शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

खाडीतील अतिक्रमणांविरोधात ग्रामस्थ झाले आक्रमक; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:35 IST

समुद्र किनाऱ्याला लागून उत्तन नाकापासून पालीपर्यंतची नवीखाडी व पात्र परिसरात दाट कांदळवन आहे.

मीरा रोड : भाईंदर उत्तन ते पाली दरम्यान समुद्राजवळच्या नवीखाडी तसेच कांदळवनात झालेला भराव, अतिक्रमण, कचरा - गाळ काढून भरतीचा प्रवाह मोकळा करा तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोनशेपेक्षा जास्त ग्रामस्थांनी सह्या करुन सोमवारी महापालिका आयुक्त, अपर तहसीलदार, स्थानिक नगरसेवकांनी निवेदन दिले आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

समुद्र किनाऱ्याला लागून उत्तन नाकापासून पालीपर्यंतची नवीखाडी व पात्र परिसरात दाट कांदळवन आहे. परंतु समुद्राकडील खाडीचे तोंड भरावामुळे बंद झाले आहे. त्यातच खाडीत भराव, बांधकामांमुळे भरतीचे पाणीही आतपर्यंत येत नाही. कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो. खाडीत प्रक्रिया न करताच सांडपाणी राजरोस सोडले जाते. त्यामुळे खाडीत कचरा व गाळ साचून पाण्याचा प्रवाह व निचरा बंद झालेला आहे. खाडीत सांडपाणी साचून राहात असल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

उत्तन नाकापासून पालीपर्यंतच्या सरकारी जागेतील या नवीखाडी पात्रात अगदी महापालिकेसह भूमाफियांनी भराव करून बेकायदा गाळे, स्वच्छतागृह, बंगले आदी बांधकामे केली आहेत. अनेकांनी भराव करून जागा अडवून ठेवलेल्या आहेत. भराव व बांधकामे करताना येथील कांदळवनाच्या झाडांची कत्तल केली असून या प्रकरणी पूर्वी महसूल विभागाने काही जणांवर गुन्हे दाखल केले होते. पण अजून एकही बांधकाम तोडलेले नाही वा भराव काढला गेला नाही. नव्याने येथे भराव तसेच कांदळवनची झाडे सुकून मारण्यात आल्या प्रकरणीही ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र