शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

खाडीतील अतिक्रमणांविरोधात ग्रामस्थ झाले आक्रमक; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:35 IST

समुद्र किनाऱ्याला लागून उत्तन नाकापासून पालीपर्यंतची नवीखाडी व पात्र परिसरात दाट कांदळवन आहे.

मीरा रोड : भाईंदर उत्तन ते पाली दरम्यान समुद्राजवळच्या नवीखाडी तसेच कांदळवनात झालेला भराव, अतिक्रमण, कचरा - गाळ काढून भरतीचा प्रवाह मोकळा करा तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोनशेपेक्षा जास्त ग्रामस्थांनी सह्या करुन सोमवारी महापालिका आयुक्त, अपर तहसीलदार, स्थानिक नगरसेवकांनी निवेदन दिले आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

समुद्र किनाऱ्याला लागून उत्तन नाकापासून पालीपर्यंतची नवीखाडी व पात्र परिसरात दाट कांदळवन आहे. परंतु समुद्राकडील खाडीचे तोंड भरावामुळे बंद झाले आहे. त्यातच खाडीत भराव, बांधकामांमुळे भरतीचे पाणीही आतपर्यंत येत नाही. कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो. खाडीत प्रक्रिया न करताच सांडपाणी राजरोस सोडले जाते. त्यामुळे खाडीत कचरा व गाळ साचून पाण्याचा प्रवाह व निचरा बंद झालेला आहे. खाडीत सांडपाणी साचून राहात असल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

उत्तन नाकापासून पालीपर्यंतच्या सरकारी जागेतील या नवीखाडी पात्रात अगदी महापालिकेसह भूमाफियांनी भराव करून बेकायदा गाळे, स्वच्छतागृह, बंगले आदी बांधकामे केली आहेत. अनेकांनी भराव करून जागा अडवून ठेवलेल्या आहेत. भराव व बांधकामे करताना येथील कांदळवनाच्या झाडांची कत्तल केली असून या प्रकरणी पूर्वी महसूल विभागाने काही जणांवर गुन्हे दाखल केले होते. पण अजून एकही बांधकाम तोडलेले नाही वा भराव काढला गेला नाही. नव्याने येथे भराव तसेच कांदळवनची झाडे सुकून मारण्यात आल्या प्रकरणीही ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र