शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

कृती आराखडा २.१७ कोटींचा; खर्च झाले केवळ ८० लाख!

By admin | Updated: July 4, 2017 02:25 IST

पाणीटंचाई उपाययोजनांवरील खर्चात कपात : जिल्ह्यात यंदा केवळ १८ टँकर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची हजारो कामे पूर्ण झाली असून, जलस्रोतांची पाणीपातळी कायम राहण्यास मदत मिळत आहे. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई उपाययोजनांवरील खर्चातही कोट्यवधी रुपयांची बचत झाली असून, २.१७ कोटी रुपयांचा आराखडा तयार असताना जूनअखेर केवळ ८० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी सोमवारी दिली.‘पाणी अडवा-पाणी जिरवा’, या संकल्पनेचा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून सन २०१९ पर्यंत संपूर्ण राज्य पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने २०१५-१६ पासून राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्यावर्षी वाशिम जिल्ह्यातील २०० गावांचा या अभियानात समावेश झाला होता. त्यात वाशिम २६, रिसोड २७, मालेगाव २५, मानोरा ६१, मंगरूळपीर २७ आणि कारंजा तालुक्यातील ३४ गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तसेच गतवर्षी अर्थात २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील १५४ गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे पाणीपुरवठा करणारे प्रकल्प, हातपंप, विहिरी आदी जलस्रोतांची पाणीपातळी कायम राहण्यास मोठी मदत मिळाली. त्याचाच परिपाक म्हणून गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा ३.५१ कोटी रुपयांनी कमी झाला. गतवर्षी ५६१ गावांमध्ये पाणीटंचाई जाहीर झाली होती. त्यासाठी ५.६८ कोटी रुपयांची तरतूद करून तेवढाच निधी खर्च झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. यंदा मात्र २५२ गावांमध्ये २५२ उपाययोजनांकरिता २.१७ कोटी रुपये खर्च होतील, अशा स्वरूपाचा कृती आराखडा तयार करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र जूनअखेर १५२ गावांमध्येच १८१ उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यावर ८० लाख रुपयांच्या आसपास खर्च झाला असून, तसा सविस्तर अहवाल आणि निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे लवकरच सादर केला जाईल, अशी माहिती हिंगे यांनी दिली.कृती आराखडा जाहीर झाला दोन महिने उशिरा!जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून दरवर्षी साधारणत: डिसेंबर महिन्यात पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षी मात्र पंचायत समिती स्तरावरून विलंब झाल्याने कृती आराखडा तब्बल दोन महिने उशिरा अर्थात फेब्रुवारी २०१७ मध्ये जाहीर करण्यात आला. तेव्हापासून जूनअखेरपर्यंत जिल्ह्यातील पाच गावांमध्ये नळयोजना दुरूस्ती, १९ गावांमध्ये १८ टँकर, १२८ गावांमध्ये १६१ खासगी विहिरींचे अधिग्रहण, अशा एकंदरित १५२ गावांमध्ये १८१ उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यावर ८० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी दिली.१० वर्षांत प्रथमच टँकरचा आकडा घटला!जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तसेच सर्वाधिक खर्च याच उपाययोजनेवर होतो. यंदा मात्र गेल्या दहा वर्षांची स्थिती बदलत केवळ १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. २००८-०९ मध्ये १०१, २००९-१० मध्ये १३५; तर २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये १०० टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता, हे विशेष.