शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जव्हार शहरातील प्रभाग ३ मध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 12:09 AM

पाणी सुविधेसाठी कुटुंबांनी केली मागणी : टँकरने भरावे लागते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये पाणीपुरवठ्याची भीषण समस्या आहे. येथील नागरिकांना टँकरने पाणी भरावे लागत आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिकांना पाणी भरून ओसंडून वाहत असून पिण्याच्या पाण्याने गाड्या धुतल्या जात आहेत. याबाबत नगर परिषद प्रशासनाचा पाणीपुरवठा विभाग निष्काळजीपणा दाखवत असल्याचा आराेप रहिवाशांकडून हाेत आहे.

नगर परिषदेचे पाणीपुरवठा विभागप्रमुख विशाल मोरे यांच्या निदर्शनास हा बेजबाबदारपणा आणूनही संबंधितांवर कारवाई केलेली नाही. या भागातील कुटुंबांना पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा प्रशासनाने मुख्य पाइपलाइनवरून एक-दीड इंचाची खास पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले आहे, पण हे काम अतिशय धिम्या गतीने होत आहे. तीन दिवसांपासून पाइपलाइन टाकण्याचे काम बंद आहे. शिवाय, खडखड नळपाणी योजनेचे खोदण्याचे काम सुरू असल्याने या भागात नगर परिषद यांच्याकडून टँकरद्वारे होत असलेला पाणीपुरवठाही बंद केला आहे. पाणीपट्टी कर भरूनही तीन वर्षांपासून या नागरिकांना पाणी मिळत नाही. दलित वस्ती सुधार योजनेतून सुमारे ४३ लाख रुपये खर्च केले आहेत. पण, पाण्यासाठी तरतूद केलेली नाही. ठेकेदाराच्या फायद्यासाठी प्रशासनाने हा निधी खर्च केल्याचा आराेप हाेत आहे. येथील महिलांना टँकरमधून पाणी भरावे लागत आहे. 

नगर परिषद पाणीपुरवठा विभागाने जनजागृती करून पाण्याचे महत्त्व समजावून द्यायला हवे. शिवाय ज्या कुटुंबांना पाणी येत नाही, त्यांना पाणी मिळावे यासाठी नवीन पाइपलाइनचे निर्देश देण्यात आले आहेत.- विशाखा अहिरे, स्थानिक नगरसेविका 

जे नागरिक पाण्याचा अपव्यय करताना आढळले आहेत त्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. पुन्हा असे कृत्य करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.- विशाल मोरे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जव्हार नगर परिषद