शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

खवळलेल्या सागरात नौका अडकल्या, २०० नौका व त्यावरील शेकडो मच्छीमारांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 02:58 IST

समुद्रात सुमारे ६० किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहणार असल्याने समुद्रात मासेमारीला जाऊ नये असा इशारा दिला असला तरी सातपाटी, मुरबे, डहाणू इ. भागातील सुमारे २०० मच्छिमारी नौका सुमारे ९० नॉटिकल मैलावर अडकून पडल्या असून मुसळधार पाऊस आणि वादळी वा-याचा वेग वाढल्यास त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे.

हितेन नाईक।पालघर : समुद्रात सुमारे ६० किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहणार असल्याने समुद्रात मासेमारीला जाऊ नये असा इशारा दिला असला तरी सातपाटी, मुरबे, डहाणू इ. भागातील सुमारे २०० मच्छिमारी नौका सुमारे ९० नॉटिकल मैलावर अडकून पडल्या असून मुसळधार पाऊस आणि वादळी वा-याचा वेग वाढल्यास त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे.जिल्ह्यातील नायगाव ते झाई बोर्डी अशा सुमारे ११० किमी दरम्यान वसई, अर्नाळा, नायगाव, दातीवरे, कोरे, एडवण, केळवे, माहीम, वडराई, सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्च्छेळी-दांडी, घिवली, धा.डहाणू, डहाणू, बोर्डी इ.भागातून सुमारे दीड ते दोन हजार लहान- मोठ्या मच्छिमारी नौका समुद्रात मासेमारी करीत आहेत. सोमवारी संध्याकाळपासून समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पश्चिमेकडून दक्षिणेच्या दिशेने ४५ ते ६० प्रति तास किलोमीटरच्या वेगाने वादळी वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीला जाऊ नये असा इशारा हवामान खात्यासह मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत असून आंजर्ले खाडीत तीन बोटींना जलसमाधी मिळाली आहे. त्यातील मच्छीमारांनी सुरक्षित किनारा गाठला असला तरी ४-५ दिवसापूर्वी समुद्रात मासेमारीला गेलेल्या सर्व नौकांनी आपल्या बंदरात अथवा जवळच्या बंदरात सुरक्षित आश्रय घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिला आहे. गुजरात राज्यातील सुमारे ७०० ते १ हजार ट्रॉलर्सनी प्रशासनाच्या इशाºयानंतर सुरक्षितपणे जयगड बंदर गाठल्याची माहिती गुजरातच्या बोटीवर काम करणारे मच्छीमार कमलेश यांनी लोकमतला दिली.सातपाटी हे जिल्ह्यातील एक प्रगतिशील बंदर असून सर्वोदय मच्छीमार सहकारी संस्था व सातपाटी मच्छीमार सहकारी संस्था या दोन संस्था मधून अनुक्र मे १४३ तर ९५ लहान मोठ्या नौकाद्वारे मासेमारी केली जाते. यापैकी सुमारे २०० नौका तर जिल्ह्यातील ४०० ते ५०० नौका आजही समुद्रात अडकून पडल्या आहेत.समुद्रातील मासेमारी क्षेत्र कमी पडत असल्याने व माशांचा घसरलेला दर, मासेमारी साहित्य, डिझेलमध्ये झालेली दरवाढ ह्या पाशर््वभूमीवर समुद्रात ही पुरेसे मासे मिळत नसल्याच्या कारणाने ९० ते १०० नॉटिकल क्षेत्रातून परत रिकाम्या हाताने बंदरात परतणे मच्छीमाराना परवडत नाही. त्यामुळे नेहमीच वादळी वाºयाशी खेळणारे हे मच्छीमार अशा वादळी परिस्थितीत आपल्या बंदरात परत येण्यास तयार नसतात. बोटीतील लोयली( अँकर)समुद्रात टाकून या बोटी शांतपणे एकाच जागेवर उभ्या ठेवल्या जातात. प्रशासनाने दिलेल्या धोक्याच्या इशाºयानंतर घरातील वायरलेस सेटद्वारे प्रत्येक कुटुंब आपापल्या बोटीतील वायरलेस सेट द्वारे संपर्क साधून खुशाली विचारीत असतो.मात्र आज संध्याकाळपासून मुसळधार पावसाला सुरु वात झाल्याने वायरलेस वरून संपर्क तुटल्याचे मच्छीमारांनी सांगितले. मात्र येत्या ७२ तासात मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयाचा इशारा दिल्याने किनारपट्टीवरील गावात चिंतेचे वातावरण आहे.>प्रशासन कोस्टगार्डच्या संपर्कांतनिवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे हे स्वत: या घटनांकडे लक्ष ठेवून असून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित ह्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याशी संपर्क साधून या मच्छीमारांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून कोस्टगार्डशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.समुद्रात अडकलेल्या मच्छीमारांशी वायरलेस वरून सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न मी करीत असून त्यांना तात्काळ जवळचा सुरक्षित किनारा गाठण्याच्या सूचना दिल्या आहेत.- संतोष मेहेर, चेअरमन, मच्छीमार संस्था