शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
4
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
5
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!
6
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
7
जॉब सोडला अन् शेती केली, MBA पास तरुणीची कमाल; टोमॅटो विकून करतेय कोट्यवधींची कमाई
8
"मराठीसारखं काम करु नका यार", हिंदी दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून छाया कदमने शूटिंगच थांबवलं
9
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!
10
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
11
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
15
निर्दोष सुटलेले डॉ. शेख कायदेविषयक सल्लागार; पुन्हा रमले शिक्षकी पेशात
16
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
17
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
18
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
19
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
20
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!

गोड पाण्याचे स्रोत खारे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:23 IST

मुकेश सावे : निचऱ्यासाठी किनाºयालगतच्या शहरांसाठी दीर्घकालीन उपाययोजना

नालासोपारा : गेल्या दोन वर्षांपासून वसई विरार शहरात अतिवृष्टीमुळे सतत येणारा पूर आणि निचरा त्वरीत न झाल्याने पाणी साचून होणारे नुकसान यामुळे येथील पुराच्या पाण्याच्या निचºयासाठी नैसिर्गक नाले आणि खाड्या अधिक रूंद करण्याचा मुद्दा पुन्हा पुन्हा विरोधी पक्षीयांकडून उपस्थित केला जात आहे. पण हे नाले रु ंद केल्यास जमिनीतील गोड पाण्याचे स्रोत खारे होण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे वक्तव्य विरारचे माजी नगराध्यक्ष, तथा बहुजन विकास आघाडीचे नेते मुकेश सावे यांनी केले आहे.

वसई विरार शहर, तथा लगतचा ग्रामीण भाग हा वाड्या आणि शेती युक्त असून, येथे सभोवताली खाडी असली तरी गोड पाण्याचे अंतर्गत नैसर्गिक स्रोत अद्यापही टिकून आहेत. पावसाळी पुराच्या पाण्याच्या निचºयासाठी नैसिर्गक नाले आणि खाड्या अधिक रु ंद केल्याने वसई विरार शहरातील जमिनीतील गोड पाण्याचे स्त्रोत खारे होण्याचा मोठा धोका असून, यामुळे समुद्री पाणी शहरात अधिक काळ झिरपून येथील पाण्याची क्षारता वाढण्याचे नवे संकट समोर उभे राहू शकते. शहरात पाणी साचण्यासाठी, त्यातून होणाºया नुकसानी बद्दल केवळ वसई विरार महापालिकेचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा नियोजन शून्य कारभार जबाबदार असल्याची घणाघाती टीका नवघर माणिकपूर शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. या पाशर््वभूमीवर सावे यांनी या प्रकरणी दुसरी तांत्रिक बाजू लक्षात घेण्याचा आग्रह धरला आहे. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांवर टीका करणे, हा विरोधकांचा हक्क मान्य करीत, परंतु समस्येच्या मुळाशी जाऊन साधकबाधक विचार न करता केवळ वसई विरार महापालिकेवर संपूर्ण खापर फोडून, अद्वातद्वा टीका करणाच्या विरोधीपक्षांच्या विरोधासाठी विरोध या भूमिकेबद्दल सावे यांनी खेद व्यक्त केला आहे.

शहराच्या विकासाचे नियोजन करतांना, विकास आराखडे तयार करतांना राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्ण विश्वासात घेत नाही. मुळात येथूनच नागरीकरण आणि शहर विकासीकरण प्रक्रियेला गालबोट लागायला सुरूवात होते. शासकीय धोरणे आणि एमएमआरडीए, सिडको यांच्याकडून शहर नियोजनाचा उडालेला बोजवारा याचा फटका संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाला बसलेला पाहायला मिळतो आहे. नवे आराखडे बनवितांना शहरीकारणातून स्वाभाविकच वाढलेली बांधकामे आणि त्यामुळे पाण्याच्या निचºयाचा निर्माण होणारा प्रश्न हा केवळ नैसर्गिक नाल्यांसारख्या मर्यादित साधनांच्या भरोशावरच सोडविण्याचा शासनाचा शिरस्ता राहिला आहे. परिणामी आराखड्याची अंमलबजावणी करतांना पाणी निचºयासाठी स्वतंत्र उपाययोजना आखण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप केला आहे.

उपनगरांना पुराच्या पाण्याच्या समस्येने ग्रासले असून, यावर अभ्यासाअंती तोडगा निघावा. गेल्या काही वर्षांपासून नीप भरती येण्याच्या वाढलेल्या प्रमाणामुळे भरतीचे पाणी पर्जन्यवाहिन्यांमधून कायम शहरात घुसत असते परिणामी अतिवृष्टीमुळे झालेल्या पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो. वसई विरारच्या पूर परिस्थितीवर निरी आणि आय आय टी या संस्थांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावर आणखी संशोधनपूर्ण शिफारस आवश्यक असून, पाण्याच्या निचºयासाठी शासनाकडूनही किनाºया लगतच्या शहरांसाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहे.खाड्याची रु ंदी, खोली पूर्ववत करण्याचा सल्ला निरी आणि आय आय टी यांनी त्यांच्या अहवालात दिला आहे किंबहुना वसई परिसरात ज्या खाड्या आहेत (नायगाव खाडी, राजावली खाडी, आचोळा खाडी, सोपारा खाडी, वैतरणा खाडी ) त्यातून १२ टनांची व्यापारी जहाजे मालाची वाहतूक करीत होती त्यामुळे अंदाज येईल की त्यांची रु ंदी व खोली किती होती. त्यावेळी गोड पाण्याचे स्रोत वसईत नव्हते का तर होते किंबहुना तलावाचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. राहिला प्रश्न विकास आराखडा तर निरी आणि आय आय टी यांच्या अहवालात नैसर्गिक नाले यांच्यावर जे अतिक्र मणे झाली आहेत ती काय विकास आराखड्यात आरिक्षत केली गेली का ? येथे ९०० मीटरच्या खाड्या बुजवन्याचे काम महानगरपालिका करते ते कसे ? - मिलिंद चव्हाण, वसई