शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

पक्षापेक्षा आम्हाला काम करणारा खासदार हवा! वैतागलेल्या डहाणूकरांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 4:01 AM

पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने शिवसेनेसाठी जागा सोडली आहे. त्यामुळे पारंपारिक मतदारसंघ असलेल्या डहाणू विधानसभा क्षेत्रातुन भाजपकडून तलासरी, डहाणू भागातून जाहीर विरोध होऊ लागला आहे.

- शौकत शेखडहाणू  - पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने शिवसेनेसाठी जागा सोडली आहे. त्यामुळे पारंपारिक मतदारसंघ असलेल्या डहाणू विधानसभा क्षेत्रातुन भाजपकडून तलासरी, डहाणू भागातून जाहीर विरोध होऊ लागला आहे. तलासरी येथे जाहीर सभेत आदिवासी आघाडी प्रसिद्धी प्रमुख यांनी भाजपाला ही जागा न सोडल्यास अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.डहाणू विधानसभा, पंचायत समिती, डहाणू नगर परिषद, ग्रामपंचाती भाजपाकडे आहेत. त्यामुळे भाजपाकडुन पालघर लोकसभा लढण्याची तयारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पुर्ण झाली होती. मात्र वरच्या स्तरावर शिवसेनेकडे माप झुकल्याने येथील मतदार या पक्षीय राजकारणाला मोल देतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण लोकांना निवडणुकीपेक्षा रोजगाराचा प्रश्न महत्वाचा वाटू लागला आहे त्यामुळे बेरोजगारी, उद्योगबंदी, शिक्षण आदि समस्या सोडवणाऱ्या खासदाराच्या शोधात डहाणूचे मतदार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.लोकसभेचे बिगुल वाजले आणि पालघर लोकसभेची जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडली असली तरी रविवारी तलासरी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवसेनेला विरोध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपाने ही जागा शिवसेनेला सोडू नये असा एकमुखी ठराव घेण्यात आला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हेवेदावे समोर येऊ लागले आहेत. डहाणू विधानसभा मतदार संघाचा प्रभाव लाक्षणिक ठरणारा आहे. पालघर लोकसभा युतीने शिवसेनेला सोडली आहे. यामध्ये डहाणू विधानसभेत भाजपाचे वर्चस्व आहे. त्याचा फायदा शिवसेनेला होणारा आहे. उद्योगबंदीमुळे लोकांना रोजगारासाठी वणवण करावी लागत आहे. त्यातच आहे त्या उद्योगांचे स्थलांतर होवू लागल्याने लोकांना स्थलांतर करण्याची वेळ ओढवली आहे. अपेक्षित कामधंदा मिळत नसल्याने तरूण वर्ग सैरभर झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस, काँगेस आणि सीपीएम यांचे प्रभावक्षेत्र मानले जाणारे डहाणू, तलासरी तालुके कष्टकऱ्यांची नगरी परिचित आहे. डहाणू समुद्र किनारपट्टीवरील क्षेत्राच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून झालेली बांधकामे नियमित करण्याची जुनी मागणी आहे. मात्र त्याची उकल होत नाही हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. डहाणूमध्ये गेल्या २५ वर्षात उद्योग बंदी असल्याने एकही कारखाना सुरू झालेला नाही परिणामी मोलमजुरीचे काम करणारे आदिवासी दरवर्षी वीटभट्टी तसेच बोटीवर कामासाठी बाहेर पडावे लागते.२५ वर्षे उद्योगबंदी अन् रोजगाराचा अभाव२००९ मध्ये डहाणू विधानसभेत माकपचे राजाराम ओझरे निवडुन आले होते. त्यानंतर भाजपचे पास्कल धनारे निवडुन आले आहेत. त्यामुळे सध्या विद्यमान आमदारांचा प्रभाव असलेल्या डहाणू विधानसभेत विकासकामे झाली असली तरी १९९१ पासून डहाणू तालुक्याला लागलेली उद्योगबंदी २५ वर्षात उठलेली नाही. परिणामि स्थलांतर, रोजगार, उद्योगबंदी, यामुळे जनतेत सरकारचा रोष पसरला आहे. त्यामुळे डहाणूत समस्या सोडवणार्या खासदाराच्या शोधात मतदार राजा असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalgharपालघर