शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या जंगलात ४० कृत्रिम पाणवठे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 17:51 IST

वनविभागाच्यावतीने जिल्हाभरातील जंगलात प्राथमिक टप्प्यात ४० कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राणी लोकवस्तीत धाव घेत आहेत. त्यामुळे त्यांचा जीव संकटात येत असून, यावर नियंत्रणासाठी वनविभागाच्यावतीने जिल्हाभरातील जंगलात प्राथमिक टप्प्यात ४० कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात हे पाणवठे जंगलात विविध ठिकाणी ठेवण्यात येतील.वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक जंगलाचा भाग मोठा आहे. या जंगलात विविध प्रजातींच्या हजारो प्राण्यांचा अधिवास आहे. तथापि, या जंगलात पुरेशा प्रमाणात पाणीसाठे नसल्याने हिवाळ्यापासूनच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. हे प्राणी सुरुवातीला शेतशिवारात आणि नंतर उन्हाळ्यात थेट लोकवस्तीपर्यंत धाव घेतात. पाण्यासाठी होत असलेली वन्यप्राण्यांची भटकंती त्यांच्या जिवाला धोका निर्माण करते. कधी वाहनांची धडक लागून, तर कधी मानव-वन्यजीव संघर्षामुळे अनेक प्राण्यांना जीवही गमवावा लागला. हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून, यावर नियंत्रणासाठी वनविभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी केली आहे. यासाठी आवश्यक निधीची तरतूद पूर्वीच झाली असून, सिमेंटचे हे पाणवठे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. साधारण पाच फुट लांब रुंद आणि दोन फुट खोल, तसेच चार फुट लांब, दोन फुट रुंद आणि दोन फुट खोल अशा आकाराचे हे पाणवठे जंगलातील आवश्यक ठिकाणी ठेवले जाणार असून, त्यात पाणी भरण्याची काळजी घेण्यात येणार आहे.

वन्यप्राण्यांची पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबविण्यासाठी जंगलात कृत्रिम पाणवठे ठेवण्यात येणार आहेत. प्राथमिक टप्प्यात ४० पाणवठे तयार करण्यात येत असून, त्याशिवाय पुढील काळात इतरही आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येतील.-सुमंत सोळंके उपवनसंरक्षकवाईल्ड लाईफ (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमforestजंगलforest departmentवनविभाग