शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

धाकटी डहाणूमध्ये पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:57 IST

पंधरा-वीस दिवसांआड पुरवठा : जलवाहिनीतून झिरपणाऱ्या पाण्याने भागते तहान

शौकत शेख।डहाणू : सूर्या प्रकल्पाअंतर्गत येणाºया धामणी, कवडास, साखरे धरणांचे वरदान लाभलेल्या डहाणूवासीयांना जिल्हा परिषदेच्या पाणीपूरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आठ, पंधरा, तसेच वीस दिवसांआड पाणीपूरवठा होत असल्याने हजारो भूमिपुत्रांना साठवून ठेवलेले गढूळ तसेच दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे पंचायत समिती सदस्य वशीदस अंभिरे तसेच धा. डहाणूचे माजी सरपंच हरेश्वर तामोरे यांनी लोकमतला सांगितले.डहाणूच्या पश्चिम किनापट्टीवरील २६ गावांना बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपूरवठा योजनेअंतर्गत साखरे धरणांतून पाणी पूरवठा केला जातो. परंतु या योजनेला वीस, पंचवीस वर्ष झाल्याने त्याची जलवाहिनी, जलकुंभ, जिर्ण व जूनाट झाल्याने शासनाने बाडापोखरण पाणी पूरवठा योजनेच्या नुतनीकरणासाठी ४३ कोटी रूपये अनुदान मंजुर करून मार्च २०१४ ला दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली होती. परंतु अद्याप ही कामे अपूर्ण असल्याने सध्या जुन्याच जलवाहिनेने पाणी पूरवठा होत आहे. या प्रकारामुळे असंख्य गावांत तसेच खेडोपाडयात प्र्रेशरने पाणी जात नसल्याने येथील ग्रामस्थांना पूरेश प्रमाणात पाणी मिळत नाही. शिवाय अनेक गावांत आठ, दहा दिवसाने पाणी पूरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांना विहिर किंवा बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे.विशेष म्हणजे डहाणू तालुक्याच्या रेल्वेच्या पूर्व भागामध्ये मोठया प्रमाणात म्हणजेच शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली गावे आहेत. येथील असणाºया धरणांच्या उभारणीसाठी शासनाने आदिवासी उप योजनेतून ४८० कोटी खर्च केले आहेत. त्यातून वसई-विरार, भार्इंदर आदी शहरी भागाची तहाण भागविली जात असतांना येथील स्थानिक आदिवासी बांधव तहाणेणे व्याकुळ होत आहे.येथील गोर गरीब आदिवासींना या धरणातील नळापणीपूरवठा योजनेव्दारे किंवा इतर मार्गाने पिण्याच्या पाण्याच्या थेंब ही मिळत नाही. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील नागरिकांची अवस्था अशीच आहे. येथे दररोज पिण्याचे पाणी मिळत नसल्योन ग्रामस्थ त्रस्त आहेत. तर बाडा पोखरण योजनेचे शेवटचे गाव असलेले धा. उहाणूच्या रामपाडा, बारीवाडा, आदिवासीपाडा, माळी आळी, मधली आळी, मितनवाडी, हनुमान आळी या परिसरातील ग्रास्थांना वीस दिवसाने पाणी पूरवठा होत असल्याने ग्रामस्थ वीस दिवस साठवून ठेवलेले दुषीत, शिळे पाणी पित असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.थेंबेथेंबे घागर भरेपिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासींना हातपंप, खोल विहिरीतून किंवा डबक्यातील गढूळ दुषित पाणी प्यावे लागत आहे. तर वाणगांव पासून थेट धरणापर्यंत राहणाºया आदिवासींना मोठ मोठ्या शहरांना, तारापूर अणुशक्ती केंद्र, एम.आय.डी.सी. रिलायन्स एनर्जी सारख्या मोठ्या मोठ्या प्रकल्पाकडे जाणाºया जलवाहिनीतून थेंब-थेंब झिरपणाºया पाणवर ताहान भागवावी लागत आहे.

टॅग्स :Damधरण