शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

विक्रमगड तालुक्यात पाण्याचा खडखडाट जनता त्रस्त; २७ गाव-पाड्यात पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:55 IST

१ गाव १९ पाडयात टॅकर प्रस्तावित: १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणी साठा

विक्रमगड : तालुक्यातील गाव पाड्यात पाणी टंचाई तीव्र झाली असून मे महिन्याच्या प्रखर उन्हात भीषण पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते आहे. ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मात्र याकडे संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. जर गैरसोयीकडे वेळेच लक्ष केंद्रित न केल्यास तालुक्यातील पाणी प्रश्न जुनच्या पहिल्या आठवड्यात अधिक भीषण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांना पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे अनेक कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. तर काही भागात विहिरींना तळ गाठला आहे. विक्रमगड तालुक्यातील लघुसिंचन प्रकल्प खांड तर लघुसिंचन प्रकल्प मोहूँ खुर्द यातील पाणी झपाट्याने आटू लागले असून गेल्या ३० वर्षात पाहिल्यांदा या लघुप्रकल्पातील पाणी इतके कमी झाले असून हे बंधारे आटले आहेत. तसेच तालुक्यातील देहर्जा, पिंजाळ, तांबाडी या प्रमुख तीन नदयाची पात्रे कोरडी ठाक पडली आहेत. तालुक्यात जेमतेम १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. तालुक्यात अनेक कूपनलिका दुरुस्त करण्यात प्रशासनाकडून हलगर्जी होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे विहिरी बांधण्याच्या कामामध्ये आवश्यक ती गती येत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेक कूपनलिका नादुरु स्त असल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना घेता येत नाही.

तालुक्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची सुरु वात होते व मे ङ्क्त जूनच्या दरम्यान ती पराकोटीला पोहचते दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला यश आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची यामध्ये हलगर्जी होत असल्याचे दिसून येते. तालुक्यातील कवडास (खोरीपाडा) केव- शेलारआली, सासेआली, रावतेपाडा, वसुरी- सहारेपाडा, बास्ते-दिवेपाडा, बास्ते-गावठाण, टेटवाली-काटकरीपाडा,खुडेद-बिरारीपाडा, साखरे- डोंगरिपाडा, आपटी बु. - पर्हाडपाडा, दांडेकरपाडा, सारशी- तांबडमाळ, खडकी-रिंजडपाडा, केव-रावतेपाडा, तरेपाडा, केव-सासेआळी, शेलारआळी, सुकसाळे- सुरु मपाडा, असे एक गाव व १९ पाड्याना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव आहेत. अनेक गाव पाड्यांना पाणीटंचाईचा फटका बसला असून यावर प्रशासनाकडून अजूनही कोणतीही कायम स्वरूपाची उपाय योजना केली गेली नाही. बोअरवेल दुरुस्त करणे नव्या विहिरी बांधणे, त्यासाठी लाभार्थ्यांना योग्यवेळेत निधी उपलब्ध करून देणे अशी कामे होणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाकडून दरवर्षी ह्या गावांना पाणीटंचाई झळ पोहचत असतांना व नव्याने भर पडत असातांना गाव-पाड्यासाठी पाणी पुरवठयात हलगर्जी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे

गंभीर दुष्काळाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष:विक्रमगड तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात गंभीर दुष्काळात तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. दुष्काळी नागरीकांसाठी उपाययोजनाची अमलबंजावणी सुरु असली ती संथ गतीने सुरु आहे. सध्या तालुक्यात पाणीटंचाईची उग्र रूप धारण केले आहे. कधी नव्हे ते या वर्षी विक्र मगड तालुक्यातील लघुसिंचन प्रकल्प खांड तर लघुसिंचन प्रकल्प मोहूँ खुर्द येथील बंधाºयातील पाणी झपाट्याने आटू लागले आहे.सध्या ज्या गावात-पाड्यात पाणी टंचाई आहे. त्या मागणी व प्रस्ताव मंजुरी नुसार तीन टँकरने टंचाई ग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आसून अजुन काही गावात टंचाईनुसार टैंकर वाढ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जी गावे पाणी टंचाईग्रस्त आहेत अशा गावांना टँकरन जास्तीत जास्त पाणी पुरवठा करण्याची पुरेपूर खबरदारी घेतली जाईल. - मधुकर खुताडे, सभापती, पंचायत समिती विक्रमगड

२७ गाव पाड्यांना टँकरने पाणीपुरवठातालुक्यात पाणी टंचाईणे उग्र स्वरूप धारण केले असतांना प्रशासना कडून २७ गाव-पाड्यांना तीन टैंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. यामध्ये खुडेद- घोडीचापाडा, कुंडाचापाडा, झापपाडा, महालेपाडा, जाधवपाडा, सुकसाले- नचणपाडा, सुरु मपाडा, कोंडगाव- गावठाण, सवादे- फडवलेपाडा, कोबाडपाडा, कुंज-बटरीपाडा, साखरे-पागीपाडा, दातेपाडा, राऊतपाडा, आंबिवली-ठाकरेपाडा, विजयनगर, जांभे- गांगडपाडा, घाणेघर- फरलेपाडा, काचरपाडा, मेढीपाडा, पाटिलपाडा, टेटवाली- काकडपाडा, केव-नाळशेत-गावठाण, केव-शिळशेत- तरेपाडा/वेडगेपाडा, तलवाडा-शनवारपाडा, दादडे-रोजपाडा, देहर्जे-घाटाळपाडा, पाड्यांना तीन टैंकरने पाणी पुरवठा केला जात असून १७ फेऱ्या केल्या जात आहेत. दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे तर काही पाड्याना दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा केला जात आहे

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई