शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

स्थलांतरित शेतीसाठी गावाकडे

By admin | Updated: May 24, 2016 02:48 IST

काही दिवसांवर येवून ठेपलेल्या पावसाळयापूर्वीची शेतींची आणि घरांची कामे करण्यासाठी स्थलांतरीत आदिवासींनी आपल्या घराच्या दिशेने धाव घेतली आहे. कुणी घरांची कौले चाळतांना दिसत

विक्रमगड : काही दिवसांवर येवून ठेपलेल्या पावसाळयापूर्वीची शेतींची आणि घरांची कामे करण्यासाठी स्थलांतरीत आदिवासींनी आपल्या घराच्या दिशेने धाव घेतली आहे. कुणी घरांची कौले चाळतांना दिसत आहेत. कुणी घराच्या छपरांची डागडुजी करीत आहे. तर कुणी शेतात राब-राबणी, बांधबंदिस्ती करतांना दिसत आहे. एकंदरीत सर्वच पावसाळयापूर्वीच्या तयारीला लागलेले दिसत आहेत. चार महिने काम धंद्याकरिता बाहेर गावी गेलेले भूमीपुत्र आपल्या माहेरवाशी गावाला येतांना दिसत आहे. विक्रमगड तालुक्यात जून ते सष्टेंबर असा चार महिने शेतीचा हंगाम असतो. पावसाळयात ज्या काही वस्तू लागतात त्या चार महिने पुरेल अशा खरेदी करुन ठेवल्या जात आहेत. विक्रमगड तालुक्यातल्या आपल्या गावी शेती हंगामाचे चार महिने सोडले तर तसा कोणताही रोजगार नाही त्यामुळे शेती हंगाम संपताच येथील गाव-खेड्यापाडयावरील भूमीपुत्र रोजगारासाठी शहरात स्थलांतरीत होत असतात.आधुनिक व नवीन तंत्रज्ञाचे युग असल्याने शेतीमध्ये नवीन बदल झालेले आहे.आज अनेकजण प्रामुख्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची नांगरट करीतांना दिसतो कारण कमी वेळेत जास्त काम होते. परंतु जुन्या लोकांच्या सांगण्यानुसार गावठी बैलांच्या नांगरटीने जमिनीचा कस व्यवस्थीत राहून खोलपर्यत जमीन नांगरली जाते व पिकास ते चांगले असते. ग्रामीण भागात आजही जास्त प्रमाणात बैल नांगरांचा वापर होतो. शेतीसाठी लागणारी अवजारे कोयता,नांगर, यांची दुरुस्ती केली जाते. तर शेतामध्ये पेरण्यासाठी बी-बियाणांची साठवण बाहेर काढली जाते. शेताची बांध-बंदिस्ती केली जाते. आवश्यक त्या सर्व गोष्टी पाऊस पडण्याच्या अगोदरच केल्या जातात. पावसाळयात घर गळू नये याकरिता कौले चाळून घेतलेली जातात. जुनी, फुटकी कौले बदलून त्या जागी नवीन कौले टाकणे यालाच कौले चाळणे असे म्हणतात. घरासमोरील पागोळ््याचे पाणी आत येऊ नयेकरिता छोटीशी पडवी बांधली जाते. पावसाळ््यासाठी घराची डागडुजी करुन घरामध्ये चार महिने पुरेल असे साहित्य साठवून ठेवले जाते.शेती करणे जिकरीचे होत चालेले आहे. निसर्गाचा लहरीपणा, कमी जास्त प्रमाणात पाऊस, मजुरीचे,बी-बियाणांने,खते, शेती अवजारे यांचे भरमसाठ वाढलेले दर व एवढे करुनही पाहीजे तसे उत्पन्न हाती पदरी पडत नसल्याने आर्थिक नुकसान व घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता या साऱ्यामुळे शेतीकरी मेटाकुटीस आला आहे. परंतु पूर्वापार रितीरीवाजाप्रमाणे, वंशपंरापरागत असलेला व्यवसाय आजही ग्रामीण भागात जोपासाला जात आहे. (वार्ताहर)- नांगराकरिता नवीन बैलजोडी,नवीन विळे,नांगराचे नवीन फाळ,नवीन लाकडी नांगर बनवून घेणे ही कामे करीत असतात. कारण एकदा का पाऊस सुरु झाला की शेतक-यांच्या कुटुंबाला बाजारात जाणे शक्य नसते. - दिवसेंदिवस लोकंसख्या वाढत चालेली असल्याने मोठया कुटुंबात पूर्वीप्रमाणे एकत्र राहाणे दुरापास्त होत चाललेले आहे. आपसात असलेल्या जमीनीची वाटणी करुन विभक्त कुटुंब पध्दतीने राहण्यामुळे वडिलो पार्जीत जमिनीचे छोटे छोटे तुकडे होत आहेत. त्यामुळे शेती अधीकच आतबट्टयाची ठरते आहे.