शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

सापांना जीवनदान देणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 00:52 IST

साप म्हटले की अनेकांना धडकी भरते. अनेकदा त्यांना मारण्यासाठी हात सरसावतात.

- वसंत भोईरवाडा - साप म्हटले की अनेकांना धडकी भरते. अनेकदा त्यांना मारण्यासाठी हात सरसावतात, मात्र लहानपणी सापांना विनाकारण मारताना त्याने पाहिले आणि ठरवले विनाकारण आपल्याला त्रास न देणा-या सापांचे आपण रक्षण करायचे आणि सुरू झाला प्रवास एका सर्प रक्षकाचा !वाडा तालुक्यातील चिखले येथील सागर पाटील या तरूणाने आजपर्यंत शेकडो सापांचे प्राण वाचवले आहेत. सागर याने आजपर्यंत नाग, मण्यार, अजगर, फोडसा, कांबळ्या अशा विषारी सापांना पकडून जंगलात सुरक्षितस्थळी सोडले आहे. स्वत:चे अन्न शोधण्यासाठी बाहेर पडणारे साप भीतीपोटी व अंधश्रध्देपायी माणसाकडून विनाकारण मारले जातात.खरं तर प्रत्येक जीव हा अन्नसाखळीतील व पर्यायाने पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांना मारून आपण कळत नकळत पर्यावरण संतुलनावरच घाला घालत आहोत. अलिकडच्या काळात सापांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून वैविध्यतेचे प्रमाणही कमी झाले आहे. निसर्गचक्र सुरळीतपणे चालण्यासाठी साप वाचवणे गरजेचे आहे. यासाठीच मी सापांच्या रक्षण करण्याचे ठरवले आहे असे सागर सांगतो.तालुक्यातील विविध गावांमधून त्याने दोनशेहून अधिक साप पकडले असून ते वाडा वन विभागाच्या मदतीने जंगलात सुरक्षितस्थळी सोडले आहेत. कुणीही सापांना मारू नये, जर आपल्या परिसरात साप आढळून आल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सागर पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार