शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

१७ पैकी १३ प्रकल्प कोरडेठण्ण !

By admin | Updated: May 7, 2017 19:26 IST

१७ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प कोरडे तर २ प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहचला आहे.

रिसोड : तालुक्यातील १७ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प कोरडे तर २ प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहचला आहे. केवळ दोन प्रकल्पात सरासरी १० टक्के जलसाठा आहे. यंदा जिल्हाभरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या दाहकतेचा सर्वाधिक फटका रिसोड तालुक्यात दिसून येत आहे. भूगर्भातील पाणी पातळी देखील कमालीची खालावल्याने विहीरी, हातपंप, कूपनलीका आटल्या आहेत. त्यामुळे रिसोड शहरासह ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. पावसाळ्याला अजून बराच अवधी असल्याने भविष्यात पाणी समस्या उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.  निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात अल्प पाऊस पडत आहे. परिणामी हिवाळ्यातच नदी नाल्यासह पाण्याचे बहुतांश जलाशये कोरडेठण्ण पडतात. २०१६ च्या पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. मात्र, प्रकल्प परिसरात पाऊस समाधानकारक नसल्याने प्रकल्पातील जलसाठयात म्हणावी तशी वाढ झाली नव्हती. आता तर तब्बल १३ प्रकल्प कोरडेठण्ण असून, दोन प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहोचला आहे. जलपातळी खालावल्याने आणि जलाशयांमध्ये जलसाठा नसल्याने रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला. तालुक्यातील नागरिकांना उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे चटके असह्य करून सोडत आहेत. पाणीटंचाईच्या आगीत नागरिक होरपळत असतानादेखील संबंधित प्रशासन ठोस उपाययोजना करीत नसल्याने जनतेमध्ये संतापाची लाट आहे.