शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

अतिवृष्टीच्या मदतीची २१७५ शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:23 IST

अद्यापही शेतकºयांना या नुकसानपोटी आर्थिक मदत मंजूर झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यंदा २२ जूननंतर काही भागांत वारंवार अतिवृष्टी झाली. यात शेकडो हेक्टर शेत जमीन पिकांसह खरडली. तालुकास्तरावर महसूल प्रशासनाने या नुकसानाचे पंचनामे करून जिल्हास्तरावर अहवाल सादर केला. जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे २१७५ शेतकऱ्यांच्या ८४७ एकर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केला आहे; परंतु अद्यापही शेतकºयांना या नुकसानपोटी आर्थिक मदत मंजूर झाली नाही.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर सुरुवातीच्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला. तथापि, २२ जूननंतर जिल्ह्यातील अनेक भागांत अतिवृष्टीने थैमान घातले. त्यात कारंजा तालुक्यातील धनज बु.सह परिसरात २२ जूननंतर अतिवृष्टीमुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील पिके आणि शेतजमीनही खरडून गेली. शिवाय मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड आणि वाशिम तालुक्यातही जूनच्या अखेर आणि जुलैच्या सुरुवातीला अतिवृष्टी होऊन शेतकºयांना मोठा फटका बसला. महसूल प्रशासनाच्यावतीने तलाठ्यांनी या नुकसानाचे पंचनामे केले आणि प्राथमिक अहवाल तहसीलस्तरावर सादर केला. त्यानंतर मंडळ अधिकाºयांनी या पंचनाम्यांच्या आधारे अंतीम अहवाल तयार करून तो तहसीलदारांमार्फत जिल्हास्तरावर पाठविला.जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभागाने अहवालाचंी पडताळणी करून बाधित शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी विभागस्तरावर मागणी नोंदविण्यासाठी अहवाल तयार केला. तथापि, दोन महिने उलटले तरी, जिल्ह्यातील एकाही नुकसानग्रस्त शेतकºयाला अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही.

शिरपूर येथे गत महिन्यात अतिवृष्टी झाली. यामुळे नाल्यास पूर येऊन आमच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे खरीप हंगामात बहरलेल्या पिकांचे नुकसान झाले. आता दीड महिना उलटला तरी, प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकली नाही. याची दखल वरिष्ठांनी त्वरीत घेऊन आम्हाला मदत मंजूर करावी.- राजकुमार भालेरावशेतकरी, शिरपूर जैन

शिरपूर येथे गत महिन्यात अतिवृष्टी झाली. यामुळे नाल्यास पूर येऊन आमच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे खरीप हंगामात बहरलेल्या पिकांचे नुकसान झाले. आता दीड महिना उलटला तरी, प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकली नाही. याची दखल वरिष्ठांनी त्वरीत घेऊन आम्हाला मदत मंजूर करावी.- राजकुमार भालेरावशेतकरी,शिरपूर जैन

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी