शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

स्वातंत्र्याने दिले काय…अहो, आदिवासींपर्यंत पोहोचलंच नाय! मूलभूत सुविधांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 13:36 IST

Palghar: आधुनिकतेकडे वाटचाल करत मोनो, मेट्रो बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्रात आजही रस्त्याअभावी येथील आदिवासींना कोसो मैलाची जीवघेणी पायवाट तुडवावी लागत आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या सुविधांची प्रतीक्षा आहे.

- रवींद्र साळवेमोखाडा - विकासाच्या नावावर दिवसागणिक रस्ते विकासाचे जाळे विस्तारत असून, विविध महामार्ग प्रगतिपथावर नेण्याचे दावे केले जात आहेत. आधुनिकतेकडे वाटचाल करत मोनो, मेट्रो बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्रात आजही रस्त्याअभावी येथील आदिवासींना कोसो मैलाची जीवघेणी पायवाट तुडवावी लागत आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या सुविधांची प्रतीक्षा आहे. यामुळे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही मूलभूत गरज पूर्ण होण्यासाठी झटावे लागत असेल तर, ‘स्वातंत्र्याने दिले काय…अहो, आदिवासींपर्यंत पोहोचलंच नाय! असे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकटपावसाळ्यात तर चार महिने पूर्णत: संपर्क तुटतो. अक्षरश: बेटावरचे जीवन काढावे लागते. मागील पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या नदीतून पलीकडे जाताना एक शाळकरी मुलगा नदीच्या प्रवाहातून वाहून  जाताना गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले अशा घटना येथे  वारंवार घडतात. 

येथे पुलाची सोय व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु या पाड्याची लोकसंख्या कमी असल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जात आहे. - बाळू घाटाळ, सरपंच, आडोशी शिरसगाव 

  पालघर जिल्ह्यातील अनेक गावात असे चित्र आहे. देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुंबईपासून १०० किमी अंतरावर, तर मोखाडा तालुक्याच्या मुख्यालयापासून १५ ते  २० किमी अंतरावर दरी डोंगरात आडोशी शिरसगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत अगदी मोखाडा खोडाळा रस्त्यावर देवबांधपासून काही मैलाच्या अंतरावर, थाळेकरवाडी १६ घरे व ७० लोकसंख्या असलेल्या या पाड्यावरील आदिवासी बांधव नदीच्या पलीकडे वास्तव्य असल्याने रस्ता व पुलाअभावी  गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

पुलाअभावी होतेय गैरसोयविकासाच्या  नावाखाली  मोखाड्यात नको त्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधून करोडो रुपये खर्च  केले  जातात; परंतु ज्या  ठिकाणी खऱ्या अर्थाने पुलाची  गरज  आहे तिथे दुर्लक्ष न करता शासनाने लक्ष देऊन थाळेकरवाडी येथे रस्ता व पूल उभारणीची गरज आहे याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती यांनी बोलताना सांगितले.

आमची कुटुंबं गेल्या १०० वर्षांपासून इथे वास्तव्य करत आहेत. चारही बाजूने नदी  असल्याने पावसाळ्यात आमच्या  पाड्याचा संपूर्ण संपर्क तुटतो. शाळकरी मुले, वृद्ध व्यक्ती कामानिमित्त ये-जा  करणाऱ्या लोकांना अडचणीचा  सामना करावा लागतो. आजारी पेशंटला डोली करून नदी पार करावी लागते. - संदीप थाळेकर, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :palgharपालघर