शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

स्वच्छतादूत सुशीलाची रोजगारासाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 00:40 IST

दुपारच्या रणरणत्या उन्हात सात महिन्यांची गर्भवती हातात पहार घेऊन खड्डा खणतेय.

रवींद्र साळवे मोखाडा : दुपारच्या रणरणत्या उन्हात सात महिन्यांची गर्भवती हातात पहार घेऊन खड्डा खणतेय. मधूनच क्षणभर विसावत घाम पुसते. पुन्हा एकाग्रतेने काम सुरू. तीन दिवस सतत काम करून ती हा खड्डा पूर्ण करते. पुढच्या चार दिवसांत या शोष खड्ड्यावर स्वच्छतागृह उभे राहते.हे सगळे केले आहे सुशीला खुरकुटे यांनी. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील नांदगाव या छोट्याशा गावातील जिद्दी महिला. २०१७ मध्ये पालघर जिल्हा स्वच्छता अभियानाच्या त्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शक्ती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला. तसेच राष्ट्रीय पातळीवर निवडल्या गेलेल्या अशाच ३० जिगरबाज महिलांसोबत सुशीला यांचेही नाव जोडले गेले. यामुळे सहाजिकच सरकार आमच्याकडे लक्ष देईल, असे त्यांना वाटतं होते. परंतु मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे कुटूंब आजही रोजगारासाठी भटकत आहे.गावातील इतर महिलांप्रमाणे सुशीला यांना उघड्यावर प्रातर्विधीसाठी जावे लागायचे. त्यांनी स्वच्छ भारत अभियानाबद्दल ऐकले. घरात स्वच्छतागृह असायला हवे. त्यातून स्वच्छता राहील आणि आपल्या कुटुंबाचे, मुलांचे आरोग्यही जपता येईल, हे पंतप्रधान मोदींचे विचार तिला मनोमन पटले. मजूर लाऊन खड्डा खोदण्या इतपत सुशीलाकडे पैसे नव्हते आणि मदतीला पतीला घ्यावे तर रोजगार बुडणार. मग सुशीला यांनी स्वत:च पहार घेऊन काम सुरू केले. याच दरम्यान ‘युनिसेफ’चे सल्लागार जयंत देशपांडे तिथून जात असताना त्यांनी सुशीला यांचा काम करताना फोटो काढला. राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव राजेश कुमार यांनी याची दखल घेत सुशीलाबार्इंचे नाव केंद्र सरकारकडे धाडले.केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता सचिव परमेश्वर अय्यर यांनी तो टिष्ट्वट केला आणि चक्र े फिरली. मोदी सरकारने सुशीला यांना तत्काळ मदत करत त्यांच्यासाठी स्वच्छतागृह बांधून पूर्ण केले. शिवाय त्या गावातील इतर महिलांचे प्रेरणास्थान व्हावे म्हणून पंतप्रधान मोदींनी त्यांना स्वच्छतादूत बनवले. संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या त्या ‘स्वच्छतादूत’ झाल्या.पंतप्रधान कार्यालयाने सुशीलाबार्इंच्या कामाची नोंद घेतली. महाराष्ट्रातून पाठवलेल्या १५ नावांमधून त्यांना राष्ट्रीय पातळीवर शक्ति सन्मानासाठी निवडले व गुजरातमधील गांधीनगर येथे ८ मार्च २०१७ रोजी महिला दिनी खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.सुरुवातीला त्या अनेकवेळा माध्यमांसमोर झळकल्या परंतु माध्यमांसमोर झळकल्याने पोटाची खळगी थोडीच भरणार होती. त्यामुळे तिचा हा सन्मान सत्कार सोहळा पुरस्कारापुरताच मर्यादित राहिल्याचे म्हणावे लागेल. पंतप्रधान यात लक्ष घालणार का खरा प्रश्न आहे.>सरकारी मदतीपासून वंचितसुशीला यांना सरकारी मदत तर सोडाच परंतु स्वच्छतादूत असलेल्या त्यांना आजपर्यंत कोणत्याही सरकारी कार्यक्र मातही बोलावण्यात आलेले नाही. सरकारकडून कोणतीच मदतही मिळाली नाही. आजही या कुटुंबाचा रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेचा लाभही सुशीलाच्या कुटुंबाला मिळालेला नाही. दरवर्षीच सुशीलाच्या कुटुंबीयांना रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागते. यामुळे सरकारने या कुटुंबीयांना रोजगार दिला असता तर त्यांना स्थलांतरित तरी व्हावे लागले नसते, असे मत युवा आदिवासी संघटनेचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>मोदी दादा मला स्वच्छतादूत बनवलं हे तू चांगलं केलं, परंतु मला काम दिलं नाही. काम दिलं असतं तर मला माझ्या लहान मुलांना कामासाठी बाहेरगावी घेऊन जावं लागलं नसतं. म्हणून तू मला काम दे’.- सुशीला खुरकुटे,स्वच्छतादूत, पालघर