शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

विरारमधून संपूर्ण कुटुंब गायब, सुनेची पोलिसांत तक्रार, सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:17 IST

विरारमधून एका कुटुंबातील सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता झाले आहेत. अमरावती येथे राहणा-या त्यांच्या सुनेच्या तक्रारीनंतर अर्नाळा सागरी पोलीस कुटुंबांचा शोध घेत असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही.

- शशी करपेवसई : विरारमधून एका कुटुंबातील सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता झाले आहेत. अमरावती येथे राहणाºया त्यांच्या सुनेच्या तक्रारीनंतर अर्नाळा सागरी पोलीस कुटुंबांचा शोध घेत असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही.विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीमध्ये शर्मा कुटुंब राहते. सुरेंद्र शर्मा (५०), पत्नी अनिता शर्मा, वरुण शर्मा (२७), अश्विनी शर्मा (३४), प्रियंका शर्मा (१६), मालती शर्मा (५२) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. वरुणची पत्नी संगीता शर्मा बाळंतपणासाठी माहेरी अमरावती येथे गेल्या आहेत. १५ जूनला संगीताला मुलगी झाली. त्यानंतर वरुण १५ दिवस अमरावतीला राहिला होता. आॅगस्टमध्ये वरुणचे वडील सतीशचंद्र शर्मा यांचे निधन झाले होते. त्यानंतर वरुण आॅक्टोबर महिन्यात अमरावतीला जाऊन संगीता आणि मुलीला भेटूनही आला होता. १४ आॅक्टोबरला संगीता आणि वरुण यांच्यात मोबाइलवर शेवटचे बोलणे झाले होते. वरुणचा संपर्क होत नसल्याने संगीता शर्मा यांनी वरुणचे काका सुरेंद्र शर्मा यांना फोन केला असता थोड्या वेळाने फोन करतो असे उत्तर त्यांनी दिले होते. तेव्हापासून सर्वांचेच मोबाइल बंद झाले होते.धास्तावलेल्या संगीता शर्मा यांनी गुगलवरून अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी शर्मा यांच्या घरी धाव घेतली असता त्यांचे घर बंद आढळून आले. पोलिसांनी शेजाºयांकडे चौकशी केली तेव्हा काही दिवस नाशिकला जात आहोत, असे शर्मा कुटुंबाने त्यांना सांगितल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही फूटेज तपासले आहे. १५ आॅक्टोबरला पहाटे साडेतीनच्या सुमारास सहा जण एका भाड्याच्या कारमध्ये सामान टाकून बसून निघून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.मोबाइल लोकेशन मिळणेही कठीणपोलिसांनी शर्मा कुुटुंबीयांचे मोबाइल लोकेशन तपासले तेव्हा पहिल्यांदा नाशिक दाखवले गेले. त्यानंतर सुरत लोकेशन मिळाले. पण, नंतर सर्वांचेच मोबाइल बंद असल्याने लोकेशन मिळणेही कठीण होऊन बसले आहे. अर्नाळा पोलिसांनी शर्मा कुुटुंबीयांच्या शोधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. कर्ज, आर्थिक व्यवहार किंवा कौटुंबिक कलह आहे किंवा काय यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार