शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

‘समृद्धी’साठी वाशिम जिल्ह्यातील ११८२ हेक्टर जमीन संपादित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 3:07 PM

कारंजा तालुक्यातील दोनद बुद्रूक या गावातून वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची सुरुवात होणार असून, रिसोड तालुक्यातील केनवड येथे संपणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील १ हजार १८२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. याकरिता ५९३ कोटी ५५ लाख रुपये मोबदला वितरीत करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामांशी सांगड घालून मृद व जलसंधारणाची कामेही केली जात आहेत.राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातील ५५ गावांतून जात असून, जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर ९७.२३३ किलोमीटर असणार आहे. कारंजा तालुक्यातील दोनद बुद्रूक या गावातून वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची सुरुवात होणार असून, रिसोड तालुक्यातील केनवड येथे संपणार आहे. या महामार्गावर कारंजा तालुक्यातील २३ मंगरुळपीर तालुक्यातील १०, मालेगाव तालुक्यातील २१ आणि रिसोड तालुक्यातील एक गाव येणार आहे. या महामार्गासाठी संबंधित गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यास दोन वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला आणि आज रोजी जिल्ह्यातील १ हजार १८२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमीनीसाठी शेतकऱ्यांना ५९३ कोटी ५५ लाख रुपये मोबदला वितरीत करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामांशी सांगड घालून मृद व जलसंधारणाची कामेही केली जात आहेत. त्यामुळे शेतकºयांना दुहेरी फायदा मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी या संदर्भात १५ आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात माहिती दिली. समृद्धी महामार्गासाठी पहिल्या टप्प्यात ८९० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून लँड पुलिंग योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील जमिनींची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील गावे समृद्धी महामार्ग पॅकेज दोन अंतर्गत येत असल्याने जमिनींची वेगात खरेदी करणे आवश्यक होते. ही प्रक्रिया अनेक अडथळ्यानंतर सुरू झाली आणि या महामार्गाच्या कामाला सुरुवातही झाली.सुरुवातीला वाशिम जिल्ह्यात लँण्डपुलिंगअंतर्गत जमीन अधिग्रहणाला शेतकºयांचा प्रचंड विरोध होता; परंतु मार्च २०१७ च्या मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील आढावा सभेत तिप्पट मोबदल्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शेतकºयांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आणि मिळणाºया मोबदल्याबाबत बहुतांश शेतकºयांनी समाधानही व्यक्त केले.

मोबदल्याबाबत काही शेतकरी निराशवाशिम जिल्ह्यात लँण्डपुलिंगअंतर्गत जमीन अधिग्रहणाला शेतकºयांचा प्रचंड विरोध होता; परंतु मार्च २०१७ च्या मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथील आढावा सभेत तिप्पट मोबदल्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शेतकºयांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आणि मिळणाºया मोबदल्याबाबत बहुतांश शेतकºयांनी समाधानही व्यक्त केले. तथापि, अद्याप विविध कारणांमुळे काही शेतकºयांचा मोबदला प्रलंबित असतानाच या मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पार पडल्यानंतरही शासनाकडून मिळालेल्या मोबदल्याबाबत काही शेतकरी निराश आहेत. त्यामुळेच काही शेतकºयांनी या महिन्याच्या सुरुवातीपर्यंतही जमिनीचा ताबा सोडला नव्हता.

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग