शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १.७६ कोटींचे वितरण; खात्यात जमा होतेय रक्कम

By दादाराव गायकवाड | Updated: September 24, 2022 15:52 IST

जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटीचा निधी प्राप्त झाला असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

वाशिम : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात संततधार पाऊस आणि अतिवृष्टीने लाखो हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटीचा निधी प्राप्त झाला असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत संततधार पाऊस झाला. या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ४९ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीने अनेक भागातील जमिनी खरडून गेल्या आहेत. जुलै महिन्यात बरसलेल्या पावसामुळे १२९७.७२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होऊन ५८५६ शेतकऱ्यांना फटका बसला. ऑगस्ट महिन्यात १.४२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जून ते ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा अहवाल शासनस्तरावर पाठविण्यात आला. या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात जून ते जुलै महिन्यातील नुकसानापोटी १.७६ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला. हा निधी २२ सप्टेंबर रोजीच तहसीलस्तरावर वर्ग करून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधीची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात मालेगाव, कारंजा आणि मानोरा या तीनच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १ कोटी ७६ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे वितरण सुरू आहे.

मालेगाव तालुक्यात नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक -जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक १२८६.६० हेक्टरवर पिकांचे नुकसान मालेगाव तालुक्यात झाले. त्याखालोखाल कारंजा तालुक्यात, तर मानोरा तालुक्यात अत्यल्प नुकसान झाले. उर्वरित मंगरुळपीर, वाशिम व रिसोड तालुक्यात ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान ‘निरंक’ असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही.

कोणत्या तालुक्यासाठी किती निधी -मालेगाव - १,७४,८३,८००कारंजा - १,१२,८००मानोरा - ५४,४००

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारRainपाऊस