शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधारेने पिवळ्या सोन्यावर पाणी; भातपीक वाया जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:48 IST

अस्मानी संकटामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकरी चिंतातुर 

पारोळ : वसई तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने भातशेतीला झोडपून काढल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. चांगले पिकलेले आणि हातात येण्याच्या तयारीत असलेले पीक हातातून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच वेधशाळेने १३ ते १७ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा दिला होता. दोन दिवस ढगाळ वातावरणानंतर बुधवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कापणी केलेल्या व कापणीसाठी तयार असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. 

दरवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात ७६ हजार हेक्टर क्षेत्र भातशेतीखाली येते. शेतकऱ्यांसह अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा याच भातशेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात रोजगार कमी असल्याने शेतकरी वर्षभर लागणारे भात याच शेतीतून पिकवत असतो, मात्र चालू वर्षी परतीच्या पावसाने कापणी केलेल्या भातपिकावर पाणी फेरले. 

आधीच कोरोना महामारीमुळे सर्व कामधंदे बंद असताना शेतकरीवर्ग आज फक्त शेतीवर अवलंबून आहे. भातशेती करताना शेतकरी सहकारी सोसायटी, सोने तारण ठेवून शेती कसत असतो. बी बियाणे, खते, औषधे, मजुरी महाग असतानाही आपला वर्षभराचा खावटीचा प्रश्न सुटावा यासाठी तो मेहनत करत असतो, पण दोन वर्षांपासून भात कापणीच्या वेळीच परतीचा पाऊस हजेरी लावत असल्याने हाती आलेले भात पीक वाया जात असल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे. 

या वर्षी भातशेती करणे महाग असतानाही लागवड केली. पण हळवे भात कापणी करताच परतीचा पाऊस सुरू झाल्याने माझ्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करावा. - प्रसाद पाटील, शेतकरी, आडणे

शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या तालुक्यात मागील गेल्या ४-५ दिवसांपासून सायंकाळी धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपचे जिल्हा परिषद  सदस्य कुसम झोले यांनी  मोखाडा तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी हळव्या भाताची कापणी सुरू आहे, परंतु परतीचा पावसाने भातपिके भिजवली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मोखाड्यात ९० ते १२०  दिवसांत तयार होणाऱ्या हळवार जातीचे भातपीक कापणीसाठी तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची कापणीची कामे जोरात सुरू आहेत, परंतु गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने भातपीक पुन्हा भिजले.  मागील वर्षीदेखील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त्याची अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही तसेच कोरोनाच्या महामारीत शेतकरी गरीब कुटुंबे देशोधडीला लागली असताना पुन्हा वरुणराजाची अवकृपा होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :palgharपालघरFarmerशेतकरीRainपाऊस