शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मुसळधारेने पिवळ्या सोन्यावर पाणी; भातपीक वाया जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:48 IST

अस्मानी संकटामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकरी चिंतातुर 

पारोळ : वसई तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने भातशेतीला झोडपून काढल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. चांगले पिकलेले आणि हातात येण्याच्या तयारीत असलेले पीक हातातून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच वेधशाळेने १३ ते १७ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा दिला होता. दोन दिवस ढगाळ वातावरणानंतर बुधवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कापणी केलेल्या व कापणीसाठी तयार असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. 

दरवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात ७६ हजार हेक्टर क्षेत्र भातशेतीखाली येते. शेतकऱ्यांसह अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा याच भातशेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात रोजगार कमी असल्याने शेतकरी वर्षभर लागणारे भात याच शेतीतून पिकवत असतो, मात्र चालू वर्षी परतीच्या पावसाने कापणी केलेल्या भातपिकावर पाणी फेरले. 

आधीच कोरोना महामारीमुळे सर्व कामधंदे बंद असताना शेतकरीवर्ग आज फक्त शेतीवर अवलंबून आहे. भातशेती करताना शेतकरी सहकारी सोसायटी, सोने तारण ठेवून शेती कसत असतो. बी बियाणे, खते, औषधे, मजुरी महाग असतानाही आपला वर्षभराचा खावटीचा प्रश्न सुटावा यासाठी तो मेहनत करत असतो, पण दोन वर्षांपासून भात कापणीच्या वेळीच परतीचा पाऊस हजेरी लावत असल्याने हाती आलेले भात पीक वाया जात असल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे. 

या वर्षी भातशेती करणे महाग असतानाही लागवड केली. पण हळवे भात कापणी करताच परतीचा पाऊस सुरू झाल्याने माझ्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करावा. - प्रसाद पाटील, शेतकरी, आडणे

शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या तालुक्यात मागील गेल्या ४-५ दिवसांपासून सायंकाळी धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपचे जिल्हा परिषद  सदस्य कुसम झोले यांनी  मोखाडा तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी हळव्या भाताची कापणी सुरू आहे, परंतु परतीचा पावसाने भातपिके भिजवली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मोखाड्यात ९० ते १२०  दिवसांत तयार होणाऱ्या हळवार जातीचे भातपीक कापणीसाठी तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची कापणीची कामे जोरात सुरू आहेत, परंतु गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने भातपीक पुन्हा भिजले.  मागील वर्षीदेखील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त्याची अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही तसेच कोरोनाच्या महामारीत शेतकरी गरीब कुटुंबे देशोधडीला लागली असताना पुन्हा वरुणराजाची अवकृपा होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :palgharपालघरFarmerशेतकरीRainपाऊस