शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

सापांना जीवनदान देणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 00:52 IST

साप म्हटले की अनेकांना धडकी भरते. अनेकदा त्यांना मारण्यासाठी हात सरसावतात.

- वसंत भोईरवाडा - साप म्हटले की अनेकांना धडकी भरते. अनेकदा त्यांना मारण्यासाठी हात सरसावतात, मात्र लहानपणी सापांना विनाकारण मारताना त्याने पाहिले आणि ठरवले विनाकारण आपल्याला त्रास न देणा-या सापांचे आपण रक्षण करायचे आणि सुरू झाला प्रवास एका सर्प रक्षकाचा !वाडा तालुक्यातील चिखले येथील सागर पाटील या तरूणाने आजपर्यंत शेकडो सापांचे प्राण वाचवले आहेत. सागर याने आजपर्यंत नाग, मण्यार, अजगर, फोडसा, कांबळ्या अशा विषारी सापांना पकडून जंगलात सुरक्षितस्थळी सोडले आहे. स्वत:चे अन्न शोधण्यासाठी बाहेर पडणारे साप भीतीपोटी व अंधश्रध्देपायी माणसाकडून विनाकारण मारले जातात.खरं तर प्रत्येक जीव हा अन्नसाखळीतील व पर्यायाने पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांना मारून आपण कळत नकळत पर्यावरण संतुलनावरच घाला घालत आहोत. अलिकडच्या काळात सापांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून वैविध्यतेचे प्रमाणही कमी झाले आहे. निसर्गचक्र सुरळीतपणे चालण्यासाठी साप वाचवणे गरजेचे आहे. यासाठीच मी सापांच्या रक्षण करण्याचे ठरवले आहे असे सागर सांगतो.तालुक्यातील विविध गावांमधून त्याने दोनशेहून अधिक साप पकडले असून ते वाडा वन विभागाच्या मदतीने जंगलात सुरक्षितस्थळी सोडले आहेत. कुणीही सापांना मारू नये, जर आपल्या परिसरात साप आढळून आल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सागर पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार