शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

सुन्या सुन्या मैफिलीत रंग भरण्याची प्रतीक्षा; श्रावणी पर्यटन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:40 IST

तरुणाईच्या आनंदावर विरजण, पर्यटन व्यावसायिक मेटाकुटीला

- आशिष राणे वसई : कोरोनाचे संकट आले आणि सर्वच मैफिली सुन्या सुन्या झाल्या. अगदी ऐन पावसात रंगाचा बेरंग झाला. पावसाळा सुरू झाला की, आपोआप तरुणाईची पावले पडतात ती निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे. त्यात पावसाची रिमझिम व त्याला मित्र-मैत्रिणींची सोबत असेल तर मग काय आनंदाला पारावारच राहत नाही. मात्र मागील चार महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे सर्व पर्यटनस्थळे बंद असल्याने तरुणाईच्या आनंदावर अक्षरश: विरजण पडले आहे.

सध्या कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. पर्यटन व्यावसायिक, रिसॉर्ट मालक बंद पडलेली पर्यटकांची ही मैफील पुन्हा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मागील मार्च महिन्यापासून पूर्णपणे हा व्यवसाय ठप्पच झाला असून आता हळूहळू शासन लॉकडाऊनमधून बाहेर पडत काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देत असले तरी गर्दीची ठिकाणे वगळण्यात येत आहेत. त्यात पर्यटन व्यवसायाचा समावेश आहे.

यंदा गटारीदेखील अशीच कोरडी गेली. कारण हॉटेल, रेस्टॉरंट, बार, रिसॉर्ट बंद आहेत. त्यामुळेही एक वेगळी मौजमजा वाया गेली, असे हौशी पर्यटक म्हणतात. ऐन गटारीच्या वेळी एका बाजूला पडणारा पाऊस आणि दुसऱ्या बाजूला पर्यटनस्थळांकडे येणारे पर्यटक असे चित्र वर्षानुवर्षे दिसत असले तरी या वर्षी मात्र सुट्टीचा काळ, मग शनिवार-रविवार असो वा सणासुदीची सुट्टी असो, कोरोनाच्या संकटात वाहून गेली. गटारीआधी व त्या दिवशी होणाºया सर्व मैफिली मात्र सुन्या झाल्या आणि त्याचा सर्वात जास्त फटका जसा पर्यटकांना बसला, तसाच तो पर्यटन व्यवसाय करणाऱ्यांनाही बसला आहे.

गटारीच्या काळात वेगवेगळ्या पर्यटन ठिकाणांवर लाखोंची उलाढाल होत होती, ती ठप्प झाली. या पर्यटन व्यवसायावर इतर अनेक उद्योग अवलंबून असून त्या उद्योगांनाही त्याचा फटका बसला आहे. अर्ना$ळा समुद्रकिनारा, कळंब, राजोडी बीच, तुंगारेश्वर, चिंचोटी धबधबा, वरई येथील गरम पाण्याची कुंडे, केळवा आणि माहीम बीच, बोर्डीचा समुद्रकिनारा, जव्हारमधील दाभोसा धबधबा अशी अनेक ठिकाणे आज पर्यटकांची चातक पक्ष्यासारखी वाट पाहत आहेत.

कोरोनामुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. त्याचप्रमाणे पर्यटन व्यवसायही बंद पडला आहे. शासनाने आता हा व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी आम्हाला मदतीचा हात द्यावा. या व्यवसायावर अनेक व्यवसायही अवलंबून आहेत. त्यांनाही फटका बसला आहे. शासनाचे नियम व अटी पाळून हा व्यवसाय आता सुरू झाला पाहिजे.- धीरज निजाई, क्षितिज रिसॉर्ट, मिनी गोवा, कळंब

देशातील आणि राज्यातील पर्यटक आपल्याकडील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी उत्सुक आहेत. त्या दृष्टीने त्यांच्याकडून विचारणा होत आहे. लॉकडाऊनपूर्वी परदेशी पर्यटक वसई व आसपासचा भाग पाहण्यासाठी येत होते. त्या ठिकाणी आता राज्यातील पर्यटक विचारणा करत आहेत. पालघर जिल्ह्यात तसेच वसईत तसा प्रयत्न झाल्यास नक्कीच शासनास महसूल मिळण्यास मदत होईल.- किरण भोईर, संचालक, केएमसी हॉलिडेज

टॅग्स :Vasai Virarवसई विरार