शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

विवेक पंडित भाजपामध्ये? उपनेतेपदासह शिवसेनेला सोडचिठ्ठी, पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:56 IST

माजी आमदार विवेक पंडित यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदासह पक्षालाही सोडचिठ्ठी दिली आहे. तसा मॅसेज पाठवून त्यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे आभार मानले आहेत. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पंडितांच्या श्रमजीवी संघटनेने भाजपाला पाठिंबा जाहिर केल्याने त्यांची भाजपाशी जवळीक झाल्याचे लपून राहिलेले नाही.

- शशी करपे ।माजी आमदार विवेक पंडित यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदासह पक्षालाही सोडचिठ्ठी दिली आहे. तसा मॅसेज पाठवून त्यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे आभार मानले आहेत. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पंडितांच्या श्रमजीवी संघटनेने भाजपाला पाठिंबा जाहिर केल्याने त्यांची भाजपाशी जवळीक झाल्याचे लपून राहिलेले नाही.श्रमजीवी संघटनेचे नेते, माजी आमदार पंडित गेली अनेक वर्षे शिवसेनेचे उपनेते आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पंडित यांनी वसई मतदारसंघात हितेंद्र ठाकूरांच्या उमेदवाराला पराभूत करीत मोठा हादरा दिला होता. त्यामुळे पंडितांचे शिवसेनेत वजन वाढले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंडितांनी राजकारणाशी फारकत घेत आदिवासींच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले होते. शिवसेनेशीही त्यांचा दुरावा निर्माण झाला होता.खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून पंडितांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पंडितांची जवळीक वाढत चालली असल्याचे दिसत होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी वसई विरार परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना आपण माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी ऋणी आहे. आपले वैयक्तिक संबंध असेच राहू द्या ही पांडुरंगाकडे प्रार्थना, असा मॅसेज पंडितांनी पाठवल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोकमतने मागोवा घेतला असता पंडितांनी शिवसेनेचे उपनेतेपद आणि पक्ष सोडला असल्याची विश्वसनिय माहिती मिळाली. याप्रकरणी पंडितांशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे, पंडित संस्थापक अध्यक्ष असलेल्या श्रमजीवी संघटनेने शुक्रवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यात होणाºया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा जाहिर केल्याची माहिती संघटनेच्या उपाध्यक्षा आणि पंडितांच्या कन्या आराध्य पंडित यांनी दिली. ते भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताला आधार मिळाला़मोठे स्थान मिळणार असल्याची चर्चापंडितांना भाजपात मोठे स्थान देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रियाच बदलली आहे. पूर्वी मंडळाचे अध्यक्षपदावर आदिवासी विकास मंत्री व उपाध्यक्षपदावर आदिवासी विकास राज्यमंत्री पदसिद्ध असत.नव्या धोरणानुसार आदिवासी समाजासाठी व्यापक योगदान दिलेल्या व्यक्तींना अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद दिले जाणार आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जाही देण्यात आला आहे. पंडितांना भाजपात सामावून घेण्यासाठी हा बदल करण्यात आला असून अध्यक्षपदावर पंडितांची वर्णी लावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :BJPभाजपा