शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

पाणी ओसरले पण नुकसान मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:49 AM

वसई तालुक्यात सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या गाड्याही अनेक ठिकाणी पोहचणे अशक्य बनले आहे.

विरार : वसई तालुक्यात सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या गाड्याही अनेक ठिकाणी पोहचणे अशक्य बनले आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी कचºयाचे ठिग वाढले आहेत. पाण्यासोबत लोकांच्या घरात, सोसायटीत कचरा गेल्याने घाणीच्या समस्येला नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे. सतत पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यावर कचरा साचून राहिल्याने अस्वच्छता व दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे.ज्या ठिकाणी पालिकेच्या गाड्या जाणे शक्य आहे. तेथील कचरा पालिकेच्या सफाई कर्मचाºयांनी उचला आहे. मात्र, अनेक ठिकाणी कुजलेला भाजीपाला व अन्य कचरा साचलेल्या पाण्यात कडून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीचे आजार देखील मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असल्याने महापालिकेने तातडीने त्यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.जवळपास ३० लाख लोकसंख्या असल्येल्या शहरात गेल्या ३ दिवसापासून लागातार पाऊस झाल्याने सर्वच यंत्रणांची परीक्षा झाली. दुकानात ग्राहक नसल्याने दुकानदारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचसोबत दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भिजलेले सामान फुकून देण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. तसेच अनेक ठिकाणी सोसायटीच्या टाक्यांमध्ये दुषीत पाणी गेल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.वसई तालुक्यात अनेक ठिकाणी जवळपास ३६ तास लाईट नव्हती. त्यामुळे लोकांना अजूनच त्रासाला सामोरी जावे लागले होते.पोलीस आणि पालिका कर्मचाºयांची मोठी कसरतवीज नसल्याने मोबाईल सेवा देखील ठप्प झाल्या होत्या. सर्वत्र पाणी भरल्याने लाईट बंद ठेवली गेली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी मीटरमध्ये पाणी गेल्याने पाऊस गेल्यानंतर देखील मीटर खराब झाल्याने लाईट आली नव्हती.महापालिकेच्या कर्मचाºयांनी अगदी २४ तास न झोपता काम केले. त्याचबरोबर पोलीस देखील मुसळधार पावसात २४ तास काम करत होते. अनेक ठिकाणी पावसात बंद पडलेल्या गाड्या हलवण्याचे काम देखील पोलीस करत होते. नागरिकांचे सेवेसाठी त्यांनी मोठी कसरत केली

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या