शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

स्वच्छतादूत सुशीलाची रोजगारासाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 00:40 IST

दुपारच्या रणरणत्या उन्हात सात महिन्यांची गर्भवती हातात पहार घेऊन खड्डा खणतेय.

रवींद्र साळवे मोखाडा : दुपारच्या रणरणत्या उन्हात सात महिन्यांची गर्भवती हातात पहार घेऊन खड्डा खणतेय. मधूनच क्षणभर विसावत घाम पुसते. पुन्हा एकाग्रतेने काम सुरू. तीन दिवस सतत काम करून ती हा खड्डा पूर्ण करते. पुढच्या चार दिवसांत या शोष खड्ड्यावर स्वच्छतागृह उभे राहते.हे सगळे केले आहे सुशीला खुरकुटे यांनी. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील नांदगाव या छोट्याशा गावातील जिद्दी महिला. २०१७ मध्ये पालघर जिल्हा स्वच्छता अभियानाच्या त्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शक्ती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला. तसेच राष्ट्रीय पातळीवर निवडल्या गेलेल्या अशाच ३० जिगरबाज महिलांसोबत सुशीला यांचेही नाव जोडले गेले. यामुळे सहाजिकच सरकार आमच्याकडे लक्ष देईल, असे त्यांना वाटतं होते. परंतु मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे कुटूंब आजही रोजगारासाठी भटकत आहे.गावातील इतर महिलांप्रमाणे सुशीला यांना उघड्यावर प्रातर्विधीसाठी जावे लागायचे. त्यांनी स्वच्छ भारत अभियानाबद्दल ऐकले. घरात स्वच्छतागृह असायला हवे. त्यातून स्वच्छता राहील आणि आपल्या कुटुंबाचे, मुलांचे आरोग्यही जपता येईल, हे पंतप्रधान मोदींचे विचार तिला मनोमन पटले. मजूर लाऊन खड्डा खोदण्या इतपत सुशीलाकडे पैसे नव्हते आणि मदतीला पतीला घ्यावे तर रोजगार बुडणार. मग सुशीला यांनी स्वत:च पहार घेऊन काम सुरू केले. याच दरम्यान ‘युनिसेफ’चे सल्लागार जयंत देशपांडे तिथून जात असताना त्यांनी सुशीला यांचा काम करताना फोटो काढला. राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव राजेश कुमार यांनी याची दखल घेत सुशीलाबार्इंचे नाव केंद्र सरकारकडे धाडले.केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता सचिव परमेश्वर अय्यर यांनी तो टिष्ट्वट केला आणि चक्र े फिरली. मोदी सरकारने सुशीला यांना तत्काळ मदत करत त्यांच्यासाठी स्वच्छतागृह बांधून पूर्ण केले. शिवाय त्या गावातील इतर महिलांचे प्रेरणास्थान व्हावे म्हणून पंतप्रधान मोदींनी त्यांना स्वच्छतादूत बनवले. संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या त्या ‘स्वच्छतादूत’ झाल्या.पंतप्रधान कार्यालयाने सुशीलाबार्इंच्या कामाची नोंद घेतली. महाराष्ट्रातून पाठवलेल्या १५ नावांमधून त्यांना राष्ट्रीय पातळीवर शक्ति सन्मानासाठी निवडले व गुजरातमधील गांधीनगर येथे ८ मार्च २०१७ रोजी महिला दिनी खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.सुरुवातीला त्या अनेकवेळा माध्यमांसमोर झळकल्या परंतु माध्यमांसमोर झळकल्याने पोटाची खळगी थोडीच भरणार होती. त्यामुळे तिचा हा सन्मान सत्कार सोहळा पुरस्कारापुरताच मर्यादित राहिल्याचे म्हणावे लागेल. पंतप्रधान यात लक्ष घालणार का खरा प्रश्न आहे.>सरकारी मदतीपासून वंचितसुशीला यांना सरकारी मदत तर सोडाच परंतु स्वच्छतादूत असलेल्या त्यांना आजपर्यंत कोणत्याही सरकारी कार्यक्र मातही बोलावण्यात आलेले नाही. सरकारकडून कोणतीच मदतही मिळाली नाही. आजही या कुटुंबाचा रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेचा लाभही सुशीलाच्या कुटुंबाला मिळालेला नाही. दरवर्षीच सुशीलाच्या कुटुंबीयांना रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागते. यामुळे सरकारने या कुटुंबीयांना रोजगार दिला असता तर त्यांना स्थलांतरित तरी व्हावे लागले नसते, असे मत युवा आदिवासी संघटनेचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>मोदी दादा मला स्वच्छतादूत बनवलं हे तू चांगलं केलं, परंतु मला काम दिलं नाही. काम दिलं असतं तर मला माझ्या लहान मुलांना कामासाठी बाहेरगावी घेऊन जावं लागलं नसतं. म्हणून तू मला काम दे’.- सुशीला खुरकुटे,स्वच्छतादूत, पालघर