शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१७ पैकी १३ प्रकल्प कोरडेठण्ण !

By admin | Updated: May 7, 2017 19:26 IST

१७ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प कोरडे तर २ प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहचला आहे.

रिसोड : तालुक्यातील १७ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प कोरडे तर २ प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहचला आहे. केवळ दोन प्रकल्पात सरासरी १० टक्के जलसाठा आहे. यंदा जिल्हाभरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या दाहकतेचा सर्वाधिक फटका रिसोड तालुक्यात दिसून येत आहे. भूगर्भातील पाणी पातळी देखील कमालीची खालावल्याने विहीरी, हातपंप, कूपनलीका आटल्या आहेत. त्यामुळे रिसोड शहरासह ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. पावसाळ्याला अजून बराच अवधी असल्याने भविष्यात पाणी समस्या उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.  निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात अल्प पाऊस पडत आहे. परिणामी हिवाळ्यातच नदी नाल्यासह पाण्याचे बहुतांश जलाशये कोरडेठण्ण पडतात. २०१६ च्या पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. मात्र, प्रकल्प परिसरात पाऊस समाधानकारक नसल्याने प्रकल्पातील जलसाठयात म्हणावी तशी वाढ झाली नव्हती. आता तर तब्बल १३ प्रकल्प कोरडेठण्ण असून, दोन प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहोचला आहे. जलपातळी खालावल्याने आणि जलाशयांमध्ये जलसाठा नसल्याने रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला. तालुक्यातील नागरिकांना उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे चटके असह्य करून सोडत आहेत. पाणीटंचाईच्या आगीत नागरिक होरपळत असतानादेखील संबंधित प्रशासन ठोस उपाययोजना करीत नसल्याने जनतेमध्ये संतापाची लाट आहे.