शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

वकिलांवर झाली, आता अधिका-यांवर कारवाई कधी?, महापालिकेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 23:52 IST

खटले लढण्यास अपयशी ठरलेल्या वकिलांचे पॅनल बदलण्याचे काम महापालिकेने केले असले तरी अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई कधी करणार असा सवाल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केला आहे.

वसई : खटले लढण्यास अपयशी ठरलेल्या वकिलांचे पॅनल बदलण्याचे काम महापालिकेने केले असले तरी अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई कधी करणार असा सवाल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केला आहे.वसई विरार महापालिकेने दावे लढण्यासाठी गठीत गेलेल्या वकिलांना चार कोटींहून अधिक रुपये फी पोटी देऊनही त्यांच्याकडून समाधानकारक काम केले गेले नसल्याची बाब पाटील यांनी चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर महापालिकेने महासभेत ठराव पारीत करून जुने वकिल बदलण्याचे निर्णय घेतला आहे.मात्र, वकिलांपेक्षा अ़नधिकृत बांधकामांसाठी संबंधित अधिकारी अधिक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी महापालिका आयु्क्तांकडे केली आहे.जुलै २००९ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीतील एकूण ८६७ दाव्यांपैकी ७४७ दावे हे केवळ अनधिकृत बांधकामांशी संबंधित आहेत. यातील अवघ्या ८२ प्रकरणांमध्ये न्यायालयीन स्थगित उठवण्यात वकिलांना यश मिळालेले आहे.उर्वरित ६६५ प्रकरणांमध्ये न्यायालयाचे स्थगिती आदेश कायम आहेत. हे दावे चालवण्यासाठी महापालिकेने या कालावधीत ३ कोटी ९४ लाख ४ हजार ८७० रुपये खर्च केले आहेत, असल्याची माहिती खुद्द महापालिकेने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीत नमूद केली आहे.जनतेच्या कररुपी पैशातील कोट्यवधी रुपये फी पोटी खर्च करून केवळ १० टक्के प्रकरणांमध्ये न्यायालयीन स्थगिती आदेश उठवण्यात यश आले आहे. ही बांधकामे ही पूर्णपणे अनधिकृत असतानाही त्यांच्यावरील कारवाईला न्यायालयीन स्थगिती मिळते आणि ती स्थगिती जवळपास ६ ते ७ वर्षे उठवण्यास महापालिकेच्या विधी विभागाला अपयश आल्याची धक्कादायक बाबही उजेडात आली आहे.अनधिकृत बांधकामांमुळे शहरातील शेकडो सर्वसामान्य लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली आहे.यात एकट्या वकिलांवर कारवाई करून महापालिका प्रशासनाने अधिकाºयांना पाठिशी घालण्याचे काम केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.ं

टॅग्स :Vasai Virarवसई विरार