शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

वाशिम : १.७९ लाख शेतकऱ्यांना १३९.९९ कोटींची मदत वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 13:50 IST

२ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असून त्यांना मदतीसाठी शासनाकडून १७९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असून त्यांना मदतीसाठी शासनाकडून १७९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. १७ डिसेंबरअखेर त्यातील १.७९ लाख शेतकºयांना १३९.९९ कोटींचे बँकांमार्फत वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख ८३ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिके, २९०५ हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिके आणि ४३४ हेक्टर फळपिकाखालील क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात एकूण २ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असन मदतीकरिता १९७ कोटींचा निधी अपेक्षित असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार, राज्यशासनाने १९ नोव्हेंबरच्या शासन निर्णयान्वये ५६.५१ कोटी आणि १३ डिसेंबरच्या शासन निर्णयान्वये १२३.४८ कोटी असा एकूण १७९.९९ कोटींचा निधी मंजूर केला. १७ डिसेंबरअखेर या निधीपैकी १.७९ लाख शेतकºयांना १३९.९९ कोटींचा निधी वितरित करण्यात आला. मदत वाटपात वाशिम जिल्हा क्रमांक एकवर

अवकाळी पावसाने पीक नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी मंजूर झालेला मदतनिधी वाटपाची प्रक्रिया सद्या सुरू असून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक गतीने मदतनिधी वाटपात वाशिम जिल्ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. १७ डिसेंबरअखेर प्राप्त निधीच्या ७७ टक्के निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी