शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

३२ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनांना मुहूर्तच सापडेना !

By admin | Updated: February 7, 2017 15:37 IST

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून राबविण्यात येणा-या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ योजनेत वाशिम जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश झाला.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि.७ -  ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून राबविण्यात येणा-या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ या महत्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्यात मे २०१६ मध्ये वाशिम जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश झाला आहे. यासाठी तब्बल ३२ कोटी ५३ लाख १७ हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र, अद्यापही या योजनांचे काम सुरू होऊ शकले नाही.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या मागणी आधारीत धोरणांतर्गत अनेक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त विविध योजनांच्या माध्यमातून नळपाणी पुरवठा योजना, विंधन विहीरीवरील योजना या सारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. आता राष्टÑीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात सन २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षासाठी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.
 
या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ठ केलेल्या गावांची नावे राज्य शासनाने ७ मे २०१६ रोजी जाहिर केली होती. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश असून तब्बल ३२.५३ कोटींची तरतूद केली आहे. मात्र, तांत्रिक बाबींमध्ये अडकलेल्या या योजनेच्या कामांना अद्यापही सुरूवात होऊ शकली नाही. तांत्रिक बाबींची पुर्तता झाल्यानंतर कामांना सुरूवात होईल, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांनी सांगितले. 
 
 वाशिम तालुक्यातील आठ योजनांसाठी १४ कोटी ६१ लाख ४० हजार रुपये, मंगरुळपीर तालुक्यात सहा योजनांसाठी पाच कोटी ९३ लाख रुपये, रिसोड चार योजनांसाठी चार कोटी ४९ लाख १७ हजार रुपये, मालेगाव तीन योजनांसाठी तीन कोटी ७१ लाख रुपये, कारंजा तीन योजनांसाठी दोन कोटी ९३ लाख रुपये तर मानोरा तालुक्यातील एका योजनेसाठी ८५ लाख ६० रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.