शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप, पालघर जिल्ह्यात ४,४३८ गणेशमूर्तींचे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 1:35 AM

पालघर जिल्ह्यात अगदी साधेपणाने बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यंदा पालघर जिल्ह्यातील ११ दिवसांच्या १०९ सार्वजनिक तर ४३२९ खाजगी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

नालसोपारा : कोरोनाच्या विघ्नामुळे पालघर जिल्ह्यातील गणरायांच्या संख्येत यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली होती. जिल्ह्यात मंगळवारी अनंत चतुर्दशीनिमित्त अकरा दिवसांच्या गणरायांना भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. जिल्ह्यात सुमारे ४४३८ बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. या वेळी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठेही या विसर्जनाला गालबोट लागू नये म्हणून वाहतूक पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालघर जिल्ह्यात अगदी साधेपणाने बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यंदा पालघर जिल्ह्यातील ११ दिवसांच्या १०९ सार्वजनिक तर ४३२९ खाजगी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाने बाप्पांचा उत्सव साधेपणाने व सरकारी नियमांतच राहून साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिसाद देत साधेपणाने, गाजावाजा न करता बाप्पांचा उत्सव साजरा केला. याआधी दीड, अडीच, पाच, सहा आणि सात दिवसांच्या जिल्ह्यात १८३२२ घरगुती आणि ४७९ सार्वजनिक बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला होता.जिल्ह्यात मंगळवारी अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. वसई तालुक्यात विसर्जन प्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले. पालघर जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश असतानाही ११ दिवसांच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक काढून, चारपेक्षा जास्त जण एकत्र आल्याने आणि तोंडाला मास्क न लावल्या प्रकरणी पोलिसांनी हे पाच गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी विरारमध्ये एक, नालासोपारा येथे एक, तुळिंजला दोन आणि वसईला एक असे एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.जव्हारमध्ये भक्तिभावात विसर्जनजव्हार : जव्हारमध्ये कुठलाही गाजावाजा न करता भजन-कीर्तन गात भक्तिभावाने गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव व शासकीय नियम, अटींच्या बंधनामुळे यंदा सर्व मंडळे तथा घरगुती गणपतीचे विसर्जन साधेपणाने करण्यात आले. जव्हार तालुक्यात १४ सार्वजनिक मंडळांचे तर ५० घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.जव्हार शहरातील शेकडो वर्षांची परंपरा असलेला ऐतिहासिक सार्वजनिक श्रीराम मंदिर गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा शहरातील मानाचा गणपती मानला जातो. दरवर्षी ढोल, ताशा, बॅन्जोच्या तालात नाचत, वाजत-गाजत मिरवणूक निघते. यंदा मंडळाच्या महिला वर्गाने नियमात राहून भजन कीर्तनाचे गायन करीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जव्हारच्या सूर्या तलावात विसर्जन करण्यात आले. तसेच यंदा अंबिका मंदिर मित्रमंडळाने घोड्याच्या बग्गीवर गणपती विराजमान करून शहरात मिरवणूक काढून शांततेत विसर्जन केले. विसर्जनाची संपूर्ण तयारी नगर परिषदेकडून करण्यात आली होती, तर पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.बाप्पांना पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप : वसईमध्ये ३२१५ गणेशमूर्तींचे विसर्जनपारोळ : यंदा कोरोना विघ्नामुळे गणरायांच्या उत्सवात हवा तसा जल्लोष भाविकांना करता आला नाही. बाप्पांचा उत्सव सरकारी नियमांतच राहून करण्याची नियमावली असल्यामुळे कोठेही भाविकांना जंगी मिरवणूक काढण्यास मनाई होती. कोरोनामुळे वसई-विरारमधील गणरायांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाली होती. याच पार्श्वभूमीवर वसई-विरारकरांनी मंगळवारी अनंत चतुर्दशीनिमित्त ११ दिवसांच्या लाडक्या गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. वसई तालुक्यात सुमारे ३२१५ बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला असा जयघोष भाविकांकडून पाहायला मिळाला. बाप्पांना निरोप देताना अनेक भाविकांचे डोळे पाणावले होते. मात्र, भाविकांनी शासनाच्या नियमांचे पालन करत पालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेल्या ३० ठिकाणी बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. कोठेही या विसर्जनाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.वाड्यात गणपतींना साध्या पद्धतीने निरोपलोकमत न्यूज नेटवर्कवाडा : दहा दिवसांच्या मुक्कामानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीला वाड्यात ७ सार्वजनिक आणि ३२ घरगुती बाप्पांना अगदी साध्या पद्धतीने गणेशभक्तांनी निरोप दिला. गणपती विसर्जनाच्या वेळी सुरक्षित अंतर ठेवून कुठेही गर्दी न करता गुलाल, फटक्यांची उधळण न करता शासनाच्या नियमांचे पालन करून भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्यात आला. कोरोनाच्या सावटामुळे या वर्षी प्रथमच मिरवणुका व डिजेच्या आवाजाविना शांततेत, परंतु भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanesh Mahotsavगणेशोत्सवpalgharपालघर