शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आणेवारी जास्त असल्याने मंगरुळपीर तालुक्यातील १९ गावे पीकविमा व दुष्काळ सुविधेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:59 PM

मंगरुळपीर : तालुक्यातील १३८ पैकी ११८ गावांची आणेवारी ५० टक्क्यांच्या आत असून उर्वरित १९ गावांची आणेवारी जास्त असल्याने या गावातील शेतकऱ्यांना पीकविमा व ८ प्रकारच्या दुष्काळी सुविधांपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्दे ७७४ गावांमध्ये आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या गावांना त्याचा लाभ विविध रूपाने मिळणार आहे.१९ गावांची अंतिम आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या १९ गावातील लोकांना या सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे.

- नाना देवळे 

मंगरुळपीर : तालुक्यातील १३८ पैकी ११८ गावांची आणेवारी ५० टक्क्यांच्या आत असून उर्वरित १९ गावांची आणेवारी जास्त असल्याने या गावातील शेतकऱ्यांना पीकविमा व ८ प्रकारच्या दुष्काळी सुविधांपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.          तालुक्यात मागील खरीप हंगामात दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात उत्पादनात फटका बसला आहे. शासनाने दुष्काळाची परिस्थिती विचारात घेता ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ उपाययोजना लागू केल्या होत्या. वाशिम जिल्ह्यतील ७७४ गावांमध्ये सन २०१७-१८  मधील अंतिम आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या गावांना त्याचा लाभ विविध रूपाने मिळणार आहे. जमीन महसूल सूट, सहकारी कजार्चे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलात ३३.५० टक्के सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पाणीपुरवठ्यासाठी टँकर, टंचाईग्रस्त गावात कृषी पंपाची वीज खंडित न करणे अशा विविध सुविधांचा लाभ या गावांमधील शेतकऱ्यांना होणार आहे. मंगरुळपीर तालुक्यातील १३८ पैकी ११८ गावांचा यात समावेश आहे. सन २०१७-१८ मधील खरीप हंगामातील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या गावातील शेतकºयांना मोठ्या प्रमाणात पीक विमा योजनेचा लाभसुद्धा मिळत आहे. मात्र १९ गावांची अंतिम आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या १९ गावातील लोकांना या सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे.  अंतिम आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या गावांमध्ये शेलुबाजार, लाठी, चिखली, नांदखेडा, मालशेलु, वनोजा, येडशी, गोगरी, हिरंगी, खेरडा बु, खेरडा खु, चोरद, जनुना खु, शेंदूरजना मोरे, मजलापूर, भुर, पूर, रुई व तांदली या गावाचा समावेश आहे. त्यामुळे या गावांमधील शेतकऱ्यांना पीक विमा तसेच जिल्ह्यातील ७७४ गावांना मिळणार असलेल्या जमीन महसूल सूट, सहकारी कजार्चे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलात ३३.५०  टक्के सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पाणीपुरवठ्यासाठी टँकर, टंचाईग्रस्त गावात कृषी पंपाची वीज खंडित न करणे या सुविधांचासुद्धा लाभ मिळणार नसल्याचे समजते. जिल्ह्यात सध्या पीक विमा रकमेचे वाटप जोमात सुरू असून पहिल्यांदाच आणेवारी कमी असल्याने शेतकºयांना घसघशीत पीकविमा मिळत आहे. ऐन अडचणीच्या कामात पीक विमा मोबदला कामी येत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. अशातच  पीक विमा न काढणारे शेतकरी मात्र या लाभापासून वंचित राहिले आहेत. आता या वंचित शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त आणेवारी असलेल्या १९ गावातील शेतकरी सुद्धा सोबती झाले आहेत. इतर गावातील शेतकऱ्यांना  इन्शुरन्स कंपनीकडून बऱ्यापैकी विमा मिळत असतांना विमा भरूनसुद्धा विमा मिळण्याची शक्यता  आणेवारी जास्त असलेल्या १९ गावांमध्ये नाही त्यामुळे शासकीय आकडेवारीच्या गोंधळात सापडून या गावांमधील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा पिक विमा मोबादल्यापासून वंचित राहावे लागणार असल्याने शासनाने सरसकट तालुक्यातील गावांना ५० टक्क्यांच्या आतील अंतिम आणेवारी लागू करून शेतकºयांना पीक विमा व दुष्काळी सुविधांचा लाभ देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा