शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

मानोरा तालुक्यातील गारपिटग्रस्त ४४७ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:45 IST

मानोरा - तालुक्यातील पाळोदी सर्कलमध्ये १३फेब्रुवारी  रोजी झालेल्या गारपिटमुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ४४७ शेतकºयांना ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची नुकसानभरपाई मिळणार अशी माहिती तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्दे१३फेब्रुवारी रोजी पाळोदी सर्कलमध्ये गारपिट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते.चिन रोकडे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधुन  पाळोदी सर्कलच्या व्यथा मांडल्या होत्या. शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

मानोरा - तालुक्यातील पाळोदी सर्कलमध्ये १३फेब्रुवारी  रोजी झालेल्या गारपिटमुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ४४७ शेतकºयांना ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची नुकसानभरपाई मिळणार अशी माहिती तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी दिली. गारपिट ग्रस्तांना मदत मिळण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन उभारले होते.

१३फेब्रुवारी रोजी पाळोदी सर्कलमध्ये गारपिट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते.  नुकसानग्रस्त भागाचा महसुल  प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी, डॉ.शरद जावळे, तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी तातडीने पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु महिना दिड महिना उलटुनसुध्दा शासकीय  मदत मिळत नसल्यामुळे आंदोलनाचे  हत्यार उपसले होते. माजी आमदार प्रकाश डहाके यांनी धरणे आंदोलन तर माजी जि.प.डॉ.सुभाष राठोड यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. तत्पुर्वी राष्ट्रवादीचे  जि.प.सदस्य सचिन रोकडे व पं.स.सदस्य रेखा पडवाल यांनी गुराढोरांसह मोठया प्रमाणात आंदोलन उभारले होते.  आंदोलनादरम्यान सचिन रोकडे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधुन  पाळोदी सर्कलच्या व्यथा मांडल्या होत्या. या जनआंदोलनाची दखल घेत प्रशासनाने ४२ लाख २९ हजार ७४० रुपयाची मदत जाहीर करुन कोरडवाहु शेतीला ६८००  रुपये हेक्टर,  ओलीत १४५००,  बागायती १८००० रुपये हेक्टरी मदत देण्यात आली. त्यामध्ये ३९७.४५ क्षेत्रात नुकसानग्रस्त ४४८ शेतकºयांना लाभ मिळणार आहे. त्यामध्ये शेंदुरजना  ४० शेतकरी, रुई  येथील १९६ शेतकरी, गोस्ता १२८ शेतकरी, ढोणी येथील ४ शेतकरी, पाळोदी ६ शेतकरी, रंजीतनगर १३ शेतकरी, हिवरा खुर्द ३३ शेतकरी, मेंद्रा ११ शेतकरी, इंगलवाडी १६ शेतकरी, वटफळ ११ शेतकरी अशा शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे शासनाने तातडीने गारपिटग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात आली. हे जनतेच्या आंदोलनाचे यश आहे.ु पाळोदी सर्कलला भिषण पाणी टंचाईन ग्रासले असुन पाणी प्रश्न तातडीने सोडवा व रुई धरणाचे पाणी गावासाठी  सोडण्यात यावे. कायदा हाती घेवुन आम्ही धरणाचे पाणी गावकºयांना पिण्याकरिता सोडु.- सचिन रोकडे जि.प. सदस्य,

- रेखा पडवाळ, पं.स.सदस्य

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराHailstormगारपीटFarmerशेतकरी