शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

खाडीतील अतिक्रमणांविरोधात ग्रामस्थ झाले आक्रमक; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:35 IST

समुद्र किनाऱ्याला लागून उत्तन नाकापासून पालीपर्यंतची नवीखाडी व पात्र परिसरात दाट कांदळवन आहे.

मीरा रोड : भाईंदर उत्तन ते पाली दरम्यान समुद्राजवळच्या नवीखाडी तसेच कांदळवनात झालेला भराव, अतिक्रमण, कचरा - गाळ काढून भरतीचा प्रवाह मोकळा करा तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोनशेपेक्षा जास्त ग्रामस्थांनी सह्या करुन सोमवारी महापालिका आयुक्त, अपर तहसीलदार, स्थानिक नगरसेवकांनी निवेदन दिले आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

समुद्र किनाऱ्याला लागून उत्तन नाकापासून पालीपर्यंतची नवीखाडी व पात्र परिसरात दाट कांदळवन आहे. परंतु समुद्राकडील खाडीचे तोंड भरावामुळे बंद झाले आहे. त्यातच खाडीत भराव, बांधकामांमुळे भरतीचे पाणीही आतपर्यंत येत नाही. कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो. खाडीत प्रक्रिया न करताच सांडपाणी राजरोस सोडले जाते. त्यामुळे खाडीत कचरा व गाळ साचून पाण्याचा प्रवाह व निचरा बंद झालेला आहे. खाडीत सांडपाणी साचून राहात असल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

उत्तन नाकापासून पालीपर्यंतच्या सरकारी जागेतील या नवीखाडी पात्रात अगदी महापालिकेसह भूमाफियांनी भराव करून बेकायदा गाळे, स्वच्छतागृह, बंगले आदी बांधकामे केली आहेत. अनेकांनी भराव करून जागा अडवून ठेवलेल्या आहेत. भराव व बांधकामे करताना येथील कांदळवनाच्या झाडांची कत्तल केली असून या प्रकरणी पूर्वी महसूल विभागाने काही जणांवर गुन्हे दाखल केले होते. पण अजून एकही बांधकाम तोडलेले नाही वा भराव काढला गेला नाही. नव्याने येथे भराव तसेच कांदळवनची झाडे सुकून मारण्यात आल्या प्रकरणीही ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र