शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित शेतीसाठी गावाकडे

By admin | Updated: May 24, 2016 02:48 IST

काही दिवसांवर येवून ठेपलेल्या पावसाळयापूर्वीची शेतींची आणि घरांची कामे करण्यासाठी स्थलांतरीत आदिवासींनी आपल्या घराच्या दिशेने धाव घेतली आहे. कुणी घरांची कौले चाळतांना दिसत

विक्रमगड : काही दिवसांवर येवून ठेपलेल्या पावसाळयापूर्वीची शेतींची आणि घरांची कामे करण्यासाठी स्थलांतरीत आदिवासींनी आपल्या घराच्या दिशेने धाव घेतली आहे. कुणी घरांची कौले चाळतांना दिसत आहेत. कुणी घराच्या छपरांची डागडुजी करीत आहे. तर कुणी शेतात राब-राबणी, बांधबंदिस्ती करतांना दिसत आहे. एकंदरीत सर्वच पावसाळयापूर्वीच्या तयारीला लागलेले दिसत आहेत. चार महिने काम धंद्याकरिता बाहेर गावी गेलेले भूमीपुत्र आपल्या माहेरवाशी गावाला येतांना दिसत आहे. विक्रमगड तालुक्यात जून ते सष्टेंबर असा चार महिने शेतीचा हंगाम असतो. पावसाळयात ज्या काही वस्तू लागतात त्या चार महिने पुरेल अशा खरेदी करुन ठेवल्या जात आहेत. विक्रमगड तालुक्यातल्या आपल्या गावी शेती हंगामाचे चार महिने सोडले तर तसा कोणताही रोजगार नाही त्यामुळे शेती हंगाम संपताच येथील गाव-खेड्यापाडयावरील भूमीपुत्र रोजगारासाठी शहरात स्थलांतरीत होत असतात.आधुनिक व नवीन तंत्रज्ञाचे युग असल्याने शेतीमध्ये नवीन बदल झालेले आहे.आज अनेकजण प्रामुख्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची नांगरट करीतांना दिसतो कारण कमी वेळेत जास्त काम होते. परंतु जुन्या लोकांच्या सांगण्यानुसार गावठी बैलांच्या नांगरटीने जमिनीचा कस व्यवस्थीत राहून खोलपर्यत जमीन नांगरली जाते व पिकास ते चांगले असते. ग्रामीण भागात आजही जास्त प्रमाणात बैल नांगरांचा वापर होतो. शेतीसाठी लागणारी अवजारे कोयता,नांगर, यांची दुरुस्ती केली जाते. तर शेतामध्ये पेरण्यासाठी बी-बियाणांची साठवण बाहेर काढली जाते. शेताची बांध-बंदिस्ती केली जाते. आवश्यक त्या सर्व गोष्टी पाऊस पडण्याच्या अगोदरच केल्या जातात. पावसाळयात घर गळू नये याकरिता कौले चाळून घेतलेली जातात. जुनी, फुटकी कौले बदलून त्या जागी नवीन कौले टाकणे यालाच कौले चाळणे असे म्हणतात. घरासमोरील पागोळ््याचे पाणी आत येऊ नयेकरिता छोटीशी पडवी बांधली जाते. पावसाळ््यासाठी घराची डागडुजी करुन घरामध्ये चार महिने पुरेल असे साहित्य साठवून ठेवले जाते.शेती करणे जिकरीचे होत चालेले आहे. निसर्गाचा लहरीपणा, कमी जास्त प्रमाणात पाऊस, मजुरीचे,बी-बियाणांने,खते, शेती अवजारे यांचे भरमसाठ वाढलेले दर व एवढे करुनही पाहीजे तसे उत्पन्न हाती पदरी पडत नसल्याने आर्थिक नुकसान व घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता या साऱ्यामुळे शेतीकरी मेटाकुटीस आला आहे. परंतु पूर्वापार रितीरीवाजाप्रमाणे, वंशपंरापरागत असलेला व्यवसाय आजही ग्रामीण भागात जोपासाला जात आहे. (वार्ताहर)- नांगराकरिता नवीन बैलजोडी,नवीन विळे,नांगराचे नवीन फाळ,नवीन लाकडी नांगर बनवून घेणे ही कामे करीत असतात. कारण एकदा का पाऊस सुरु झाला की शेतक-यांच्या कुटुंबाला बाजारात जाणे शक्य नसते. - दिवसेंदिवस लोकंसख्या वाढत चालेली असल्याने मोठया कुटुंबात पूर्वीप्रमाणे एकत्र राहाणे दुरापास्त होत चाललेले आहे. आपसात असलेल्या जमीनीची वाटणी करुन विभक्त कुटुंब पध्दतीने राहण्यामुळे वडिलो पार्जीत जमिनीचे छोटे छोटे तुकडे होत आहेत. त्यामुळे शेती अधीकच आतबट्टयाची ठरते आहे.