शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

पाणीटंचाई उपाययोजनांसाठी ३२० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 18:22 IST

या योजनांसाठी आलेला आणि येणारा खर्च भागविण्यासाठी शासनाने ३२० कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी प्रशासनाने विविध उपाय योजना मंजूर केल्या असून, आणखी काही योजना प्रस्तावित आहेत. या योजनांसाठी आलेला आणि येणारा खर्च भागविण्यासाठी शासनाने ३२० कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात अमरावती विभागासाठी ५७.१४ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.ग्रामीण / नागरी भागात पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने विहीत केलेल्या निकषानुसार नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागीय आयुक्तांसह महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने विविध उपाय योजना राबविल्या असून, अनेक योजना अद्याप राबविण्यात येत आहेत. या उपाय योजनांचा खर्च भागविण्यासाठी निधीची नितांत गरज असल्याने शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ३२०३३.०० लाख अर्थात ३२० कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात अमरावती विभागासाठी ५७.१४ कोटी रुपयांची तरतूद आहे. ग्रामीण भागांत राबविलेल्या किंवा राबविण्यात येणाऱ्या पाणीटंचाई निवारणार्थ उपाय योजनांसाठीचा खर्च संबंतिध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तर नागरी भागांत महानगर पालिका, नगर परिषदांनी राबविलेल्या किंवा राबविण्यात येणाºया उपाय योजनांचा खर्च विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरीत करावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपाय योजनांचा खर्च महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे वितरीत करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या किंवा राबविण्यात येणाºया उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने प्रशासनाला उपाययोजना राबविणे सोयीचे होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई