शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

वाशिम जिल्ह्यात रस्त्यांसाठी दिला २४ हजार झाडांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:51 IST

Washim News मार्गाच्या कामांसाठी जवळपास २४ हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  (एनएचएआय) अंतर्गत पाच महामार्गांची कामे करण्यात येत आहेत. त्यातील या मार्गाच्या कामांसाठी जवळपास २४ हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्या बदल्यात महामार्गांचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी अद्याप त्यांना दिलेल्या उद्दिष्टापैकी निम्मीही झाडे लावली नाही. जिल्ह्यात वाशिम-हिंगोली,  अमरावती-हिंगोली,  अकोला-आर्णी, मालेगाव-मेहकर या राष्ट्रीय महामार्गांसह  एक-दोन जिल्हा प्रमुख मार्गांची कामे करण्यात येत आहेत. या रस्त्यांच्या कामात अडसर निर्माण होत असल्याच्या कारणावरून शे-दीडशे वर्षांपूर्वी लागवड झालेल्या जवळपास २४ हजारांहून अधिक वृक्षांची कत्तल झाली. बदल्यात मात्र निम्मेही वृक्ष लावलेले नाहीत.

वृक्षतोड दुर्दैवीच जिल्ह्यात महामार्गाच्या कामांसाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात आली. हा प्रकार पर्यावरणासाठी अत्यंत घातक आणि दुर्दैवी आहे. यामुळे प्रदूषणवाढीस वाव आहे. विशेष म्हणजे  जिल्ह्यातील नेमकी किती झाडे तोडण्यात आली. ती माहिती देण्यासह प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. -गौरव इंगळे,पर्यावरण प्रेमी, 

गत पाच वर्षांत ४४ लाख वृक्षांची लागवडराज्य शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये ११ लाख ८ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली, तर त्यानंतर राबविण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ४० लाख ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्या  महामार्गा पूर्ण वृक्ष लागवड झाली नाही.

जिल्ह्यात ४२ हजार हेक्टरवर जंगल जिल्ह्याचे भाैगोलिक क्षेत्र ५,१८६ चौरस किलोमीटर आहे. त्यात प्रादेशिक वन विभागाच्या वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव तालुक्यातील परिक्षेत्रात मिळून ४१ हजार ९७१.६६ हेक्टर क्षेत्रावर प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रात विविध प्रजातींची हजारो झाडे असून, जिल्ह्यात सोहळ काळवीट अभयारण्य असले तरी ते गवताळ आणि झुडपी जंगल आहे. 

टॅग्स :washimवाशिमenvironmentपर्यावरण