शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

धाकटी डहाणूमध्ये पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:57 IST

पंधरा-वीस दिवसांआड पुरवठा : जलवाहिनीतून झिरपणाऱ्या पाण्याने भागते तहान

शौकत शेख।डहाणू : सूर्या प्रकल्पाअंतर्गत येणाºया धामणी, कवडास, साखरे धरणांचे वरदान लाभलेल्या डहाणूवासीयांना जिल्हा परिषदेच्या पाणीपूरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आठ, पंधरा, तसेच वीस दिवसांआड पाणीपूरवठा होत असल्याने हजारो भूमिपुत्रांना साठवून ठेवलेले गढूळ तसेच दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे पंचायत समिती सदस्य वशीदस अंभिरे तसेच धा. डहाणूचे माजी सरपंच हरेश्वर तामोरे यांनी लोकमतला सांगितले.डहाणूच्या पश्चिम किनापट्टीवरील २६ गावांना बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपूरवठा योजनेअंतर्गत साखरे धरणांतून पाणी पूरवठा केला जातो. परंतु या योजनेला वीस, पंचवीस वर्ष झाल्याने त्याची जलवाहिनी, जलकुंभ, जिर्ण व जूनाट झाल्याने शासनाने बाडापोखरण पाणी पूरवठा योजनेच्या नुतनीकरणासाठी ४३ कोटी रूपये अनुदान मंजुर करून मार्च २०१४ ला दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली होती. परंतु अद्याप ही कामे अपूर्ण असल्याने सध्या जुन्याच जलवाहिनेने पाणी पूरवठा होत आहे. या प्रकारामुळे असंख्य गावांत तसेच खेडोपाडयात प्र्रेशरने पाणी जात नसल्याने येथील ग्रामस्थांना पूरेश प्रमाणात पाणी मिळत नाही. शिवाय अनेक गावांत आठ, दहा दिवसाने पाणी पूरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांना विहिर किंवा बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे.विशेष म्हणजे डहाणू तालुक्याच्या रेल्वेच्या पूर्व भागामध्ये मोठया प्रमाणात म्हणजेच शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली गावे आहेत. येथील असणाºया धरणांच्या उभारणीसाठी शासनाने आदिवासी उप योजनेतून ४८० कोटी खर्च केले आहेत. त्यातून वसई-विरार, भार्इंदर आदी शहरी भागाची तहाण भागविली जात असतांना येथील स्थानिक आदिवासी बांधव तहाणेणे व्याकुळ होत आहे.येथील गोर गरीब आदिवासींना या धरणातील नळापणीपूरवठा योजनेव्दारे किंवा इतर मार्गाने पिण्याच्या पाण्याच्या थेंब ही मिळत नाही. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील नागरिकांची अवस्था अशीच आहे. येथे दररोज पिण्याचे पाणी मिळत नसल्योन ग्रामस्थ त्रस्त आहेत. तर बाडा पोखरण योजनेचे शेवटचे गाव असलेले धा. उहाणूच्या रामपाडा, बारीवाडा, आदिवासीपाडा, माळी आळी, मधली आळी, मितनवाडी, हनुमान आळी या परिसरातील ग्रास्थांना वीस दिवसाने पाणी पूरवठा होत असल्याने ग्रामस्थ वीस दिवस साठवून ठेवलेले दुषीत, शिळे पाणी पित असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.थेंबेथेंबे घागर भरेपिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासींना हातपंप, खोल विहिरीतून किंवा डबक्यातील गढूळ दुषित पाणी प्यावे लागत आहे. तर वाणगांव पासून थेट धरणापर्यंत राहणाºया आदिवासींना मोठ मोठ्या शहरांना, तारापूर अणुशक्ती केंद्र, एम.आय.डी.सी. रिलायन्स एनर्जी सारख्या मोठ्या मोठ्या प्रकल्पाकडे जाणाºया जलवाहिनीतून थेंब-थेंब झिरपणाºया पाणवर ताहान भागवावी लागत आहे.

टॅग्स :Damधरण