शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

वाशिम जिल्ह्यात रस्त्यांसाठी दिला २४ हजार झाडांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:51 IST

Washim News मार्गाच्या कामांसाठी जवळपास २४ हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  (एनएचएआय) अंतर्गत पाच महामार्गांची कामे करण्यात येत आहेत. त्यातील या मार्गाच्या कामांसाठी जवळपास २४ हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्या बदल्यात महामार्गांचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी अद्याप त्यांना दिलेल्या उद्दिष्टापैकी निम्मीही झाडे लावली नाही. जिल्ह्यात वाशिम-हिंगोली,  अमरावती-हिंगोली,  अकोला-आर्णी, मालेगाव-मेहकर या राष्ट्रीय महामार्गांसह  एक-दोन जिल्हा प्रमुख मार्गांची कामे करण्यात येत आहेत. या रस्त्यांच्या कामात अडसर निर्माण होत असल्याच्या कारणावरून शे-दीडशे वर्षांपूर्वी लागवड झालेल्या जवळपास २४ हजारांहून अधिक वृक्षांची कत्तल झाली. बदल्यात मात्र निम्मेही वृक्ष लावलेले नाहीत.

वृक्षतोड दुर्दैवीच जिल्ह्यात महामार्गाच्या कामांसाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात आली. हा प्रकार पर्यावरणासाठी अत्यंत घातक आणि दुर्दैवी आहे. यामुळे प्रदूषणवाढीस वाव आहे. विशेष म्हणजे  जिल्ह्यातील नेमकी किती झाडे तोडण्यात आली. ती माहिती देण्यासह प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. -गौरव इंगळे,पर्यावरण प्रेमी, 

गत पाच वर्षांत ४४ लाख वृक्षांची लागवडराज्य शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये ११ लाख ८ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली, तर त्यानंतर राबविण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ४० लाख ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्या  महामार्गा पूर्ण वृक्ष लागवड झाली नाही.

जिल्ह्यात ४२ हजार हेक्टरवर जंगल जिल्ह्याचे भाैगोलिक क्षेत्र ५,१८६ चौरस किलोमीटर आहे. त्यात प्रादेशिक वन विभागाच्या वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव तालुक्यातील परिक्षेत्रात मिळून ४१ हजार ९७१.६६ हेक्टर क्षेत्रावर प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रात विविध प्रजातींची हजारो झाडे असून, जिल्ह्यात सोहळ काळवीट अभयारण्य असले तरी ते गवताळ आणि झुडपी जंगल आहे. 

टॅग्स :washimवाशिमenvironmentपर्यावरण