शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जि.प. माजी सदस्याच्या सधन मुलाला गरिबांसाठीच्या घरकूल योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:36 IST

Home News : याविरोधात पंचायत समिती सभेत विचारणा झाल्यावर पंचायत समितीने विस्तार अधिकारी विनोद पाटील आणि अविनाश उराडे यांना चौकशीचे आदेश दिले होते.

पालघर : जिल्हा परिषदेच्या एका माजी सदस्यांच्या सधन असलेल्या मुलाला कोंढाण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जितेंद्र संखे यांनी बेकायदेशीररीत्या घरकूल योजनेचा लाभ दिल्याने गरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असलेल्या योजनेचा दुरुपयोग केला गेला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी घेऊन ग्रामसेवक संखे आणि केंद्र प्रमुख ईश्वर दळवी यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्याकडील शासन निर्णयाप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कोंढाण ग्रामपंचायत हद्दीतील २०१५ च्या प्राधान्य यादीतील पात्र लाभार्थ्यांची वर्गवारी ग्रामसभेत करण्यात आली होती. ग्रामसभेत घेतलेल्या ठरवानुरूप इतर संवर्गातून २५ तर अनुसूचित जमाती संवर्गातील यादीमधून ५० लाभार्थी पात्र ठरविण्यात आले होते. त्यानुसार इतर संवर्गातील यादीतून अमोल अच्युत पाटील यांना पात्र म्हणून निवड करण्यात आली होती. ग्रामविकास अधिकारी संखे व क्षेत्रीय अधिकारी यांनी प्राधान्यक्रम यादीतील पात्र लाभार्थ्यांची प्रत्यक्षात घर व जमिनीची खात्री करून जागा स्वतःची असल्याबाबत अहवाल पंचायत समितीकडे देण्यात आला होता. त्यामुळे सदरचा अहवाल ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविल्यानंतर तो मंजूर करण्यात आला होता. पंचायत समिती सदस्य महेंद्र अधिकारी यांनी ही बाब माहितीच्या अधिकाराखाली समोर आणली आहे.प्राधान्यक्रम यादीनुसार लाभार्थी पाटील यांचे घरकुलाचे काम सुरू करण्यापूर्वी त्यांचे घर व नवीन बांधकामाच्या ठिकाणाच्या जिओ टॅगिंग करण्यात आले होते. ग्रामपंचायतमधील आकारणी नोंदवही नमुना ८ मध्ये सदर लाभार्थ्यांच्या नावे २००५-०६ पर्यंत झोपडी असल्याची नोंद असून त्यानंतर २०१९-२० पर्यंत झोपडी किंवा विटा माती इमारत अशी नोंद आहे. त्यामुळे एका सधन असलेल्या व्यक्तीला घरकुल योजनेचा लाभ दिल्याची गंभीर बाब समोर आली होती. याविरोधात पंचायत समिती सभेत विचारणा झाल्यावर पंचायत समितीने विस्तार अधिकारी विनोद पाटील आणि अविनाश उराडे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालात सदर घरकुल चुकीचे वाटप करण्यात आल्याचा ठपका ठेवून ते रद्द करीत ग्रामविकास अधिकारी संखे आणि केंद्र प्रमुख दळवी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे. अहवालात ठपका पंचायत समिती सभेत विचारणा झाल्यावर विस्तार अधिकारी विनोद पाटील आणि अविनाश उराडे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालात सदर घरकुल चुकीचे वाटप करण्यात आल्याचा ठपका ठेवला आहे. 

टॅग्स :Homeघरpalgharपालघर