शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

३०० गावांवर पाणीटंचाईचे सावट; उपाययोजनांसाठी २.१० कोटींचा बुस्टर

By संदीप वानखेडे | Updated: February 27, 2023 14:37 IST

पाणीटंचाई कृती आराखडा : २८२ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित

संतोष वानखडे

वाशिम : उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर झाला असून, ३०० गावांत पाणीटंचाईचे सावट राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. पाणीटंचाई निवारणार्थ विहिर अधिग्रहण, टॅंकर व अन्य उपाययोजनांवर २.१० कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला.

दरवर्षी उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वीच अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊन जाते. पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असे तिमाही आराखडे तयार केले जातात. जिल्ह्यातील सहाही पंचायत समिती स्तरावरून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात या प्रस्तावांची छाननी केली. छाननीअंती प्राप्त प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्याकडे पाठविले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणीटंचाई कृती आराखड्याला अंतिम मंजूरी मिळाली असून, यामध्ये ३०० गावांचा समावेश आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्ह्यातील ६७ गावांत तर एप्रिल ते जून या तीन महिन्यांत २३३ गावांत पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली. पाणीटंचाई निवारणार्थ यंदा विहिर अधिग्रहण व टॅंकर या दोन बाबींवर भर देण्यात आला आहे.

मंगरूळपीर तालुक्यातील सर्वाधिक गावे

२०२३ च्या उन्हाळ्यात पाणीटंचाई कृती आराखड्यात मंगरूळपीर तालुक्यातील सर्वाधिक ९१ गावांचा समावेश आहे. ८८ गावांमध्ये विहिर अधिग्रहण तर तीन गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. मंगरूळपीर पाठोपाठ मानोरा तालुक्यातील ७२ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसणार असून, ६७ गावांत विहिर अधिग्रहण तर पाच गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

टॅग्स :Waterपाणीwashimवाशिमzpजिल्हा परिषद