शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १.७६ कोटींचे वितरण; खात्यात जमा होतेय रक्कम

By दादाराव गायकवाड | Updated: September 24, 2022 15:52 IST

जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटीचा निधी प्राप्त झाला असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

वाशिम : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात संततधार पाऊस आणि अतिवृष्टीने लाखो हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटीचा निधी प्राप्त झाला असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत संततधार पाऊस झाला. या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ४९ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीने अनेक भागातील जमिनी खरडून गेल्या आहेत. जुलै महिन्यात बरसलेल्या पावसामुळे १२९७.७२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होऊन ५८५६ शेतकऱ्यांना फटका बसला. ऑगस्ट महिन्यात १.४२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जून ते ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा अहवाल शासनस्तरावर पाठविण्यात आला. या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात जून ते जुलै महिन्यातील नुकसानापोटी १.७६ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला. हा निधी २२ सप्टेंबर रोजीच तहसीलस्तरावर वर्ग करून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधीची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात मालेगाव, कारंजा आणि मानोरा या तीनच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १ कोटी ७६ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे वितरण सुरू आहे.

मालेगाव तालुक्यात नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक -जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक १२८६.६० हेक्टरवर पिकांचे नुकसान मालेगाव तालुक्यात झाले. त्याखालोखाल कारंजा तालुक्यात, तर मानोरा तालुक्यात अत्यल्प नुकसान झाले. उर्वरित मंगरुळपीर, वाशिम व रिसोड तालुक्यात ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान ‘निरंक’ असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही.

कोणत्या तालुक्यासाठी किती निधी -मालेगाव - १,७४,८३,८००कारंजा - १,१२,८००मानोरा - ५४,४००

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारRainपाऊस