शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

वसईकर रिक्षावाल्याचे प्रसंगावधान; दिल्लीतील घरातून निघून आलेली अल्पवयीन मुलगी सुखरुप पालकांच्या स्वाधीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 17:43 IST

Honest Rickshaw Driver : अभिनंदनास पात्र अशा प्रामाणिक रिक्षाचालकांसोबत वसई वाहतूक शाखेचे पोलीस आणि माणिकपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आशिष राणे

वसई - अब दिल्ली दूर नहीं हा राजकारणातील शब्द एका गंभीर घटनेमुळे अब वसई दुर नही असा झाला असून दिल्लीत राहणाऱ्या व  ऑनलाइन अभ्यासावरून आई रागावली म्हणून घर सोडून थेट वसई गाठण्याऱ्या त्या केवळ १४ वर्षाच्या अल्पवयीन  मुलीला वसईतील त्या रिक्षाचालकाने दाखवलेल्या सतर्कता व संवेदनशीलतेमुळे पालकांच्या स्वाधीन करता आले आहे. त्यामुळे अभिनंदनास पात्र अशा प्रामाणिक रिक्षाचालकांसोबत वसई वाहतूक शाखेचे पोलीस आणि माणिकपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या संदर्भात माणिकपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. २९ रोजी सकाळी १०.३० वाजता वसई पूर्व रेल्वे स्टेशन भागात रिक्षाचालक राजू करवाडे हे त्यांची प्रवासी रिक्षा घेऊन जाताना तेथे १४ वर्षाच्या मुलीने हात दाखवला असता रिक्षाचालकांनी रिक्षा थांबवली. त्यावेळी मुलीने विचारले की, मला या भागाची माहिती नाही मला राहण्यासाठी भाड्याने कुठे रूम मिळेल का त्यावर रिक्षाचालक राजू करवाडे यांनी तिचे नाव व ओळखपत्र  विचारले असता तिने सांगितले की ती एकटी दिल्ली वरून वसईत आलेली आहे.

तेव्हा राजू याने तिचे ओळखपत्र बघितले असता रिक्षा चालकास  लक्षात आले की, ही मुलगी खरे बोलत असून ती अल्पवयीन देखील आहे. त्याचवेळी रिक्षाचालक राजू करवाडे यांनी सतर्कता दाखवून वसई  वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार राकेश लोहकरे यांना संपर्क साधला असता वाहतूक पोलीसांनी रिक्षाचालकास  त्या मुलीला माणिकपूर पोलीस ठाणे येथे घेऊन जाण्यास सांगितले. 

दरम्यान रिक्षाचालक राजू करवाडे हे त्या मुलीला पोलिस ठाण्यात घेऊन आले त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस नाईक विकास ताकवाले यांनी सदर मुलीचे नाव व पत्ता याची खात्री करून दिल्ली येथील साकेत पोलीस स्टेशनला संपर्क साधला. त्यातही माहिती पमिळाली की ही अल्पवयीन मुलगी १४ वर्षे वयाची असून नवी दिल्ली सेक्टर  ०७ पुष्प विहार येथे राहते. मात्र, आईने अभ्यासावरून रागावल्याने ही मुलगी घरातून दि २८ जानेवारी रोजी रागाच्या भरात निघून आली आहे. त्याबाबत साकेत पोलीस ठाणे दिल्ली येथे अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे समजले.

परिणामी  वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कल्पना देत माणिकपूर पोलिसांनी तात्काळ दिल्ली येथील पोलीस स्टेशन व त्या मुलीच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांची मुलगी वसईत मिळून आल्याबाबत माहिती दिल्याने तात्काळ शनिवारी त्या मुलीचे आई वडील दिल्ली वरून दुपारच्या विमानाने तिला घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले व तद्नंतर  माणिकपूर पोलीस स्टेशन येथे येऊन आपल्या मुलीला ताब्यात घेतले.

त्यावेळी सर्वप्रथम मुलीच्या  पालकांनी रिक्षाचालक राजू करवाडे सहित वाहतुक पोलिस लोहकरे तसेच माणिकपूर पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर पोलिस अंमलदार यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली अर्थातच  रिक्षाचालक राजू यांच्या सतर्कता व  संवेदनशीलतेमुळे ही मुलगी मिळून आली व तिला पालकांच्या स्वाधीन करता आले. अन्यथा या मुलीचा थांगपत्ता मिळू शकला नसता अशी चिंता पालक व पोलिसांनी व्यक्त केली यावेळी रिक्षा चालक राजू यांचा  वाहतूक व माणिकपूर पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसdelhiदिल्लीVasai Virarवसई विरार