शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

यंदा तरी मोखाडावासीयांच्या समस्या सुटतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 6:00 AM

शासन पातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास अजतायत संपलेला नाही. यामुळे या नवीन वर्षात तरी मोखाडा वासीयांच्या रोजगार, आरोग्य, पाणी, कुपोषण, शिक्षणाच्या समस्यां सुटतील का असा प्रश्न येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारला जात आहे

मोखाडा : शासन पातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास अजतायत संपलेला नाही. यामुळे या नवीन वर्षात तरी मोखाडा वासीयांच्या रोजगार, आरोग्य, पाणी, कुपोषण, शिक्षणाच्या समस्यां सुटतील का असा प्रश्न येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारला जात आहेस्वातंत्र्याची ६७ वर्ष उलटली असताना येथील आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणी , वीज, इत्यादी मूलभूत सुविधां पासून येथील भूमिपुत्र कोसोदूरच आहे. इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी येथील भूमिपुत्र वर्षानुवर्ष स्थलांतरित होत आहे दिवाळीचा सणाचा आनंद मावळताच येथील आदिवासी रोजगाराच्या शोधात आपल्या अठरा विश्व दारिद्र्याचे गाठोडे बांधून शहराकडे रवाना झाला आहेयेथील कुपोषण तर पाठ सोडायला तयार नाही दरवर्षीच कुपोषण बळीच्या अनेक घटना घडत असल्याने कुपोषण निर्मूलनाचा दावा करणारे प्रशासन अपयशी ठरले आहे कुपोषणाचे प्रमुख कारण रोजगार असल्याने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचं आहे परंतु तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे कायम स्वरूपी रोजगार देणारी कसलीच यंत्रणा येथे उपलब्ध नाही केलेल्या कामाचा मोबदला वर्षवर्ष होऊनही मिळत नाहीशहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा करणारे विजेचे खांब जीर्ण झाले असल्याने विज सेवेचा नेहमीच लफंडाव असून त्यातच सततचे भारिनयमन व वाढीव बिल आकारणी यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे तालुक्याच्या ठिकाणी असलेले एकमेव ग्रामीण रु ग्णालय व आरोग्य केंद्रात सोईसुविधा मिळत नसल्याने खाजगी रु ग्णालयातील महागडा उपचार घ्यावा लागत आहे.रुग्णांना उपचारासाठी नाशिक मुबंई ठाणे धाव घ्यावी लागते मोखाद्यात पाच मोठी मोठी धरणे असून देखील दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे शिक्षण ज्ञानाचा तिसरा डोळा असे सांगितली जात असले तरी येथे रयतचे महाविद्यालाय आण िखोडाळ्याचे मोहिते कॉलेज सोडले तर इतर शिक्षणाची कोणतीच सोय नाही यामुळे येथील आदिवासी मुलांना नाशिक वसई पुणे मुबंई ठाणे येथे शिकायला जावे लागते.सार्वजनिक बांधकाम रस्ते विकासाच्या नावाखाली करोडोचा दरवर्षी खर्च करते तरी देखि खोडाळा मोखाडा जव्हार त्रिंबकेश्वर या मुख्य रस्त्याची दुरावस्थेत फारसा बद्दल झालेला नाही- मोखाडा तालुक्याचे ठिकाण असूनही येथे मनोरंजनाचे साधन नाही चित्रपटगृह नाही येथील परिसर डोंगर दर्या खाºयांनी नटलेला आहे. देवबांधचे गणपतीचे मंदिर अशोका धबधबा वाशाळा येथील बुद्ध लेणी पेंडक्याची वाडी येथील कमाणीचा धबधबा व प्राचीन वास्तू अशा विविधतेने हा परिसर नटलेला असून देखील प्रशासनाने पर्यटनासाठी प्रयत्न केलेले नाहीत यामुळे येथील आदिवासी आजही दारिद्याच्या काळोखातच चाचपडत असल्याने यामुळे या नवीन वर्षात तरी सोईसुविधा पुरवण्याचा शहाणपण येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना सुचेल का हा प्रश्न आहे.विकास कुठे गेला?तालुक्यातील बिवलपाडा रुईपाडा फनसपाडा कुर्लोद सावर्डे कुडवा अशा विविध गावपाड्यांना अजून पर्यंत शासनाच्या कोणत्याच सोईसुविधा पोहचलेल्या नसून काही गावपाड्यांना विजेचा प्रकाश बघायला सुद्धा मिळालेला नाही. यामुळे डिजटल इंडिया, बुलेट ट्रेन, मेक इन इंडिया, म्हणजे काय रे भाऊ असाच सवाल विचारला जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार