शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हा परिषदेत होणार महाविकास आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 01:01 IST

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना (१८) आणि राष्ट्रवादी (१४) मिळून बहुमताचा आकडा होत असल्याने राज्याच्या महाआघाडीप्रमाणे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी महाविकास आघाडी होण्याची दाट शक्यता आहे.

हितेन नाईकपालघर : पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना (१८) आणि राष्ट्रवादी (१४) मिळून बहुमताचा आकडा होत असल्याने राज्याच्या महाआघाडीप्रमाणे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी महाविकास आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. त्याच वेळी शिवसेना या आघाडीतून जिल्ह्यातील एक नंबरचा शत्रू असलेल्या बहुजन विकास आघाडीला मात्र आघाडीबाहेर ठेवले जाणार आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ सदस्यांपैकी शिवसेना १८, राष्ट्रवादी १४, भाजप १२, माकप ५, बविआ ४, अपक्ष ३ तर काँग्रेस १ असे संख्याबळ आहे. शिवसेना १८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा २९ हा आकडा पार करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी (१४ जागांसह) काँग्रेस (१) आणि जिजाऊ संघटना (अपक्ष) (१) अशी साथ मिळवावी लागणार आहे.राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी महाआघाडीची सत्ता नांदत असल्याने पालघर जिल्हा परिषदेतही हीच महाआघाडी सत्ता स्थापन करेल, असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या अडीच वर्षाचे आरक्षण महिला (अनुसूचित जमातीसाठी) साठी राखीव असून सत्ता स्थापनेत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना पहिल्या अडीच वर्षाच्या अध्यक्षपदाचा दावा करणार असल्याचे कळते. राष्ट्रवादी पक्षानेही ते मान्य केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. पुढच्या अडीच वर्षाचे आरक्षण बदलल्यास अध्यक्षपदाचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे. शिवसेनेकडून शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांचीपत्नी अमिता घोडा, वैदेही वाढाण आणि भारती कामडी यांचीही नावे चर्चेत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या १४ पैकी विक्रमगडमधील ३, जव्हारमधील १, वाडामधील ४ जागा आपल्या ताकदीवर निवडून आणण्यात यशस्वी झालेले आणि स्वत:ही अपक्ष म्हणून निवडून आलेल्या जिजाऊ संस्थेच्या नीलेश सांबरे यांची उपाध्यक्षपदासाठी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तर सेनेकडून सतत पाच वर्षांपासून निवडून येणाऱ्या प्रकाश निकम यांची वर्णी लागू शकते. चार सभापतीपदांचे दोन्ही पक्षात समसमान वाटप केले जाऊ शकते.राज्यात भाजप सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना बविआने भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र नंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यावर महाविकास आघाडीला पाठिंबा देणाºया बविआची राज्यात साथ असली तरी जिल्ह्यात सेना आणि बविआमधून विस्तवही जात नाही. त्यामुळे इथे जिल्ह्यात सेनेच्या पदाधिकारी, शिवसैनिकांमधून कुठल्याही परिस्थितीत बविआला सत्तेत घेऊ नये अशी मागणी केली जात आहे. त्याच वेळी सेना आणि राष्ट्रवादी या दोघांची बेरीज बहुमताचा आकडा पार करीत असल्याने बविआला बरोबर घेण्याची गरजही निर्माण होणार नाही. तर राज्यातील महाआघाडीच्या सत्तेत माकपने पाठिंबा न दर्शवता तटस्थ राहिल्याने इथेही त्यांची तटस्थची भूमिका असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.>‘मातोश्री’च्या आश्वासनामुळे अमिता घोडा यांना लागणार अध्यक्षपदाची लॉटरी?अलीकडेच झालेल्या पालघर विधानसभा निवडणुकीत सेनेतून बंडखोरी करून राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरून सेनेचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास वणगा यांच्याविरोधात शड्डू ठोकणाºया अमित घोडा यांची उमेदवारी वणगा यांना धोकादायक ठरू लागली होती. त्यामुळे अमित घोडा यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी त्यांना मातोश्रीची वारी घडविण्यात आली होती. अमित घोडा यांना माघार घेण्याच्या मोबदल्यात त्यांच्या पत्नी अमिता घोडा यांना उमेदवारी आणि सत्ता आल्यास अध्यक्षपद असे आश्वासन देण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मातोश्रीचा शब्द अंतिम समजला जात असल्याने अमिता घोडा यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते. दुसरीकडे अमित घोडा शिवसेनेच्या इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जुमानत नसल्याने अमिता घोडा यांना अध्यक्षपद न देता ते अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहणाºया वैदेही वाढाण अथवा भारती कामडी यांना देण्यात यावे, असे इथल्या पदाधिकाºयांनी सेनेच्या श्रेष्ठींना कळवल्याचे समजते.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी