शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

३२ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनांना मुहूर्तच सापडेना !

By admin | Updated: February 7, 2017 15:37 IST

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून राबविण्यात येणा-या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ योजनेत वाशिम जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश झाला.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि.७ -  ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून राबविण्यात येणा-या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ या महत्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्यात मे २०१६ मध्ये वाशिम जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश झाला आहे. यासाठी तब्बल ३२ कोटी ५३ लाख १७ हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र, अद्यापही या योजनांचे काम सुरू होऊ शकले नाही.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या मागणी आधारीत धोरणांतर्गत अनेक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त विविध योजनांच्या माध्यमातून नळपाणी पुरवठा योजना, विंधन विहीरीवरील योजना या सारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. आता राष्टÑीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात सन २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षासाठी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.
 
या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ठ केलेल्या गावांची नावे राज्य शासनाने ७ मे २०१६ रोजी जाहिर केली होती. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश असून तब्बल ३२.५३ कोटींची तरतूद केली आहे. मात्र, तांत्रिक बाबींमध्ये अडकलेल्या या योजनेच्या कामांना अद्यापही सुरूवात होऊ शकली नाही. तांत्रिक बाबींची पुर्तता झाल्यानंतर कामांना सुरूवात होईल, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांनी सांगितले. 
 
 वाशिम तालुक्यातील आठ योजनांसाठी १४ कोटी ६१ लाख ४० हजार रुपये, मंगरुळपीर तालुक्यात सहा योजनांसाठी पाच कोटी ९३ लाख रुपये, रिसोड चार योजनांसाठी चार कोटी ४९ लाख १७ हजार रुपये, मालेगाव तीन योजनांसाठी तीन कोटी ७१ लाख रुपये, कारंजा तीन योजनांसाठी दोन कोटी ९३ लाख रुपये तर मानोरा तालुक्यातील एका योजनेसाठी ८५ लाख ६० रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.