शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

विरार-डहाणू रेल्वेचा होणार कायापालट

By admin | Updated: January 26, 2017 02:55 IST

पश्चिम रेल्वेच्या 3 हजार ५५२ कोटी खर्चाच्या एमयूटीपी ३ प्रकल्पांतर्गत विरार-डहाणू दरम्यान येत्या चार पाच वर्षात चौपदीकरणाद्वारे मोठे जाळे उभारले

हितेन नाईक / पालघरपश्चिम रेल्वेच्या 3 हजार ५५२ कोटी खर्चाच्या एमयूटीपी ३ प्रकल्पांतर्गत विरार-डहाणू दरम्यान येत्या चार पाच वर्षात चौपदीकरणाद्वारे मोठे जाळे उभारले जाणार असून या रेल्वेचा कायापालट होणार आहे. यावेळी सद्यस्थितीतील रेल्वे ट्रॅकच्या पूर्वेकडून मालवाहतूक प्रकल्प तर पश्चिमेकडून चौपदीकरण होणार असल्याने त्या आड येणाऱ्या पालघर ते वाणगाव दरम्यानच्या स्टेशनाजवळील रेल्वेच्या अनेक जुन्या, नवीन इमारती जमीनदोस्त होणार आहेत.एमयूटीपी अंतर्गत विविध प्रकल्पात मंजुरी मिळाल्याची घोषणा अलीकडेच करण्यात आल्यानंतर एमयूटीपी ३ अंतर्गत विरार डहाणू चौपदीकरण करण्यासंबंधीचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यासाठी एका खाजगी कंपनीला ह्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी व अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार या कंपनीने विरार ते डहाणू दरम्यानच्या प्रवाशांची (अप-डाऊन) सध्याची संख्या व त्यात पुढील ३० वर्षात होणारी वाढ, या विविध भागात होणारे शहरीकरण, औद्योगिकरण याचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. या प्रकल्पातंर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा करतांना विरार-डहाणू दरम्यानच्या प्रवाशांसाठी सन २०२१ पर्यंत दर १२ मिनिटाला एक लोकल अशी सेवा उपलब्ध राहणार आहे. सन २०३१ मध्ये ६ मिनिटाला एक लोकल, सन २०१४ मध्ये दर ४ मिनिटाला एक लोकल प्रवाशाच्या दिमतीला देण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. याच वेळी ९० हजार कोटी खर्चाची मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ही याच मार्गावरून धावणार आहे. प्रवाशांना जादा लोकलच्या फेऱ्या बरोबरच वैतरणा-डहाणू दरम्यानच्या ९ स्थानकांच्या जोडीला वाढीव, सरतोंडी, माकूणसार, चिंतूपाडा, खराळे रोड, पंचाळी, वंजारवाडा, बीएसई एस कॉलनी अशी आठ नवीन स्थानके निर्माण करण्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. ६४ किलोमीटरच्या या पट्ट्यात नवनवीन गृहसंकुले औद्योगिक प्रकल्प, पालघर जिल्हा कार्यालये उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने ही नवीन स्थानके कुठे असावीत हेही सुचविण्यात आली आहेत, असे जरी असले तरी ही स्थानके उभारण्यासाठीचा खर्च मात्र या प्रकल्पांत अंतर्भूत नाही. स्टेशन परिसरात करण्यात येणाऱ्या बदला बाबत सन २०१२ साली रेल्वे प्रशासनाने नेमलेल्या समितीद्वारा विरार ते डहाणू दरम्यानच्या परिस्थिीतीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्यात आलेला आहे. (प्रतिनिधी)