शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

पाणीबाणीचे संकट : पालघर जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 23:42 IST

पालघर जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेने २३६.९ मिमी पाऊस कमी झाल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. मागच्या दशकातील हा सर्वात कमी पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

पालघर  - पालघर जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेने २३६.९ मिमी पाऊस कमी झाल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. मागच्या दशकातील हा सर्वात कमी पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पाशर््वभूमीवर जिल्ह्यातील धरणात एक महिनाभर पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा पाणीसाठा असल्याचे सांगितले जात असले तरी हा पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास जिल्ह्यात पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होऊन मोठे जलसंकट निर्माण होऊ शकते.पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात सूर्या मोठा प्रकल्प, मोहखुर्द लघु पाटबंधारे योजना, खांड लघु पाटबंधारे योजना, पालघर तालुक्यात वांद्री मध्यम प्रकल्प मनोर लघु पाटबंधारे योजना, देवखोप लघु पाटबंधारे योजना, माहीम- केळवा लघु पाटबंधारे योजना तर डहाणू तालुक्यात रायतळे लघु पाटबंधारे योजना अशा ८ प्रकल्पांतर्गत प्रकल्पिय पिण्याचा पाणीसाठा, सिंचनक्षमता जिल्ह्यासाठी कार्यान्वित आहे. यातील सूर्या मोठा प्रकल्प, माहीम-केळवे लघु पाटबंधारे योजना व खांड लघुपाटबंधारे योजनेतून जिल्ह्यातील काही तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.जिल्ह्यात सूर्य मोठा प्रकल्प हा विक्र मगड तालुक्यात असून त्याची उपयुक्त क्षमता २८६.३१० दलघमी इतकी असून मृत पाणीसाठा (वापरात नसलेला) १२.७०० दलघमी असा एकूण २९९.०१० दलघमी अशी क्षमता आहे. २३ जून २०१९ पर्यंत यात ५२.०१५ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक असून त्याची टक्केवारी १८.८४ टक्के इतकी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ४४.५२ दलघमी इतका कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या प्रकल्पांतर्गत वसई, विरार, टीएपीएस, बीएआरसी, बाडा पोखरण डहाणू, पालघर २७ गावे आदींना पाणीपुरवठा केला जात असून त्यांची दररोज सुमारे ०.२० दलघमी एवढी पाण्याची मागणी आहे. मात्र या प्रकल्पातून सिंचनासाठीही पाणी दिले जात असल्याने त्यांची संपूर्ण मागणी पूर्ण करता येत नाही.माहीम केळवा लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत धरणातून पालघर तालुक्यातील केळवे रोड, आगरवाडी, नगावे, विळगी वेंगनी, तिघरे, दांडा -खटाळी, भादवे, मथाने, एडवन, कोरे, खर्डी, दातिवरे आदी भागात पाणीपुरवठा केला जात असून या प्रकल्पाची वापरता येण्याजोगा पाणीसाठा क्षमता ३.२४३ दलघमी इतका असून वापरता न येण्या जोगा (मृत) पाणीसाठा ०.१५६ दलघमी असा एकूण ३.३९९ दलघमी इतका पाणीसाठा क्षमता आहे. सोमवारी (२३ जून)पर्यंत या धरणात ०.९३४ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक असून मागच्या वर्षाच्या तुलनेने ०.१८६ इतका कमी आहे. तरीही एक महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता आर.आर.पाध्ये यांनी सांगितले. खांड लघु पाटबंधारे योजनेतर्गत विक्र मगड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून या धरणाची क्षमता ४.५०० दलघमी इतकी आहे. यातील वापरता न येण्याजोगा मृत पाणीसाठा ०.२६० दलघमी इतका असून एकूण ४.७६० दलघमी इतकी साठवणूक क्षमता आहे. या धरणात सध्या ०.४०८ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ०.०४४ दलघमी इतका अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.तरच जव्हारला प्यायला पाणीजव्हारला जयसागर डॅममधून पाणीपुरवठा केला जात असून यामधील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने जव्हारकरांचे तोंडाचे पाणी पळाले आहे. त्यांची सारी भिस्त पावसावर अवलंबून असल्याने त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारwater scarcityपाणी टंचाई