शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

कष्टकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; शासनाविरोधात घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:24 PM

आदिवासींचा वनहक्क डावलल्याचा निषेध

पालघर : वनहक्क कायद्यान्वये आदिवासींना जंगलात राहण्याचा हक्क देण्यात आला असून हा हक्क नाकारून त्यांची राहती घरे तोडण्याच्या नोटिसी बजावल्या जात आहेत. या अन्यायाविरोधात कष्टकरी संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

‘आदिवासींची तोडली झोपडी, वन खात्याची फिरली खोपडी’, ‘आदिवासी जिल्ह्यात झाले काय - महाराष्ट्र शासन हाय हाय’, अशा घोषणा देत कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो आदींच्या नेतृत्त्वाखाली हजारो आदिवासींचा मोर्चा पालघर रेल्वे स्थानकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

पालघर जिल्ह्यात काही महिन्यांपासून आदिवासींच्या वन हक्कांचे उल्लंघन होत असून आदिवासींना त्यांच्या वनजमिनी वरून हटवले जात आहे. जव्हार वन विभागाने आदिवासींना त्यांच्या फॉरेस्ट प्लॉटवर बांधलेल्या घरातून आणि झोपड्यांतून हटवण्याची मोहीम हाती घेतली असून एप्रिल २०१९ मध्ये अशाच प्रकारचे एक घर जेसीबी मशीनचा वापर करून तोडण्यात आले आहे. एप्रिल २०१९ मध्ये प्लॉटधारकांचा दावा प्रलंबित असूनही वनखात्याने या प्लॉटवरील घर जमीनदोस्त करून वन हक्क कायद्याच्या कलम ४ (५) उल्लंघन केले आहे. आदिवासींचे वनहक्क कायद्यांतर्गत मान्य झालेले हक्क उपभोगण्यापासून अडथळा निर्माण केल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ (२०१६ च्या सुधारणा सहित) च्या कलम (३)(१)(छ) नुसार तो अत्याचार ठरतो व त्यास जबाबदार असणारी व्यक्ती सदर कलमांतर्गत कारवाईस पात्र असल्याचेही ब्रायन लोबो यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कोणत्याही आदिवासी पाड्यांमध्ये गावठाण क्षेत्र न वाढवता आदिवासींची फॉरेस्ट प्लॉटवर घरे तोडणे हे अन्यायकारक असून आदिवासींच्या जगण्याच्या हक्काचे उल्लंघन असल्याचा दावा लोबो यांनी केला आहे. वन खात्याने भारतीय वन कायदा १९२७ मध्ये सुचिवलेल्या प्रस्तावित सुधारणामुळे आदिवासींचे वनहक्क यामुळे हिरावून घेतले जात आहेत. आधीपासूनच बलशाली असणाºया वनखात्याच्या नोकरदारांना यामुळे आणखी शक्ती मिळणार आहे. यामुळे खाजगीकरणाचा मार्ग खुला करून राष्ट्रीय संपत्तीचे रूपांतर खाजगी नफ्या करता येणे शक्य असल्याची शंकाही व्यक्त करण्यात आली. याच्या निषेधार्थ संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.काय आहेत मागण्या

  • फॉरेस्ट प्लॉटवरील आदिवासींच्या घरांची मोडतोड थांबविण्यात यावी.
  • भारतीय वनहक्क कायद्यामध्ये सुचवलेल्या प्रस्तावित सुधारणा मागे घेण्यात याव्यात.
  • आदिवासी पाड्यांमध्ये नवीन गावठाण घोषित करण्यात यावे किंवा असलेले गावठाण क्षेत्र वाढविण्यात यावे.
  • वनहक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि सर्व प्रलंबित दावे तसेच अपील मंजूर करण्यात यावे.
  • जिल्हा कन्व्हर्जन समिती वन संसाधन क्षेत्राच्या व्यवस्थापनामध्ये पूर्णपणे कुचकामी ठरली असल्यामुळे या समितीची बैठक बोलविण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांना देण्यात आले.