुळे आंदोलनाचे  हत्यार उपसले होते. माजी आमदार प्रकाश डहाके यांनी धरणे आंदोलन तर माजी जि.प.डॉ.सुभाष राठोड यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. तत्पुर्वी राष्ट्रवादीचे  जि.प.सदस्य सचिन रोकडे व पं.स.सदस्य रेखा पडवाल यांनी गुराढोरांसह मोठया प्रमाणात आंदोलन उभारले होते.  आंदोलनादरम्यान सचिन रोकडे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधुन  पाळोदी सर्कलच्या व्यथा मांडल्या होत्या. या जनआंदोलनाची दखल घेत प्रशासनाने ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची मदत जाहीर करुन कोरडवाहु शेतीला ६८००  रुपये हेक्टर,  ओलीत १४५००,  बागायती १८००० रुपये हेक्टरी मदत देण्यात आली. त्यामध्ये ३९७.४५ क्षेत्रात नुकसानग्रस्त ४४८ शेतकºयांना लाभ मिळणार आहे. त्यामध्ये शेंदुरजना  ४० शेतकरी, रुई  येथील १९६ शेतकरी, गोस्ता १२८ शेतकरी, ढोणी येथील ४ शेतकरी, पाळोदी ६ शेतकरी, रंजीतनगर १३ शेतकरी, हिवरा खुर्द ३३ शेतकरी, मेंद्रा ११ शेतकरी, इंगलवाडी १६ शेतकरी, वटफळ ११ शेतकरी अशा शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे शासनाने तातडीने गारपिटग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात आली. हे जनतेच्या आंदोलनाचे यश आहे.ु पाळोदी सर्कलला भिषण पाणी टंचाईन ग्रासले असुन पाणी प्रश्न तातडीने सोडवा व रुई धरणाचे पाणी गावासाठी  सोडण्यात यावे. कायदा हाती घेवुन आम्ही धरणाचे पाणी गावकºयांना पिण्याकरिता सोडु.- सचिन रोकडे जि.प. सदस्य,

- रेखा पडवाळ, पं.स.सदस्य

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराHailstormगारपीटFarmerशेतकरी