शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

कृती आराखडा २.१७ कोटींचा; खर्च झाले केवळ ८० लाख!

By admin | Updated: July 4, 2017 02:25 IST

पाणीटंचाई उपाययोजनांवरील खर्चात कपात : जिल्ह्यात यंदा केवळ १८ टँकर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची हजारो कामे पूर्ण झाली असून, जलस्रोतांची पाणीपातळी कायम राहण्यास मदत मिळत आहे. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई उपाययोजनांवरील खर्चातही कोट्यवधी रुपयांची बचत झाली असून, २.१७ कोटी रुपयांचा आराखडा तयार असताना जूनअखेर केवळ ८० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी सोमवारी दिली.‘पाणी अडवा-पाणी जिरवा’, या संकल्पनेचा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून सन २०१९ पर्यंत संपूर्ण राज्य पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने २०१५-१६ पासून राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्यावर्षी वाशिम जिल्ह्यातील २०० गावांचा या अभियानात समावेश झाला होता. त्यात वाशिम २६, रिसोड २७, मालेगाव २५, मानोरा ६१, मंगरूळपीर २७ आणि कारंजा तालुक्यातील ३४ गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तसेच गतवर्षी अर्थात २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील १५४ गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे पाणीपुरवठा करणारे प्रकल्प, हातपंप, विहिरी आदी जलस्रोतांची पाणीपातळी कायम राहण्यास मोठी मदत मिळाली. त्याचाच परिपाक म्हणून गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा ३.५१ कोटी रुपयांनी कमी झाला. गतवर्षी ५६१ गावांमध्ये पाणीटंचाई जाहीर झाली होती. त्यासाठी ५.६८ कोटी रुपयांची तरतूद करून तेवढाच निधी खर्च झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. यंदा मात्र २५२ गावांमध्ये २५२ उपाययोजनांकरिता २.१७ कोटी रुपये खर्च होतील, अशा स्वरूपाचा कृती आराखडा तयार करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र जूनअखेर १५२ गावांमध्येच १८१ उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यावर ८० लाख रुपयांच्या आसपास खर्च झाला असून, तसा सविस्तर अहवाल आणि निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे लवकरच सादर केला जाईल, अशी माहिती हिंगे यांनी दिली.कृती आराखडा जाहीर झाला दोन महिने उशिरा!जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून दरवर्षी साधारणत: डिसेंबर महिन्यात पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षी मात्र पंचायत समिती स्तरावरून विलंब झाल्याने कृती आराखडा तब्बल दोन महिने उशिरा अर्थात फेब्रुवारी २०१७ मध्ये जाहीर करण्यात आला. तेव्हापासून जूनअखेरपर्यंत जिल्ह्यातील पाच गावांमध्ये नळयोजना दुरूस्ती, १९ गावांमध्ये १८ टँकर, १२८ गावांमध्ये १६१ खासगी विहिरींचे अधिग्रहण, अशा एकंदरित १५२ गावांमध्ये १८१ उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यावर ८० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी दिली.१० वर्षांत प्रथमच टँकरचा आकडा घटला!जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तसेच सर्वाधिक खर्च याच उपाययोजनेवर होतो. यंदा मात्र गेल्या दहा वर्षांची स्थिती बदलत केवळ १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. २००८-०९ मध्ये १०१, २००९-१० मध्ये १३५; तर २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये १०० टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता, हे विशेष.