शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणीटंचाई उपाययोजनांसाठी ३२० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 18:22 IST

या योजनांसाठी आलेला आणि येणारा खर्च भागविण्यासाठी शासनाने ३२० कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी प्रशासनाने विविध उपाय योजना मंजूर केल्या असून, आणखी काही योजना प्रस्तावित आहेत. या योजनांसाठी आलेला आणि येणारा खर्च भागविण्यासाठी शासनाने ३२० कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात अमरावती विभागासाठी ५७.१४ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.ग्रामीण / नागरी भागात पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने विहीत केलेल्या निकषानुसार नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागीय आयुक्तांसह महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने विविध उपाय योजना राबविल्या असून, अनेक योजना अद्याप राबविण्यात येत आहेत. या उपाय योजनांचा खर्च भागविण्यासाठी निधीची नितांत गरज असल्याने शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ३२०३३.०० लाख अर्थात ३२० कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात अमरावती विभागासाठी ५७.१४ कोटी रुपयांची तरतूद आहे. ग्रामीण भागांत राबविलेल्या किंवा राबविण्यात येणाऱ्या पाणीटंचाई निवारणार्थ उपाय योजनांसाठीचा खर्च संबंतिध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तर नागरी भागांत महानगर पालिका, नगर परिषदांनी राबविलेल्या किंवा राबविण्यात येणाºया उपाय योजनांचा खर्च विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरीत करावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपाय योजनांचा खर्च महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे वितरीत करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या किंवा राबविण्यात येणाºया उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने प्रशासनाला उपाययोजना राबविणे सोयीचे होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई