शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

धाकटी डहाणूमध्ये पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:57 IST

पंधरा-वीस दिवसांआड पुरवठा : जलवाहिनीतून झिरपणाऱ्या पाण्याने भागते तहान

शौकत शेख।डहाणू : सूर्या प्रकल्पाअंतर्गत येणाºया धामणी, कवडास, साखरे धरणांचे वरदान लाभलेल्या डहाणूवासीयांना जिल्हा परिषदेच्या पाणीपूरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आठ, पंधरा, तसेच वीस दिवसांआड पाणीपूरवठा होत असल्याने हजारो भूमिपुत्रांना साठवून ठेवलेले गढूळ तसेच दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे पंचायत समिती सदस्य वशीदस अंभिरे तसेच धा. डहाणूचे माजी सरपंच हरेश्वर तामोरे यांनी लोकमतला सांगितले.डहाणूच्या पश्चिम किनापट्टीवरील २६ गावांना बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपूरवठा योजनेअंतर्गत साखरे धरणांतून पाणी पूरवठा केला जातो. परंतु या योजनेला वीस, पंचवीस वर्ष झाल्याने त्याची जलवाहिनी, जलकुंभ, जिर्ण व जूनाट झाल्याने शासनाने बाडापोखरण पाणी पूरवठा योजनेच्या नुतनीकरणासाठी ४३ कोटी रूपये अनुदान मंजुर करून मार्च २०१४ ला दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली होती. परंतु अद्याप ही कामे अपूर्ण असल्याने सध्या जुन्याच जलवाहिनेने पाणी पूरवठा होत आहे. या प्रकारामुळे असंख्य गावांत तसेच खेडोपाडयात प्र्रेशरने पाणी जात नसल्याने येथील ग्रामस्थांना पूरेश प्रमाणात पाणी मिळत नाही. शिवाय अनेक गावांत आठ, दहा दिवसाने पाणी पूरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांना विहिर किंवा बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे.विशेष म्हणजे डहाणू तालुक्याच्या रेल्वेच्या पूर्व भागामध्ये मोठया प्रमाणात म्हणजेच शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली गावे आहेत. येथील असणाºया धरणांच्या उभारणीसाठी शासनाने आदिवासी उप योजनेतून ४८० कोटी खर्च केले आहेत. त्यातून वसई-विरार, भार्इंदर आदी शहरी भागाची तहाण भागविली जात असतांना येथील स्थानिक आदिवासी बांधव तहाणेणे व्याकुळ होत आहे.येथील गोर गरीब आदिवासींना या धरणातील नळापणीपूरवठा योजनेव्दारे किंवा इतर मार्गाने पिण्याच्या पाण्याच्या थेंब ही मिळत नाही. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील नागरिकांची अवस्था अशीच आहे. येथे दररोज पिण्याचे पाणी मिळत नसल्योन ग्रामस्थ त्रस्त आहेत. तर बाडा पोखरण योजनेचे शेवटचे गाव असलेले धा. उहाणूच्या रामपाडा, बारीवाडा, आदिवासीपाडा, माळी आळी, मधली आळी, मितनवाडी, हनुमान आळी या परिसरातील ग्रास्थांना वीस दिवसाने पाणी पूरवठा होत असल्याने ग्रामस्थ वीस दिवस साठवून ठेवलेले दुषीत, शिळे पाणी पित असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.थेंबेथेंबे घागर भरेपिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासींना हातपंप, खोल विहिरीतून किंवा डबक्यातील गढूळ दुषित पाणी प्यावे लागत आहे. तर वाणगांव पासून थेट धरणापर्यंत राहणाºया आदिवासींना मोठ मोठ्या शहरांना, तारापूर अणुशक्ती केंद्र, एम.आय.डी.सी. रिलायन्स एनर्जी सारख्या मोठ्या मोठ्या प्रकल्पाकडे जाणाºया जलवाहिनीतून थेंब-थेंब झिरपणाºया पाणवर ताहान भागवावी लागत आहे.

टॅग्स :Damधरण