शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘समृद्धी’साठी जमिनी देणाऱ्यांना ४४६ कोटींचा मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 06:08 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ९४३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, अडीच हजार शेतक-यांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली.

वाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठीवाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ९४३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, अडीच हजार शेतक-यांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली.महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमधून जाणाºया नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांतील ५४ गावांमधील १४०९ हेक्टर शेतजमीन संपादित करावी लागणार आहे. यात वन विभागाची १३४ हेक्टर आणि शासकीय मालकीची ७० हेक्टर जमीन असून, उर्वरित जमीन शेतकºयांची आहे. दरम्यान, अपेक्षित १४०९ हेक्टरपैकी आजमितीस ९४३ हेक्टर शेतजमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, संबंधित अडीच हजार शेतकºयांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदलादेखील वाटप करण्यात आलेला आहे. नागपूर ते मुंबई हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर विदर्भातील शेती व शेतकºयांच्या विकासाला चालना मिळणार असून, शेती समृद्ध होण्यासाठी हा महामार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच वाशिम जिल्हाही मुंबईसोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत वाशिमहून मुंबईत पोहोचणे शक्य होणार असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविणे शक्य होईल व मालालादेखील चांगला दर मिळेल. विदर्भाच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे.या महामार्गासाठी जमिनीचे संपादन करताना शेतकºयांवर अन्याय होऊ नये, यासाठी सरळ खरेदी पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली. त्याचा अपेक्षित फायदादेखील झाला असून, शेतकºयांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत ९४३ हेक्टर जमिनीची खरेदी करून दिली. त्यापोटी त्यांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आल्याची माहिती माळी यांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्गwashimवाशिम