शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत भंगार कचरागाड्या मोडीत निघणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:40 IST

मुलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या भिवंडी महापालिकेचा

नितीन पंडित, भिवंडी

मुलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या भिवंडी महापालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकून परतत असलेल्या डंपरचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या खासगी वाहनांची कशी दखल घेतली जाते हे या घटनेतून समोर आले आहे. कोट्यवधी रु पये कंत्राटदाराच्या घशात घालूनही वाहनांचे अशा प्रकारे ब्रेक फेल होणे म्हणजे पालिका प्रशासन फेल झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या दुर्दैवी घटनेतून घनकचरा व्यवस्थापन विभागात सुरु असलेला भ्रष्टाचारही समोर आला आहे.

महापालिकेकडे स्वत:ची कचरा उचलण्याची वाहने नाहीत ही दुर्दैवी गोष्ट आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पालिकेतील सर्वच विभागांची चौकशी केली तर घोडाळ््यांची मालिका बाहेर निघेल. सहाशे साडेसहाशे कोटींचे वार्षिक बजेट असल्याने वर्षाला किमान पाच ते सहा वाहने खरेदी केली असती तरी आतापर्यंत महापालिकेकडे स्वत:ची वाहने असती. मात्र खासगी कंत्राटदारांकडून संबंधित अधिकाऱ्यांना मिळणाºया आर्थिक मलिद्यापासून आपल्याला अलिप्त राहावे लागेल याची जाण काही सुज्ञ अधिकारी व लोकप्रतिनिधींना आल्यानेच आतापर्यंत भिवंडी महापालिकेत कचरा उचलण्यासाठी भाड्याने वाहने मागवावी लागत आहेत.महापालिकेत कचरा उचलण्यासाठी पालिकेकडे ९४ घंटागाड्या, ५१ डंपर तर १६ जेसीबी अशी वाहने आहेत. विशेष म्हणजे या वाहनांमध्ये ९४ घंटागाड्यांवर महिन्याला ३२ लाख ४८ हजार ६४० रु पये तर ५१ डंपरसाठी ३९ लाख २७ हजार ५१० रु पये तर १६ जेसीबीसाठी ३२ लाख ४० हजाररु पयांपर्यंत भाडे कंत्राटदारावर खर्च करते. कोट्यवधींची उधळण करूनही वाहने भंगार अवस्थेतील आहेत. अनेक कचरावाहू वाहनधारक चालकांकडे वाहन चालविण्याचा परवानाही नाही, आवश्यक कागदपत्रेही नाहीत. आर्थिक फायद्यामुळे कचरा वाहतूक करणाºया वाहनांवर अधिकाऱ्यांचे कोणतेही निर्बंध नाहीत.कचरा वाहतूक करणाºया गाड्या जशा पूर्ण झाकलेल्या असतात तशी प्रथा भिवंडीत कुठेच नाही. उघड्या डंपरमधून कचरा भरून तो शहरातील मुख्य रस्त्यांवरून डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात येतो. अनेकवेळा कचरा डंपरच्या मागे असलेल्या नागरिकांच्या अथवा दुचाकीस्वारांच्या अंगावर पडतो. मात्र याकडे पालिका दुर्लक्ष करते.शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीगडम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले असून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे . 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नbhiwandiभिवंडी