शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

पाणीटंचाई उपाययोजनांसाठी ३२० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 18:22 IST

या योजनांसाठी आलेला आणि येणारा खर्च भागविण्यासाठी शासनाने ३२० कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी प्रशासनाने विविध उपाय योजना मंजूर केल्या असून, आणखी काही योजना प्रस्तावित आहेत. या योजनांसाठी आलेला आणि येणारा खर्च भागविण्यासाठी शासनाने ३२० कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात अमरावती विभागासाठी ५७.१४ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.ग्रामीण / नागरी भागात पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने विहीत केलेल्या निकषानुसार नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागीय आयुक्तांसह महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने विविध उपाय योजना राबविल्या असून, अनेक योजना अद्याप राबविण्यात येत आहेत. या उपाय योजनांचा खर्च भागविण्यासाठी निधीची नितांत गरज असल्याने शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ३२०३३.०० लाख अर्थात ३२० कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात अमरावती विभागासाठी ५७.१४ कोटी रुपयांची तरतूद आहे. ग्रामीण भागांत राबविलेल्या किंवा राबविण्यात येणाऱ्या पाणीटंचाई निवारणार्थ उपाय योजनांसाठीचा खर्च संबंतिध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तर नागरी भागांत महानगर पालिका, नगर परिषदांनी राबविलेल्या किंवा राबविण्यात येणाºया उपाय योजनांचा खर्च विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरीत करावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपाय योजनांचा खर्च महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे वितरीत करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या किंवा राबविण्यात येणाºया उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने प्रशासनाला उपाययोजना राबविणे सोयीचे होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई