शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वाशिमच्या जंगलात ४० कृत्रिम पाणवठे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 17:51 IST

वनविभागाच्यावतीने जिल्हाभरातील जंगलात प्राथमिक टप्प्यात ४० कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राणी लोकवस्तीत धाव घेत आहेत. त्यामुळे त्यांचा जीव संकटात येत असून, यावर नियंत्रणासाठी वनविभागाच्यावतीने जिल्हाभरातील जंगलात प्राथमिक टप्प्यात ४० कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात हे पाणवठे जंगलात विविध ठिकाणी ठेवण्यात येतील.वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक जंगलाचा भाग मोठा आहे. या जंगलात विविध प्रजातींच्या हजारो प्राण्यांचा अधिवास आहे. तथापि, या जंगलात पुरेशा प्रमाणात पाणीसाठे नसल्याने हिवाळ्यापासूनच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. हे प्राणी सुरुवातीला शेतशिवारात आणि नंतर उन्हाळ्यात थेट लोकवस्तीपर्यंत धाव घेतात. पाण्यासाठी होत असलेली वन्यप्राण्यांची भटकंती त्यांच्या जिवाला धोका निर्माण करते. कधी वाहनांची धडक लागून, तर कधी मानव-वन्यजीव संघर्षामुळे अनेक प्राण्यांना जीवही गमवावा लागला. हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून, यावर नियंत्रणासाठी वनविभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी केली आहे. यासाठी आवश्यक निधीची तरतूद पूर्वीच झाली असून, सिमेंटचे हे पाणवठे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. साधारण पाच फुट लांब रुंद आणि दोन फुट खोल, तसेच चार फुट लांब, दोन फुट रुंद आणि दोन फुट खोल अशा आकाराचे हे पाणवठे जंगलातील आवश्यक ठिकाणी ठेवले जाणार असून, त्यात पाणी भरण्याची काळजी घेण्यात येणार आहे.

वन्यप्राण्यांची पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबविण्यासाठी जंगलात कृत्रिम पाणवठे ठेवण्यात येणार आहेत. प्राथमिक टप्प्यात ४० पाणवठे तयार करण्यात येत असून, त्याशिवाय पुढील काळात इतरही आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येतील.-सुमंत सोळंके उपवनसंरक्षकवाईल्ड लाईफ (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमforestजंगलforest departmentवनविभाग